लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : लॉकडाऊनमुळे बंद असलेली कापूस खरेदी सुरु करण्याचे आदेश शासनाने दिल्यानंतर नंदुरबार आणि शहादा केंद्रात विक्रमी एक लाख ३ हजार क्विंटल कापूस खरेदी पूर्ण झाली आहे़ विक्रमी खरेदीच्या पार्श्वभूमीवर सीसीआयच्या नंदुरबार केंद्रातील जिनिंगमध्ये कापूस ठेवण्यासाठी जागा नसल्याने खरेदी काही काळासाठी बंद करण्यात आली आहे़ अद्याप ९०० शेतकऱ्यांचा माल खरेदी करणे बाकी आहे़जिल्हाधिकारी यांनी गेल्या महिन्यात आदेश दिल्यानंतर बाजार समित्यांनी गावोगावी पंचनामे करुन शेतकऱ्यांच्या कापसाची नोंद केली होती़ यात शहादा बाजार समितीने केलेल्या पंचनाम्यातील ६०७ शेतकºयांची खरेदी पूर्ण केली असून उर्वरित ३५० शेतकºयांच्या कापसाची खरेदीही शिल्लक आहे़ येत्या आठवड्यात ही खरेदी पूर्ण होणार आहे़ दरम्यान नंदुरबार बाजार समितीने पंचनामे केलेल्या ९०० पैकी ७५० शेतकºयांच्या कापसाची खरेदी केली आहे़ केंद्र बंद झाल्याने काही शेतकºयांचा कापूस अद्याप खरेदी करण्यात आलेला नाही़ नंदुरबार जिल्ह्यात कॉटन कार्पोरेशन इंडिया अर्थात सीसीआयने दोन केंद्र सुरु केली आहेत़ केंद्रात लॉकडाऊनपूर्वी तब्बल अडीच लाख क्विंटल कापूस खरेदी पूर्ण करण्यात आली आहे़ नोव्हेंबर महिन्यापासून ही कापूस खरेदी सुरु होती़ दरम्यान २२ मार्चपासून लॉकडाऊन सुरु झाल्याने ही खरेदी बंद करण्यात आली होती़ जिल्हाधिकाºयांच्या आदेशानंतर सुरु करण्यात आलेल्या खरेदीला आता जागेअभावी ब्रेक लागला असल्याने शेतकºयांनी चिंता व्यक्त केली आहे़ परंतू खरेदी केलेल्या कापसाची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावल्यानंतर तातडीने कापूस सुरु करण्यात येणार असल्याचे नंदुरबार येथील खरेदी केंद्रातून कळवण्यात आले आहे़
नंदुरबार बाजार समितीच्या पळाशी येथील राजीव गांधी कापूस खरेदी केंद्रात नोव्हेंबर ते मार्च यादरम्यान ९५ हजार ७७१ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला होता़ लॉकडाऊनमुळे ही खरेदी थांबली होती़ गेल्या महिन्यात खरेदी पूर्ववत सुरु झाल्यानंतर शनिवारअखेरपर्यंत ५८ हजार क्विंटल कापूस खरेदी पूर्ण करण्यात आली होती़ यंदाच्या हंगामात एका महिन्यापेक्षा कमी काळात ५० हजार क्विंटलच्या पुढे कापूस खरेदी करण्यात आल्याचा विक्रम नंदुरबार बाजार समितीकडून झाल्याचे सांगण्यात आले आहे़ तूर्तास बंद करण्यात आलेल्या खरेदीचे प्रमुख कारण म्हणजे सीसीआयने घेतलेल्या जिनिंगमध्ये साधारण १५ हजार क्विंटलपेक्षा अधिक साठा असल्याची माहिती आहे़ रुई आणि सरकी वेगळी केल्यानंतर त्याच्या गाठी तयार करुन सीसीआयने घेतलेल्या मनमाड येथील गोडावूनमध्ये पाठवण्यात येणार आहेत़ गाठी तेथे गेल्यानंतर मग पुन्हा कापसाची खरेदी सुरु होणार असल्याची माहिती सीसीआयकडून देण्यात आली आहे़
शहादा बाजार समितीने यंदा लॉकडाऊनपूर्वी जिल्ह्यात सर्वाधिक १ लाख ७८ हजार क्विंटल कापसाची खरेदी केली होती़ लॉकडाऊनमधून शिथिलता मिळाल्यानंतर बाजार समितीकडे २ हजार ३७३ शेतकऱ्यांनी कापूस खरेदीसाठी नोंद केली होती़ यातील केवळ ३०० शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करणे शिल्लक आहे़ आतापर्यंत ४१ हजार क्विंटल कापसाची खरेदी करुन सीसीआयने त्याच्या गाठी तयार केल्या आहेत़ या गाठी मनमाडकडे रवाना झाल्या आहेत़नंदुरबार येथील जिनिंगमध्ये माल ठेवण्यास जागा नसल्याने खरेदी बंद पडली असताना दुसरीकडे बाहेर ठेवलेला कापूस पावसात सापडल्याने नुकसान झाले आहे़ पावसाळ्यात रुई आणि सरकी वेगळी करण्याच्या कामांना विलंब होत असल्याने नुकसान वाढीची शक्यता आहे़ अद्यापही बºयाच शेतकºयांचा कापूस खरेदी करणे शिल्लक असल्याने जिनिंगमध्ये असलेल्या कापसाच्या गाठी बनवण्यास वेग देण्यात येत आहे़ परंतू बºयाच ठिकाणी मजूर नसल्याने या कामांना विलंब होत असल्याचे सांगण्यात आले आहे़ याउलट स्थिती शहादा येथील सीसीआय केंद्रात असून माल घेतल्याच्या दिवशीच त्याच्या गाठी तयार करुन रवाना केल्या गेल्याची माहिती देण्यात आली आहे़
गेल्या वर्षी कोसळलेल्या दमदार पावसामुळे कापूस उत्पादन हे मोठ्या प्रमाणावर आले होते़ यामुळे नंदुरबार शहादा या दोन्ही केंद्रात आतापर्यंत ३ लाख ७२ हजार क्विंटल कापूस सीसीआयने खरेदी केला आहे़ यात अद्यापही वाढ होणे अपेक्षित असल्याने हा आकडा चार लाख क्विंटलच्या पुढे जाणार आहे़४शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात आलेल्या कापसाचे पेमेंटही वेळेत करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे़