शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

विहिरीची जागा निश्चित नसतांना निघाले टेंडर, जि.प.स्थायी समितीत चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 12:38 IST

n  लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  ठाणेपाडा येथील आश्रम शाळेला पाणीपुरवठ्यासाठी आवश्यक असलेल्या विहीरीची जागाच निश्चित नसताना त्याचे टेंडर ...

n  लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  ठाणेपाडा येथील आश्रम शाळेला पाणीपुरवठ्यासाठी आवश्यक असलेल्या विहीरीची जागाच निश्चित नसताना त्याचे टेंडर निघाल्याचा अजब प्रकार जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभेत समोर आला. परंतु पाणी पुरवठा विभागाने नेहमीप्रमाणे नकारघंटा वाजवीत पळवाट शोधली. जिल्हा परिषदेची स्थायी समितीची सभा अध्यक्षा सिमा वळवी यांच्या अध्यक्षतेखाली ॲानलाईन झाली.  सभेला  उपाध्यक्ष राम रघुवंशी, महिला बालकल्याण सभापती निर्मला राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, सदस्य धनराज पाटील, देवमन पवार ,सी.के. पाडवी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रौंदळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भूपेंद्र बेडसे व अधिकारी ऑनलाईन उपस्थित होते.  आष्टे गटातील सदस्य देवमन पवार यांनी प्रश्न उपस्थित केला. ठाणेपाड्यात आदिवासी विकास विभागामार्फत ११ कोटी रुपये खर्चून आश्रम शाळेची इमारत उभी आहे. मात्र तेथे विद्यार्थ्यांसाठी पाणी नाही. पाणीपुरवठ्यासाठी शासनाकडून तीस लाखाचा निधी आला आहे मात्र विहिरीची जागा निश्चित नसताना त्याचे टेंडर मात्र निघाले असल्याचे त्यांनी सांगितले. आणि जर टेंडर काढले आहे तर मग कामही सुरू झालेले नाही. यावर पाणीपुरवठ्याची कार्यकारी अभियंता वळवी यांनी सांगितले की टेंडर निघालेले नाही. प्रस्ताव मंजूर होता मात्र वनविभागाने जागा नाकारली आहे. विहिरीसाठी पुन्हा सर्वेक्षण करून जागा निश्चित होईल यासाठी पुढील प्रक्रिया राबविली गेली. यावर मुख्य कार्यकारी अधिकारी गावडे यांनी ही फाईल मागवली असून ते स्वतः याची खात्री करून घेणार आहेत .पवार यांनी गुजरात मध्ये अंगणवाडी चे अनेक लाभार्थी व गरोदर महिला गेले असून त्यांचा आहार कोणाला दिला जातो याची चौकशी करावी कारण त्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचे त्यांनी सांगितले. आक्टोबर मध्ये ९७ टक्के आहाराचे वाटप झाले आहे. मात्र धडगाव व इतर ठिकाणी स्थलांतरित झालेल्या कुटुंबातील इतर सदस्य हा आहार घेऊन जात असल्याचे निदर्शनास आल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राठोड यांनी सांगितले. आष्टे गटातील अंगणवाडीतील सुपरवायझर यांच्या बदल्या झाल्याने या ठिकाणची पदे रिक्त असल्याने ते त्वरित भरावी अशी मागणी पवार यांनी केली. अध्यक्षा वळवी यांनी अंगणवाडी चा आहार हा १०० टक्के वाटप व्हावा यासाठी प्रयत्न करावा असे सांगितले. धनराज पाटील यांनी  रिक्त जागा  लवकर भरावेत अशी मागणी केली.