शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

नवापूर सीमा नाक्यावर ई-पास व कोरोना अहवाल शिवाय आंतरराज्यात प्रवेश नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:26 IST

कोरोनासदृश परिस्थितीत नंदुरबार जिल्ह्यात १ ते १५ एप्रिल या कालावधीत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या कालावधीत जिल्ह्यातून प्रवास ...

कोरोनासदृश परिस्थितीत नंदुरबार जिल्ह्यात १ ते १५ एप्रिल या कालावधीत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या कालावधीत जिल्ह्यातून प्रवास करताना मुभा देण्यात आली असून, परराज्यातून महाराष्ट्रात येण्यासाठी पास व कोरोना अहवाल निगेटिव्ह असल्यास नंदुरबार जिल्ह्यात प्रवेश दिला जाणार आहे. यासाठी नवापुर सीमा तपासणी नाक्यावर आरोग्य, महसूूल आणि पोलीस पथक तैनात करण्यात आले आहे. गुजरात राज्यातून येणाऱ्या प्रत्येक वाहनचालकांस पास अनिवार्य करण्यात आली आहे. विनापास वाहनधारकांची वाहने परत गुजरात राज्यात रवाना केली जात आहे. तसेच गुजरात राज्यात जाण्यासाठी नवापूर सीमा तपासणी नाक्यावर वाहनचालकांसह प्रवाशांची कोरोना रॅपिड ॲटिंजन तपासणी केली जात आहे.

गुजरात राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनधारकांसह प्रवाशांची तपासणी उच्छल येथील शिबिरात करण्यात येत आहे. त्यासाठी गुजरात प्रशासनतर्फे आरोग्य कर्मचारी व पोलीस पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. कोरोना अहवाल निगेटिव्ह असल्यास गुजरात राज्यात जाण्यासाठी अनुमती दिली जात आहे. अथवा गुजरात प्रशासन वाहनधारकांना परत महाराष्ट्रात पाठवत आहे. त्यामुळे वाहनधारकांसह नागरिकांनी परराज्यात जाण्यासाठी कोरोना अहवाल व ई- पास बाळगणे गरजेचे आहे. गुजरात व महाराष्ट्र आंतरराज्यात शेतीव्यवसायासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांनी तहसिलदार यांच्याकडून पास प्राप्त करुन घेणे आवश्यक आहे.

नागरिकांनी पाससाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे गरजेचे आहे. तसेच ज्या कामाकरिता प्रवास करणार आहेत, पास असणे आवश्यक आहे. नातेवाईकाचे अंत्यसंस्कारासाठी किंवा नोकरीच्या ठिकाणी रूजू होण्यासाठी जिल्ह्यात प्रवेश करण्यापूर्वी पास आवश्यक असून त्यासाठी ओळखपत्र आणि आर.टी.पी.सी.आर अहवाल आवश्यक राहणार आहे. तसेच आर.टी.पी.सी.आर अहवाल नसल्यास सीमेवर रॅपीड अँटीजन चाचणी शिबिरात तपासणी करणे अनिवार्य आहे. तसेच वैद्यकीय उपचार घेण्याकरिता व प्रवासासाठी ओळखपत्र व वैद्यकीय दाखला आवश्यक असेल, असे उपजिल्हाधिकारी तथा कोविड पास वितरण कक्षाचे एस. एस .मोरे यांनी कळविले आहे.

अत्यावश्यक बाबीसाठी पासची सक्ती नाही

लोकसेवा आयोग व शैक्षणिक परीक्षांचे परीक्षार्थीं, शैक्षणिक परीक्षा कामकाजाकरिता नियुक्त अधिकारी कर्मचारी यांना पास आवश्यक नसून परीक्षार्थींनी परीक्षेचे हॉल तिकीट जवळ बाळगणे आवश्यक असून संबंधित अधिकाऱ्यांनी ओळखपत्र दाखवणे अनिवार्य आहे. सर्व शासकीय कार्यालये, वैद्यकीय सेवा, बँकेचे व्यवहार सुरू राहणार असल्याने संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ओळखपत्र सोबत ठेवणे गरजेचे असून तपासणी यंत्रणेने विचारल्यास दाखवणे बंधनकारक राहील. वृत्तपत्र वितरण व छपाईस मुभा देण्यात आली असून मालवाहतूक आणि गॅस वितरणासाठी वेगळ्या पासची आवश्यकता नाही.