शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
2
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
3
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
4
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
5
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
6
अमेरिकेच्या टॅरिफचा फटका! सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी कोसळला, 'या' क्षेत्राला सर्वाधिक धक्का
7
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
8
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
9
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
10
Ganesh Chaturthi 2025:वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मोठ्या मुलानेच गणपती आणायचा? पंचांगकर्ते सोमण सांगतात... 
11
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; सासरच्यांनी पकडल्यावर मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून...,
12
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
13
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
14
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
15
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
16
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
17
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
18
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
19
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
20
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा

वर्षभरात एकही मरणोत्तर नेत्रदान नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 12:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात गेल्या वर्ष भरात एकही व्यक्तीचे मरणोत्तर नेत्रदान झाले नाही. मात्र 1998 ते 2017 ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात गेल्या वर्ष भरात एकही व्यक्तीचे मरणोत्तर नेत्रदान झाले नाही. मात्र 1998 ते 2017 पयर्ंत नेत्रदान करण्यांचे शतक पार झाले आहे. नेत्रदान करण्यासाठी आता किमान 65 वर्ष वयाची अट असल्याने गेल्या वर्ष भरात घट झाल्याचे दिसून येत आहे. रक्तदान, देहदान याप्रमाणे नेत्रदान देखील तितकेच महत्त्वाचे मानले जाते.प्रख्यात नेत्रशल्य विशारद डॉ. आर. ए. भालचंद्र यांचा स्मृतिदिन दरवर्षी दि.10 जुन रोजी जागतिक दृष्टिदान दिवस साजरा करण्यात येतो. आजच्या जागतिक दृष्टीदान दिनानिमित्त नेत्रदानाबाबत जनजागृती होणे आवश्यक आहे.  डोळे ही निसगार्ने दिलेली सर्वात मोठी देणगी आहे. दुर्दैवाने काही लोकांना विविध कारणांनी अंधत्व आल्याने दृष्टीपासूपासुन वंचित राहावे लागते. परंतु नेत्रदानाबाबत अद्यापही काही गैरमसज आहेत. जिल्ह्यात ही चळवळ ब:यापैकी रुजली आहे.                                                               1 जुलै 1998 रोजी नंदुरबार जिल्हा सार्वजनिक समितीची स्थापना करण्यात आली. या समितीने     नेत्रदान प्रचार आणि प्रसारासाठी गेल्या दिड तपाचे योगदान दिले आहे. ‘विना दृष्टी नाही सृष्टी’ या चार शब्दात दृष्टीने आपले विश्व व्यापले आहे. जीवनात मृत्यू अटळ आहे. मृत्यू हा वय, लिंग, धर्म, जात, रंग, गरीब, श्रीमंत, याला महत्त्व देत नाही. रिवाजाप्रमाणे मृत्यू झाल्यास दहन किंवा दफन करुन शरीराची विल्हेवाट लावली जाते. मात्र नाशवंत शरीरातील काही भाग  मरणोत्तर दान केले तर त्याचा उपयोग मरणासन्न चार ते पाच रुग्णांना होतो. जसे नेत्रदान, किडनीदान ,लिव्हर दान, हृदय दान याचा समावेश आहे. नेत्ररोपण करणा:या हडपसर (पुणे) येथील एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालयातर्फे वयाची अट घालण्यात आली. एक दिवसाचे शिशु ते 65 वर्षाच्या आतील कोणीही नेत्रदान करू शकतो.नंदुरबार जिल्हा सार्वजनिक समितीत डॉ. अजरुन लालचंदाणी, सुरेश जैन, महादू हिरणवाळे कार्यरत आहेत. इच्छुकांनी नेत्रदानासाठी संकल्प करणे आता गरजेचे आहे.  मृत्यू नंतर डोळे दान करण्याचा संकल्प करणे व नातेवाईकाकडून तो पूर्ण करण्यासाठी व्यवस्था करावी. यासाठी लेखी संकल्पपत्र भरणे व त्यावर दोन साक्षीदारांच्या सह्या घेणे आवश्यक असते. मृत व्यक्तीचे नातेवाईक सुद्धा नेत्रदानासाठी संमती देउ शकतात असे महादू हिरणवाळे यांनी सांगितले. वयाच्या अटीमुळे नेत्रदान चे प्रमाण घटले तरी देखील गेल्या 20 वर्षात पावणे दोनशे जणांनी मरणोत्तर नेत्रदान केले. यातुन पावणे चारशे जणांना दृष्टी मिळाली आहे. 65 वर्षावरील व्यक्तीचे नेत्रदान नाकारण्यात आल्यामुळे आता कमी वयात अकस्मात मृत्यु झाल्यास उदा. अपघात, आत्महत्या, विषप्राशन आदी कारणामुळे मृत्यू झाल्यास नेत्रदान करण्यासाठी नातेवाईक  यांचे समुपदेशन आणि जनजागृतीसाठी प्रय} होणे आवश्यक आहे.