शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
2
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
3
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
4
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
5
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
6
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
7
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
8
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
9
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
10
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
11
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
12
कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
13
अरे बापरे! एका छोट्याशा चुकीमुळे होऊ शकतो प्रेशर कुकरचा भीषण स्फोट; सेफ्टीसाठी 'हे' करा
14
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
15
Astro Tips: मुलांची दहावी, बारावी झाली की पालकांनी ग्रहदशा जाणून घेत मुलांचे करिअर ठरवणे उत्तम!
16
आयकर अधिकारी सांगून छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी; युवक अटकेत
17
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  
18
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
19
वेळीच व्हा सावध! टूथपेस्टमुळे होऊ शकतो कॅन्सर; 'हे' केमिकल बेतेल जीवावर, आताच घ्या काळजी
20
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू

नंदुरबारातील तापमान चाळीशी खाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 11:36 IST

दिलासा : ताशी २२ किमी गतीने वाहताय वारे, धुळीची समस्या निर्माण होणार

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नंदुरबारात सध्या वेगवान वाऱ्यांचा प्रभाव वाढला आहे़ शनिवार व रविवारी साधारणत: ताशी १८ ते २२ किमी गतीने वारे वाहत होते़ पुढील एक ते दोन दिवस वाऱ्यांचा असाच प्रभाव कायम राहणार आहे़ एकीकडे वाऱ्यांचा प्रभाव वाढत असताना तापमान चाळीशीच्या खाली गेलेले दिसून आले़ शनिवारी ३९ तर रविवारी ३९.८ इतके कमाल तापमानाची नोंद झाली़नंदुरबारातील तापमानाात किंचित घट बघायला मिळत आहे़ आठवड्यापूर्वी तब्बल ४२ अंशाच्या घरात गेलेले कमाल तापमान दोन दिवसांपासून ३९ अंशावर स्थिर आहे़ त्यामुळे काही प्रमाणात का होईना नागरिकांना वाढत्या उकाड्यापासून दिलासा मिळताना दिसत आहे़ परंतु ही स्थिती फार काळ राहणार नसल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात येत आहे़उत्तरेकडील जम्मू-काश्मीर परिसरात दोन ठिकाणी वेस्टर्न डिस्टर्बन्स निर्माण झालेला आहे़ तो हळूहळू पुर्वेकडे सरकत आहे़ त्यामुळे भारताच्या पूर्व भागापासून ते दक्षिणेपर्यंत ट्रफ रेषा तयार झालेली आहे़ या ट्रफ रेषेत बराचसा विदर्भ व मराठवाड्याचाही भाग आलेला आहे़ त्यामुळे विदर्भ, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे़ अशा वातावरणीय बदलामुळे राज्यभरात वाºयांच्या वेगात वाढ झालेली असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात येत आहे़ नंदुरबारात ताशी १८ ते २२ किमी वेगाने वारे वाहत असल्याने तापमानात किंचित घट होऊन नागरिकांना उष्णतेपासून काहिसा दिलासा मिळत आहे़ एक ते दोन दिवस वाºयांचा वेग कायम राहून उत्तर तसेच मध्य महाराष्ट्रात तापमानात पुन्हा वाढ होणार असल्याचे हवामान तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे़ग्रामीण भागात धुळीची समस्याशहरी भागासह ग्रामीण भागात वेगवान वारे वाहत असल्याने शेतकºयांच्या आंबा बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचे तळोद्यातील शेतकºयांकडून सांगण्यात आले़ त्याच प्रमाणे ग्रामीण भागात कच्चे रस्ते असल्याने अशा ठिकाणी धुळीची समस्या निर्माण झालेली होती़राजस्थानात उष्ण लहरीदरम्यान, सध्या राजस्थान, कच्छ, सौराष्ट आदी भागांमध्ये उष्ण वाºयांचा प्रभाव निर्माण झालेला आहे़ आठवड्यापूर्वी मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रात निर्माण झालेला हा प्रभाव काहिसा ओसरलेला दिसून येत आहे़ मराठवाडा, विदर्भ तसेच पूर्वीकडील ‘सेव्हन सिस्टर’ राज्यांमध्ये निर्माण झालेल्या पावसाळी वातावरणामुळे राज्यातील काही भागात तापमानात घट होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे़दरम्यान काही दिवसातच पुन्हा तापमानात वाढ होणार असल्याने नागरिकांकडून विविध उपाय योजना करण्यात येत आहेत़ सध्या वातावरणात २५ ते ३० टक्के आद्रता राहत असल्याने उकाड्यात वाढ झालेली दिसून येत आहे़ त्यामुळे साहजिकच नागरिकांकडून पंखे, कुलर, एसी आदी साधनांचा वापर करण्यात येत आहे़