शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गाच्या पहिल्या व दुस:या टप्प्याची निविदा प्रक्रिया रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 13:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : विसरवाडी ते खेतिया या महामार्गाच्या केवळ तिस:या टप्प्याला चालना मिळाली आहे. पहिला व दुसरा टप्पा अद्यापही फारसा प्रगतीपथावर नसल्याची स्थिती आहे. यामुळे या महामार्गाच्या भवितव्याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. दरम्यान, शेवाळी ते नेत्रंग या महामार्गाच्या कामाची निविदा प्रक्रिया लवकरच मार्गी लागण्याची शक्यता आहे.नंदुरबार जिल्हला सात ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : विसरवाडी ते खेतिया या महामार्गाच्या केवळ तिस:या टप्प्याला चालना मिळाली आहे. पहिला व दुसरा टप्पा अद्यापही फारसा प्रगतीपथावर नसल्याची स्थिती आहे. यामुळे या महामार्गाच्या भवितव्याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. दरम्यान, शेवाळी ते नेत्रंग या महामार्गाच्या कामाची निविदा प्रक्रिया लवकरच मार्गी लागण्याची शक्यता आहे.नंदुरबार जिल्हला सात महामार्गानी जोडले जाणार आहे. त्यासाठी भारतमाला प्रकल्प तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाअंतर्गत त्यांना मंजुरी मिळाली आहे. नंदुरबारातून आधीच अमरावती-सुरत हा महामार्ग व ब:हाणपुर-अंकलेश्वर हा राज्यमार्ग गेलेला आहे. आता नव्याने विसरवाडी ते सेंधवा, शेवाळी ते नेत्रंग, सोनगीर ते विसरवाडी, सोनगीर ते धडगाव हे महामार्ग मंजुर झाले आहेत. यामुळे दळणवळणाच्या दृष्टीने नंदुरबार जिल्हा हा मध्यवर्ती व केंद्रबिंदू ठरणार आहे. सध्या केवळ विसरवाडी ते सेंधवा या महामार्गाअंतर्गत कोळदा ते खेतिया या टप्प्याचे काम प्रगतीपथावर आहे. याच महामार्गाचे पहिल्या दोन टप्प्यातील काम रेंगाळले आहे.तीन टप्प्यात कामविसरवाडी ते खेतिया दरम्यानच्या महामार्गाचे काम हे तीन टप्प्यात होणार आहे. पहिला टप्पा हा विसरवाडी ते काळंबा असा आहे. दुसरा टप्पा काळंबा ते कोळदा व तिसरा कोळदा ते खेतिया असा आहे. या तीन टप्प्याअंतर्गत हे काम दोन वर्षात पुर्ण करावयाचे आहे. परंतु सद्य स्थितीत केवळ तिस:या टप्प्याचे काम सुरू आहे. पहिला व दुसरा टप्पा हा निविदा प्रक्रियेत अडकला आहे.या महामार्गाअंतर्गत तीन ठिकाणी नवीन पुल बांधरण्यात येणार आहेत. त्यात नवापूर तालुक्यात एक, शहादा तालुक्यातील दोन पुलांचा समावेश आहे. त्यातील तापीवरील प्रकाशा पूल हा सर्वात मोठा राहणार आहे. त्या खालोखाल गोमाई नदीवरील डामरखेडा शिवारातील पुलाचा समावेश आहे. नवापूर तालुक्यातील पूल हा लहान राहणार आहे. लोणखेडा येथे गोमाई नदीवर आधीच दुसरा पूल पुर्ण झालेला आहे. टोलनाक्याबाबत उत्सूकताया महामार्गाचा टोलनाक्यांबाबत उत्सूकता लागून आहे. विसरवाडी ते नंदुरबार दरम्यान काळंबा व शहादा ते प्रकाशा दरम्यान एका ठिकाणी असे दोन ठिकाणी टोलनाके राहणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.    त्यासाठी मात्र अद्याप अनिश्चितता असून काही बदल होण्याची शक्यता आहे. निविदा प्रक्रियापहिले दोन टप्पे निविदा प्रक्रियेत अडकले आहेत. पैकी एका टप्प्याची निविदा प्रक्रिया मंजुर असून दुस:या टप्प्याची अंतिम टप्प्यात आहे. दोन निविदा मंजुर झाल्यानंतर एकाच वेळी कामाला सुरुवात होणार असल्याचे समजते.संपुर्ण काँक्रीटीकरणप्रस्तावीत हा संपुर्ण महामार्ग दहा मिटरचा राहणार आहे. याअंतर्गत संपुर्ण रस्ता हा काँक्रीटीकरणाचा राहणार आहे. गाव हद्दीत रस्त्याच्या दोन्ही बाजुला गटारी व स्लॅब ड्रेन राहणार आहे. अशा प्रकारचा संपुर्ण काँक्रीटीकरणाचा हा उत्तर महाराष्ट्रातील पहिलाच महामार्ग असल्याचे सांगण्यात आले.अंतर होणार कमीसुरतकडून इंदोरकडे जाणा:या वाहनांसाठी हा महामार्ग सोयीचा ठरणार आहे. आताच्या परिस्थितीत सुरतहून नवापूर, धुळे, शिरपूर, सेंधवामार्गे इंदोरला जावे लागते. हा महामार्ग झाल्यास सुरतहून नवापूर, विसरवाडी, नंदुरबार, शहादा, खेतिया मार्गे थेट मुंबई-आग्रा महामार्गाला सेंधवा येथे जोडला जाणार आहे. त्यामुळे वेळ आणि इंधनाचीही मोठी बचत होणार आहे. शिवाय विसरवाडी ते धुळे र्पयतची सुरत-अमरावती या महामार्गाची आणि धुळे ते सेंधवा या दरम्यान मुंबई-आग्रा महामार्गाची वाहतुकीचा ताण देखील कमी होणार आहे. यामुळे वाहनचालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. नंदुरबारातील वळण रस्त्यांचा प्रश्न मात्र रखडला आहे. आहे त्याच वळण रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील वाहतुकीची कोंडी आणखी वाढणार आहे. परिणामी शहरवासीयांना त्याचा त्रास सहन करावा लागणार आहे.विसरवाडी ते खेतिया या दरम्यानच्या महामार्गाच्या कामाला चालना मिळावी अशी मागणी होत आहे.प्रस्तावीत महामार्ग शेवाळी फाटय़ापासून सुरू होऊन धुळे जिल्ह्यातील निजामपूर, छडवेल, नंदुरबार, हातोडापूल मार्गे तळोदा, अक्कलकुवा, खापरमार्गे गुजरात हद्दीत प्रवेश करणार आहे. गुजरातमध्ये राजपिपला, डेडीयापाडा व नेत्रंग येथे हा महामार्ग संपणार आहे. नेत्रंग येथून जाणा:या प्रस्तावित एक्सप्रेसवेला तो जोडला जाणार आहे. यामुळे नाशिक, धुळे, जळगाव भागाकडून अहमदाबाद, राजस्थानकडे जाणा:या मालवाहू वाहनांसाठी हा महामार्ग अत्यंत सोयीचा ठरणार आहे. हा महामार्ग पूर्वी शेवाळी फाटय़ापासूनच चौपदरी होता. परंतु नंतर त्यात बदल करण्यात आला. आता शेवाळी ते तळोदा दरम्यान दहा मिटर तर तळोदापासून पुढे चौपदरी राहणार आहे. या महामार्गासाठीच्या जमीन संपादनाचा वाद देखील गाजला होता.