शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

गुंजाळी, खरवड शिवारातून शेती साहित्याची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:25 IST

परिसरात पाऊस नसल्याने शेतकरी पिके जगविण्यासाठी कसरत करीत आहेत. त्यातच चोरट्यांनी उच्छाद मांडला असून, गुंजाळी व खरवड शिवारातून सुमारे ...

परिसरात पाऊस नसल्याने शेतकरी पिके जगविण्यासाठी कसरत करीत आहेत. त्यातच चोरट्यांनी उच्छाद मांडला असून, गुंजाळी व खरवड शिवारातून सुमारे ४० शेतकऱ्यांच्या सबमर्सिबल पंपाची केबल व इतर साहित्य चोरून नेले. नवीन केबल टाकण्यासाठी एका शेतकऱ्याला तीन हजार रुपये खर्च येतो. शिवाय केबल खरेदीचा खर्च वेगळा असतो. सद्य:स्थितीत पाऊस नसल्याने बागायती पिके जगविण्यासाठी शेतकऱ्यांना कसरत करावी लागत आहे. नवीन केबल टाकण्यासाठी दोन ते तीन दिवसांचा कालावधी जातो. त्यामुळे पिकांना वेळेवर पाणी दिले गेले नाही, तर नुकसान होऊ शकते. केबलसह शेती साहित्य चोरी करणारे व हे चोरीचे साहित्य विकत घेणाऱ्यांचे मोठे रॅकेट असल्याची शक्यता शेतकऱ्यांकडून वर्तविण्यात येत आहे. गेल्या तीन दिवसांत गुंजाळी, मोहिदा, उमरी, कढेल, मोड, खरवड येथील शेतकऱ्यांच्या केबलची चोरी झाली आहे. त्यात अनिल नारायण ठाकरे, उद्धव पाटील, सोमनाथ मोहन ठाकरे, प्रल्हाद भारती, युवराज ठाकरे, आनंदा राऊळ, नरेश चव्हाण, विष्णू पवार, भावसिंग ठाकरे, मोग्या माळी, सुरेश ठाकरे आदी ४० शेतकऱ्यांच्या केबल व इतर शेती साहित्याची चोरी झाली आहे. आधीच पाऊस नसल्याने शेतकरी संकटात आहेत. त्यात चोरट्यांचा उपद्रव वाढल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. पोलिसांनी चोरट्यांसह चोरीचे साहित्य विकत घेणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.