शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
3
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
4
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
5
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
6
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
7
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
8
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
9
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
10
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
11
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
12
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
13
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
14
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
15
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
16
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

सुराय गावात दोन महिन्यांपासून नळांना पाणी नाही

By admin | Updated: June 26, 2017 16:24 IST

अक्षय्यतृतीयेला आले होते पाणी. दोंडाईचा व मालपूर येथून आणावे लागते पाणी

ऑनलाईन लोकमत 

मालपूर,जि.धुळे,दि. -  शिंदखेडा तालुक्यातील सुराय येथे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. 28 एप्रिल रोजी झालेल्या अक्षय्यतृतीया सणानंतर आजर्पयत सुराय गावातील नळांना पाणीच आलेले नाही. गावातील लहान मुले, महिला व नागरिकांना रानावनात पाण्यासाठी  भटकंती करावी लागत आहे.  
शिंदखेडा तालुक्यातील मालपूर परिसरातील सुराय येथे ग्रुप ग्रामपंचायत आहे. त्याअंतर्गत चुडाणे, अक्कलकोस, कलवाडे आदी गावांचा समावेश आहे. चुडाणे आणि कलवाडे येथेसुद्धा पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर आहे; तर चुडाणे येथे टॅँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. सुराय गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी अक्कलकोस, चुडाणे, कलवाडे व सुराय येथे प्रत्येकी एक विहीर अधिग्रहित करण्यात आली आहे. मात्र, त्या विहिरींनी तळ गाठल्यामुळे पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. अक्कलकोस गावातील विहिरीला थोडे पाणी आहे. मात्र, तेवढे पाणी अक्कलकोससाठीच पुरेसे होत नाही. तसेच सुराय गावाला या विहिरीतून पाणीपुरवठा होऊ शकत नाही. कलवाडे व चुडाणे येथील विहिरींमध्येही पाण्याचा ठणठणाट आहे. 
दोंडाईचा, मालपूर येथून आणावे लागते पाणी 
सुराय येथील काही ग्रामस्थ दररोज दोंडाईचा किंवा मालपूर येथे जाऊन पाण्याचे ड्रम गाडय़ांवरून भरून आणतात. तर काही ग्रामस्थ खासगी टॅँकर बोलावून पाणी मागवताना दिसतात.