शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
3
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
4
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
5
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
6
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
7
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
8
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
9
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
10
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
11
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
12
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
13
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
14
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
15
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
16
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
17
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
18
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
19
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
20
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी

नंदुरबारातील तापमान चाळीशी खाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 11:36 IST

दिलासा : ताशी २२ किमी गतीने वाहताय वारे, धुळीची समस्या निर्माण होणार

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नंदुरबारात सध्या वेगवान वाऱ्यांचा प्रभाव वाढला आहे़ शनिवार व रविवारी साधारणत: ताशी १८ ते २२ किमी गतीने वारे वाहत होते़ पुढील एक ते दोन दिवस वाऱ्यांचा असाच प्रभाव कायम राहणार आहे़ एकीकडे वाऱ्यांचा प्रभाव वाढत असताना तापमान चाळीशीच्या खाली गेलेले दिसून आले़ शनिवारी ३९ तर रविवारी ३९.८ इतके कमाल तापमानाची नोंद झाली़नंदुरबारातील तापमानाात किंचित घट बघायला मिळत आहे़ आठवड्यापूर्वी तब्बल ४२ अंशाच्या घरात गेलेले कमाल तापमान दोन दिवसांपासून ३९ अंशावर स्थिर आहे़ त्यामुळे काही प्रमाणात का होईना नागरिकांना वाढत्या उकाड्यापासून दिलासा मिळताना दिसत आहे़ परंतु ही स्थिती फार काळ राहणार नसल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात येत आहे़उत्तरेकडील जम्मू-काश्मीर परिसरात दोन ठिकाणी वेस्टर्न डिस्टर्बन्स निर्माण झालेला आहे़ तो हळूहळू पुर्वेकडे सरकत आहे़ त्यामुळे भारताच्या पूर्व भागापासून ते दक्षिणेपर्यंत ट्रफ रेषा तयार झालेली आहे़ या ट्रफ रेषेत बराचसा विदर्भ व मराठवाड्याचाही भाग आलेला आहे़ त्यामुळे विदर्भ, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे़ अशा वातावरणीय बदलामुळे राज्यभरात वाºयांच्या वेगात वाढ झालेली असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात येत आहे़ नंदुरबारात ताशी १८ ते २२ किमी वेगाने वारे वाहत असल्याने तापमानात किंचित घट होऊन नागरिकांना उष्णतेपासून काहिसा दिलासा मिळत आहे़ एक ते दोन दिवस वाºयांचा वेग कायम राहून उत्तर तसेच मध्य महाराष्ट्रात तापमानात पुन्हा वाढ होणार असल्याचे हवामान तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे़ग्रामीण भागात धुळीची समस्याशहरी भागासह ग्रामीण भागात वेगवान वारे वाहत असल्याने शेतकºयांच्या आंबा बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचे तळोद्यातील शेतकºयांकडून सांगण्यात आले़ त्याच प्रमाणे ग्रामीण भागात कच्चे रस्ते असल्याने अशा ठिकाणी धुळीची समस्या निर्माण झालेली होती़राजस्थानात उष्ण लहरीदरम्यान, सध्या राजस्थान, कच्छ, सौराष्ट आदी भागांमध्ये उष्ण वाºयांचा प्रभाव निर्माण झालेला आहे़ आठवड्यापूर्वी मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रात निर्माण झालेला हा प्रभाव काहिसा ओसरलेला दिसून येत आहे़ मराठवाडा, विदर्भ तसेच पूर्वीकडील ‘सेव्हन सिस्टर’ राज्यांमध्ये निर्माण झालेल्या पावसाळी वातावरणामुळे राज्यातील काही भागात तापमानात घट होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे़दरम्यान काही दिवसातच पुन्हा तापमानात वाढ होणार असल्याने नागरिकांकडून विविध उपाय योजना करण्यात येत आहेत़ सध्या वातावरणात २५ ते ३० टक्के आद्रता राहत असल्याने उकाड्यात वाढ झालेली दिसून येत आहे़ त्यामुळे साहजिकच नागरिकांकडून पंखे, कुलर, एसी आदी साधनांचा वापर करण्यात येत आहे़