शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

गरिबाच्या फ्रिजला यंदा मागणी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:29 IST

उन्हाळा सुरू झाला की, सर्वसामान्य नागरिक थंडगार पाण्यासाठी माठाची खरेदी करतात. त्यातून काही प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असते. परिणामी ...

उन्हाळा सुरू झाला की, सर्वसामान्य नागरिक थंडगार पाण्यासाठी माठाची खरेदी करतात. त्यातून काही प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असते. परिणामी माठनिर्मिती करणाऱ्या कुंभार समाजातील कुटुंबीयांना रोजगार उपलब्ध होत असतो. विशेष म्हणजे बदलत्या काळानुसार फ्रिज आला असला तरी माठातील पाणी चवीला चांगले असते. तसेच आरोग्यावर दुष्परिणाम होत नाही; म्हणून नागरिक माठच खरेदी करतात. ग्रामीण भागातील नागरिक थंड पाण्यासाठी सर्वाधिक मातीच्या माठाचा वापर करतात.

गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या प्रादुर्भाव वाढू लागल्याने जिल्हा प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले आहे. ‘ब्रेक दि चेन’अंतर्गत अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता अन्य दुकाने बंद ठेवण्याचे निर्देशही शासनाने दिले आहेत. त्यामुळे ग्राहक घराबाहेर पडणे पसंत करीत नाहीत. परिणामी आठवडेबाजारही बंद असल्याने खरेदीसाठी कोणीही येत नसल्याने दिसून येत आहे.

माठनिर्मिती करणाऱ्यांनी माती आणि भुस्सा मोठ्या प्रमाणात खरेदी करून माठांची निर्मिती केली आहे; परंतु ग्राहकांकडून मागणीच नसल्याने हे व्यावसायिक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे यंदा तरी केलेला खर्च निघेल की नाही, अशी भीती व्यक्त होत आहे.

दिवसेंदिवस उन्हाची दाहकता वाढत आहे. गोरगरिबांचा फ्रिज म्हणून ओळख असलेल्या माठांची शहरासह ग्रामीण भागांत दुकाने लागली आहेत. मात्र ग्राहक खरेदी करीत नसल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. परिणामी हा व्यवसाय संकटात सापडला आहे. शहरातील कुंभार गल्ली परिसरातील माठविक्रेते हे स्वतः माठ तयार करून शहरी व ग्रामीण भागांत विक्री करतात. तसेच इतर विक्रेत्यांनाही पुरवठा करतात. बहुतांशजण पिढ्यान‌्पिढ्या हा व्यवसाय करीत आहेत. कुटुंबातील सर्व सदस्य या व्यवसायासाठी राबतात. उत्पन्नाचे दुसरे साधन नसल्याने त्यावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह भागत असतो. मात्र कोविड महामारीच्या वाढत्या प्रादुर्भावात हा व्यवसाय संकटात सापडला असल्याने छोटे-मोठे व्यावसायिक विक्रेते आर्थिक अडचणीत आले आहेत. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, अशी चिंता लागली असल्याचे माठविक्रेत्यांनी सांगितले.

कोरोनाच्या संकटामुळे व्यवसाय ठप्प

माठांची निर्मिती करून विक्री करणे हा आमचा पारंपरिक व्यवसाय आहे. गेल्या चार पिढ्यांपासून आम्ही हा व्यवसाय करतो. आमची मुले दुसऱ्या व्यवसायात होती; परंतु कोरोनाच्या संकटामुळे ती पुन्हा आपल्या पारंपरिक व्यवसायाकडे परतली आहेत.

गेल्या वर्षी उन्हाळ्यातच कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याने हा व्यवसाय पूर्णपणे डबघाईस आला होता. यंदाही कोविड महामारीच्या प्रादुर्भावामुळे उपासमारीचे चटके सोसावे लागतील की काय, अशी भीती माठविक्रेत्यांनी व्यक्त केली.

- कांतिलाल कुंभार

शेती अथवा नदीकाठावरून माती आणून तिला राख लावून तिला आकार देणे व भट्टी तापविणे अशीही माठ बनविण्याची प्रक्रिया आहे; परंतु कोरोनाच्या संकटामुळे माठविक्रीत मोठी घट झाली आहे. त्यामुळे खर्चही निघणार की नाही, अशी स्थिती आहे.

- छगन कुंभार