शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

शाळा यावर्षीही जूनमध्ये सुरू होण्याची चिन्हे नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:31 IST

मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यानंतर कोरोना बाधितांचे प्रमाण अत्यंत कमी झाल्याने नववी ते बारावीचे वर्ग शासनाने आखून दिलेले नियम व ...

मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यानंतर कोरोना बाधितांचे प्रमाण अत्यंत कमी झाल्याने नववी ते बारावीचे वर्ग शासनाने आखून दिलेले नियम व अटीनुसार चालू झाले होते. मात्र केवळ अडीच ते तीन महिने विद्यार्थी शाळेत गेले. जानेवारी महिन्यातही पाचवी ते आठवीचे वर्ग शासनाने नियम आखून देत सुरू केले. मात्र मार्च महिन्यात कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्याने कहर माजविल्यामुळे शिक्षक व विद्यार्थी कोरोना बाधित आढळून आले. त्यामुळे सरसकट सगळे वर्ग शासनाला बंद करावे लागले. नंतर एवढी भयावह परिस्थिती निर्माण झाली की, त्यामुळे यावर्षीची दहावीची परीक्षाही शासनाला रद्द करावी लागली. बारावी परीक्षेचेही भिजत घोंगडे पडले असून अद्यापही काही निर्णय झालेला नाही.

जे विद्यार्थी यावर्षी पहिलीला होते, त्यांनी शाळेचे तोंड न बघताच त्यांना दुसऱ्या वर्गात प्रवेश देण्यात आला आहे. इतर वर्गाचेही तसेच आहे. वर्षभर शाळेत न जाताही विद्यार्थ्यांना वरच्या वर्गात पाठविण्यात आले आहे. शाळा सुरू न झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे खूप मोठे शैक्षणिक नुकसान झाले आहे. शाळा बंद असल्यामुळे ऑनलाईनचा पर्यायी मार्ग असला तरी ग्रामीण भागामध्ये अनेक पालकांकडे अँड्रॉइड मोबाईल नसल्यामुळे त्यांच्या मुलांना ऑनलाईन क्लासही जॉईन करता आले नाही. परिणामी वर्षभर मुले घरीच असल्यामुळे त्यांच्या मनातील शिक्षणाविषयी मानसिकतेवर तर परिणाम झालाच आहे. परंतु पूर्ण वर्षच वाया गेल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसानही मोठ्या प्रमाणात झाले आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये वृद्ध व्यक्ती मोठ्या प्रमाणावर बाधित झाले होते. तर आता दुसऱ्या लाटेमध्ये तरुण वर्ग मोठ्या प्रमाणावर बाधित झाले. दुसऱ्या लाटेमध्ये मृत्यूचे प्रमाणही मोठ्या प्रमाणावर वाढले. आता तिसऱ्या लाटेचा परिणाम लहान मुलांवर होणार असून शासनाने लसीकरणाचा टप्पा वाढविला नाही, तर सलग दुसऱ्या वर्षीही विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यापासून वंचितच राहावे लागेल. म्हणून लसीकरणाचा टप्पा वाढविला तर बाधित होण्याचे प्रमाण कमी होऊन निदान दिवाळीनंतर तरी शाळा सुरू होतील, अशा प्रतिक्रिया पालकांमधून ऐकायला भेटत आहेत.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली असून लहान मुलांवर त्याचा सर्वाधिक परिणाम होणार आहे. मागील वर्षापासून शाळा सुरू झालेल्या नाहीत. त्यामुळे मुलांचे मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक नुकसान झाले आहे. शासनाने लसीकरणाचा वेग वाढविल्यास निदान दिवाळीनंतर तरी आमची मुले शाळेत जाऊ लागतील. म्हणून यापुढे तरी मुलांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळता येईल.

- दिनेश मटू माळी, पालक जयनगर. ता. शहादा.