शहरं
Join us  
Trending Stories
1
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
2
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
3
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
4
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
5
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
6
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
7
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल
8
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
9
"मोदी-फडणवीसांच्या आईवर बोलले गेले, तेव्हा शरद पवारांनी फोन केला नाही, मी माफी कशासाठी मागू"
10
सरकारी नोकरी मिळवण्याचा गोल्डन चान्स; इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरती
11
सर्वच नावं परप्रांतीय कशे? राजुऱ्यातील ६,८५३ मतदारांच्या वोट चोरीच्या आरोपांवर आयोगाकडून थंड प्रतिसाद
12
"पाकिस्तान, बांगलादेशमध्ये घरात असल्यासारखं वाटतं’’, काँग्रेसच्या सॅम पित्रोदा यांचं विधान, Gen-Z ला केलं असं आवाहन    
13
IPO असावा तर असा! ७४% प्रीमिअमवर बंपर लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल
14
सर्वपित्री अमावास्या २०२५: सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण; त्यादिवशी श्राद्धविधी करावे की नाही?
15
E 20 पेट्रोलमुळे करोडोंची फेरारी खराब झाली; युजरने विचारले, गडकरी घेणार का जबाबदारी?  
16
Video:"...तर मंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागेल"; DCM अजित पवारांनी पक्षातील नेत्यांचे कान टोचले
17
आयफोन १६ खरेदी करण्याची योग्य वेळ; २७ हजारांहून अधिक रुपये वाचतील, कुठे सुरू आहे ऑफर?
18
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
19
‘मला एकटे पाडण्यासाठी मोठा राजकीय डाव शिजतोय’; मनोज जरांगे यांचा खळबळजनक दावा
20
कमाल झाली राव! वजन कमी होईल अन् चेहऱ्यावर ग्लो येईल; रोज 'हे' फळ खाल्ल्याचे 'जादुई' फायदे

महामार्गाच्या पहिल्या व दुस:या टप्प्याची निविदा प्रक्रिया रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 13:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : विसरवाडी ते खेतिया या महामार्गाच्या केवळ तिस:या टप्प्याला चालना मिळाली आहे. पहिला व दुसरा टप्पा अद्यापही फारसा प्रगतीपथावर नसल्याची स्थिती आहे. यामुळे या महामार्गाच्या भवितव्याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. दरम्यान, शेवाळी ते नेत्रंग या महामार्गाच्या कामाची निविदा प्रक्रिया लवकरच मार्गी लागण्याची शक्यता आहे.नंदुरबार जिल्हला सात ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : विसरवाडी ते खेतिया या महामार्गाच्या केवळ तिस:या टप्प्याला चालना मिळाली आहे. पहिला व दुसरा टप्पा अद्यापही फारसा प्रगतीपथावर नसल्याची स्थिती आहे. यामुळे या महामार्गाच्या भवितव्याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. दरम्यान, शेवाळी ते नेत्रंग या महामार्गाच्या कामाची निविदा प्रक्रिया लवकरच मार्गी लागण्याची शक्यता आहे.नंदुरबार जिल्हला सात महामार्गानी जोडले जाणार आहे. त्यासाठी भारतमाला प्रकल्प तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाअंतर्गत त्यांना मंजुरी मिळाली आहे. नंदुरबारातून आधीच अमरावती-सुरत हा महामार्ग व ब:हाणपुर-अंकलेश्वर हा राज्यमार्ग गेलेला आहे. आता नव्याने विसरवाडी ते सेंधवा, शेवाळी ते नेत्रंग, सोनगीर ते विसरवाडी, सोनगीर ते धडगाव हे महामार्ग मंजुर झाले आहेत. यामुळे दळणवळणाच्या दृष्टीने नंदुरबार जिल्हा हा मध्यवर्ती व केंद्रबिंदू ठरणार आहे. सध्या केवळ विसरवाडी ते सेंधवा या महामार्गाअंतर्गत कोळदा ते खेतिया या टप्प्याचे काम प्रगतीपथावर आहे. याच महामार्गाचे पहिल्या दोन टप्प्यातील काम रेंगाळले आहे.तीन टप्प्यात कामविसरवाडी ते खेतिया दरम्यानच्या महामार्गाचे काम हे तीन टप्प्यात होणार आहे. पहिला टप्पा हा विसरवाडी ते काळंबा असा आहे. दुसरा टप्पा काळंबा ते कोळदा व तिसरा कोळदा ते खेतिया असा आहे. या तीन टप्प्याअंतर्गत हे काम दोन वर्षात पुर्ण करावयाचे आहे. परंतु सद्य स्थितीत केवळ तिस:या टप्प्याचे काम सुरू आहे. पहिला व दुसरा टप्पा हा निविदा प्रक्रियेत अडकला आहे.या महामार्गाअंतर्गत तीन ठिकाणी नवीन पुल बांधरण्यात येणार आहेत. त्यात नवापूर तालुक्यात एक, शहादा तालुक्यातील दोन पुलांचा समावेश आहे. त्यातील तापीवरील प्रकाशा पूल हा सर्वात मोठा राहणार आहे. त्या खालोखाल गोमाई नदीवरील डामरखेडा शिवारातील पुलाचा समावेश आहे. नवापूर तालुक्यातील पूल हा लहान राहणार आहे. लोणखेडा येथे गोमाई नदीवर आधीच दुसरा पूल पुर्ण झालेला आहे. टोलनाक्याबाबत उत्सूकताया महामार्गाचा टोलनाक्यांबाबत उत्सूकता लागून आहे. विसरवाडी ते नंदुरबार दरम्यान काळंबा व शहादा ते प्रकाशा दरम्यान एका ठिकाणी असे दोन ठिकाणी टोलनाके राहणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.    त्यासाठी मात्र अद्याप अनिश्चितता असून काही बदल होण्याची शक्यता आहे. निविदा प्रक्रियापहिले दोन टप्पे निविदा प्रक्रियेत अडकले आहेत. पैकी एका टप्प्याची निविदा प्रक्रिया मंजुर असून दुस:या टप्प्याची अंतिम टप्प्यात आहे. दोन निविदा मंजुर झाल्यानंतर एकाच वेळी कामाला सुरुवात होणार असल्याचे समजते.संपुर्ण काँक्रीटीकरणप्रस्तावीत हा संपुर्ण महामार्ग दहा मिटरचा राहणार आहे. याअंतर्गत संपुर्ण रस्ता हा काँक्रीटीकरणाचा राहणार आहे. गाव हद्दीत रस्त्याच्या दोन्ही बाजुला गटारी व स्लॅब ड्रेन राहणार आहे. अशा प्रकारचा संपुर्ण काँक्रीटीकरणाचा हा उत्तर महाराष्ट्रातील पहिलाच महामार्ग असल्याचे सांगण्यात आले.अंतर होणार कमीसुरतकडून इंदोरकडे जाणा:या वाहनांसाठी हा महामार्ग सोयीचा ठरणार आहे. आताच्या परिस्थितीत सुरतहून नवापूर, धुळे, शिरपूर, सेंधवामार्गे इंदोरला जावे लागते. हा महामार्ग झाल्यास सुरतहून नवापूर, विसरवाडी, नंदुरबार, शहादा, खेतिया मार्गे थेट मुंबई-आग्रा महामार्गाला सेंधवा येथे जोडला जाणार आहे. त्यामुळे वेळ आणि इंधनाचीही मोठी बचत होणार आहे. शिवाय विसरवाडी ते धुळे र्पयतची सुरत-अमरावती या महामार्गाची आणि धुळे ते सेंधवा या दरम्यान मुंबई-आग्रा महामार्गाची वाहतुकीचा ताण देखील कमी होणार आहे. यामुळे वाहनचालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. नंदुरबारातील वळण रस्त्यांचा प्रश्न मात्र रखडला आहे. आहे त्याच वळण रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील वाहतुकीची कोंडी आणखी वाढणार आहे. परिणामी शहरवासीयांना त्याचा त्रास सहन करावा लागणार आहे.विसरवाडी ते खेतिया या दरम्यानच्या महामार्गाच्या कामाला चालना मिळावी अशी मागणी होत आहे.प्रस्तावीत महामार्ग शेवाळी फाटय़ापासून सुरू होऊन धुळे जिल्ह्यातील निजामपूर, छडवेल, नंदुरबार, हातोडापूल मार्गे तळोदा, अक्कलकुवा, खापरमार्गे गुजरात हद्दीत प्रवेश करणार आहे. गुजरातमध्ये राजपिपला, डेडीयापाडा व नेत्रंग येथे हा महामार्ग संपणार आहे. नेत्रंग येथून जाणा:या प्रस्तावित एक्सप्रेसवेला तो जोडला जाणार आहे. यामुळे नाशिक, धुळे, जळगाव भागाकडून अहमदाबाद, राजस्थानकडे जाणा:या मालवाहू वाहनांसाठी हा महामार्ग अत्यंत सोयीचा ठरणार आहे. हा महामार्ग पूर्वी शेवाळी फाटय़ापासूनच चौपदरी होता. परंतु नंतर त्यात बदल करण्यात आला. आता शेवाळी ते तळोदा दरम्यान दहा मिटर तर तळोदापासून पुढे चौपदरी राहणार आहे. या महामार्गासाठीच्या जमीन संपादनाचा वाद देखील गाजला होता.