शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

शिक्षक बदल्यांना सलग दुसऱ्या वर्षी बसला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:32 IST

नंदुरबार : कोरोनामुळे जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या यंदाही रखडण्याची शक्यता आहे. सलग दुसऱ्या वर्षी बदल्या होणार नसल्याने दुर्गम भागातील ...

नंदुरबार : कोरोनामुळे जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या यंदाही रखडण्याची शक्यता आहे. सलग दुसऱ्या वर्षी बदल्या होणार नसल्याने दुर्गम भागातील बदलीपात्र शिक्षकांमध्ये नाराजीची भावना आहे. यंदा बदलीच्या धोरणात काही प्रमाणात बदल झालेला आहे. त्यामुळे शिक्षकांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या.

शासनाने कोरोनाचे कारण देऊन ३० जूनपर्यंत कुठल्याही प्रवर्गाच्या बदल्या करू नये असे आदेश काढले आहेत. त्यामुळे सर्वच कर्मचाऱ्यांच्या बदल्या यंदा रखडल्या आहेत. जिल्ह्यात अर्थात जिल्हा परिषदेअंतर्गत सर्वाधिक असलेल्या आणि गाजणाऱ्या बदल्यांमध्ये प्राथमिक शाळा शिक्षकांचा समावेश असतो. गेल्या दोन वर्षांपासून या शिक्षकांच्या बदल्याच झालेल्या नाहीत. त्यामुळे शिक्षकांची दुर्गम अर्थात अवघड भागातील सेवा कालावधी वाढून त्याच्या बदल्यांची प्रक्रिया लांबणार आहे.

ऑनलाईन पोर्टल

प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांसाठी चार वर्षांपूर्वी ऑनलाईन पोर्टल सुरू करण्यात आले होते. त्यानुसार थेट राज्यस्तरावरूनच बदली प्रक्रिया राबविली जात होती. त्याला सुरुवातीला शिक्षक संघटनांचा विरोध झाला. परंतु या प्रक्रियेत मानवी हस्तक्षेप अगदीच कमी आणि पारदर्शकता अधिक राहत असल्याने शिक्षक संघटनांनी देखील या प्रक्रियेला स्वीकारले. त्यानुसार दोन वर्ष अर्थात २०१७-१८ व २०१८-१९ या वर्षात बदल्या झाल्या. गेल्या वर्षी अर्थात २०२० मध्ये बदल्या कोरोनामुळे होऊ शकल्या नाहीत. यंदाही तीच स्थिती आहे.

अवघड व सोपे क्षेत्र

ऑनलाईन बदली प्रक्रिया तयार करताना जिल्ह्यातील अवघड व सोपे क्षेत्र ठरविण्यात आले. त्यावरून देखील अनेकवेळा वाद झाले. त्यात वेळोवेळी बदल देखील झाले. ज्यांनी कधीही अवघड क्षेत्रात सेवा केली नाही त्यांना त्या भागात बदली करून जाणे आवश्यकच होते. आता नाही तर पुढे कधीतरी जावे लागेल या भावनेतून अनेकांनी अवघड क्षेत्रात बदली करून घेतली.

किमान तीन वर्ष अवघड भागात सेवा झाल्यानंतर सोप्या भागात सेवा करण्यास त्यांना नंतरच्या कालावधीत सोयीचे ठरणार आहे. मात्र आता दोन वर्षांपासून बदल्या रखडल्याने त्यांचा त्या भागातील सेवा कालावधी देखील वाढणार अशी शक्यता आहे.

शिक्षकच करतात बदल्या...

शिक्षकच शिक्षकांच्या बदल्या करतात असे म्हटल्यास वावगे होणार नाही. कारण पोर्टलवर एका शिक्षकाला २० पर्याय द्यावे लागतात. एकमेकांना खो देखील या माध्यमातून दिला जातो. त्यामुळे शिक्षकांना आपल्या आवडीच्या २० पैकी एका ठिकाणी हमखास बदली मिळतेच अशी सोय या पोर्टलमध्ये आहे.

यंदा काही प्रमाणात बदल

यंदा बदल्यांच्या ऑनलाईन पोर्टलमध्ये काही प्रमाणात बदल झालेला आहे. त्यामुळे या बदलाविषयी शिक्षकांमध्ये उत्सुकता होती. परंतु बदल्याच रद्द झाल्याने ती आता पुन्हा ताणली गेली आहे.

आंतरजिल्हा बदल्यांना फायदा

पूर्वी आंतरजिल्हा बदल्या करतांना शिक्षकांना मोठा खटाटोप करावा लागत होता. वेळ व पैसा वाया जात होता. परंतु ऑनलाईन पोर्टलमुळे अनेक शिक्षकांचे आपल्या जिल्ह्यात सेवा करण्याचे स्वप्न पूर्ण झाले. गेल्या चार वर्षांपासून या बदल्या होत असल्याने शिक्षकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.