शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरात एकही मरणोत्तर नेत्रदान नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 12:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात गेल्या वर्ष भरात एकही व्यक्तीचे मरणोत्तर नेत्रदान झाले नाही. मात्र 1998 ते 2017 ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात गेल्या वर्ष भरात एकही व्यक्तीचे मरणोत्तर नेत्रदान झाले नाही. मात्र 1998 ते 2017 पयर्ंत नेत्रदान करण्यांचे शतक पार झाले आहे. नेत्रदान करण्यासाठी आता किमान 65 वर्ष वयाची अट असल्याने गेल्या वर्ष भरात घट झाल्याचे दिसून येत आहे. रक्तदान, देहदान याप्रमाणे नेत्रदान देखील तितकेच महत्त्वाचे मानले जाते.प्रख्यात नेत्रशल्य विशारद डॉ. आर. ए. भालचंद्र यांचा स्मृतिदिन दरवर्षी दि.10 जुन रोजी जागतिक दृष्टिदान दिवस साजरा करण्यात येतो. आजच्या जागतिक दृष्टीदान दिनानिमित्त नेत्रदानाबाबत जनजागृती होणे आवश्यक आहे.  डोळे ही निसगार्ने दिलेली सर्वात मोठी देणगी आहे. दुर्दैवाने काही लोकांना विविध कारणांनी अंधत्व आल्याने दृष्टीपासूपासुन वंचित राहावे लागते. परंतु नेत्रदानाबाबत अद्यापही काही गैरमसज आहेत. जिल्ह्यात ही चळवळ ब:यापैकी रुजली आहे.                                                               1 जुलै 1998 रोजी नंदुरबार जिल्हा सार्वजनिक समितीची स्थापना करण्यात आली. या समितीने     नेत्रदान प्रचार आणि प्रसारासाठी गेल्या दिड तपाचे योगदान दिले आहे. ‘विना दृष्टी नाही सृष्टी’ या चार शब्दात दृष्टीने आपले विश्व व्यापले आहे. जीवनात मृत्यू अटळ आहे. मृत्यू हा वय, लिंग, धर्म, जात, रंग, गरीब, श्रीमंत, याला महत्त्व देत नाही. रिवाजाप्रमाणे मृत्यू झाल्यास दहन किंवा दफन करुन शरीराची विल्हेवाट लावली जाते. मात्र नाशवंत शरीरातील काही भाग  मरणोत्तर दान केले तर त्याचा उपयोग मरणासन्न चार ते पाच रुग्णांना होतो. जसे नेत्रदान, किडनीदान ,लिव्हर दान, हृदय दान याचा समावेश आहे. नेत्ररोपण करणा:या हडपसर (पुणे) येथील एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालयातर्फे वयाची अट घालण्यात आली. एक दिवसाचे शिशु ते 65 वर्षाच्या आतील कोणीही नेत्रदान करू शकतो.नंदुरबार जिल्हा सार्वजनिक समितीत डॉ. अजरुन लालचंदाणी, सुरेश जैन, महादू हिरणवाळे कार्यरत आहेत. इच्छुकांनी नेत्रदानासाठी संकल्प करणे आता गरजेचे आहे.  मृत्यू नंतर डोळे दान करण्याचा संकल्प करणे व नातेवाईकाकडून तो पूर्ण करण्यासाठी व्यवस्था करावी. यासाठी लेखी संकल्पपत्र भरणे व त्यावर दोन साक्षीदारांच्या सह्या घेणे आवश्यक असते. मृत व्यक्तीचे नातेवाईक सुद्धा नेत्रदानासाठी संमती देउ शकतात असे महादू हिरणवाळे यांनी सांगितले. वयाच्या अटीमुळे नेत्रदान चे प्रमाण घटले तरी देखील गेल्या 20 वर्षात पावणे दोनशे जणांनी मरणोत्तर नेत्रदान केले. यातुन पावणे चारशे जणांना दृष्टी मिळाली आहे. 65 वर्षावरील व्यक्तीचे नेत्रदान नाकारण्यात आल्यामुळे आता कमी वयात अकस्मात मृत्यु झाल्यास उदा. अपघात, आत्महत्या, विषप्राशन आदी कारणामुळे मृत्यू झाल्यास नेत्रदान करण्यासाठी नातेवाईक  यांचे समुपदेशन आणि जनजागृतीसाठी प्रय} होणे आवश्यक आहे.