शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
4
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
5
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
6
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
7
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?
8
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
9
धक्कादायक! "लग्न ठरल्यानंतर सोनम दिवसातून फक्त..."; राजा रघुवंशीच्या मित्राचा मोठा खुलासा
10
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
11
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
12
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
13
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
14
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
15
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
16
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
18
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
19
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
20
Air India Plane Crash Insurance Claim : अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?

खरीप हंगामात यंदा २ लाख ७७ हजार हेक्टरचे उद्दीष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 12:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी तयारी केली असून बाजारात बियाणे व खते मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी तयारी केली असून बाजारात बियाणे व खते मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. साधारणत: २ लाख ७७ हजार हेक्टरवर पेरणी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, शेतकऱ्यांनी एवढ्यात पेरणीची घाई करू नये असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे. दरम्यान, उन्हाळी हंगामात १९ हजार हेक्टरवरील पीकं लॉकडाऊनमुळे बाजारपेठ उपलब्ध न झाल्याने हातची गेल्याचे चित्र आहे.सर्वसाधारणपणे ७ जूनपासून पावसाळा सुरू होत असतो. गेल्या तीन दिवसांपासून झालेला पाऊस हा मान्सूनपूर्व पाऊस होता. जमिनीत बºयापैकी ओल करणारा पाऊस असला तरी पेरणीयोग्य नसल्याचा निर्वाळा आधीच कृषी विभागाने दिलेला आहे. खरीपाच्या पार्श्वभुमीवर बाजारात विविध पिकांचे बियाणे व खते उपलब्ध झाली आहेत. कृषी विभागाने मागणी केलेल्या आवंटनाप्रमाणे त्याची उपलब्धता झाली असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.सर्वाधिक कापूसचे क्षेत्रजिल्ह्यात खरीपाचे सर्वसाधारण २ लाख ७७ हजार ८०५ हेक्टर क्षेत्र आहे. त्यात सर्वाधिक क्षेत्र हे कापूस पिकाचे १ लाख ६ हजार इतके आहे. त्या खालोखाल सोयाबीनचे २७ हजार ८९ हेक्टर क्षेत्र आहे. भाताचे २० हजार ८९५, ज्वारीचे ३० हजार १२६, मकाचे ३१ हजार ९२८, उडीदाचे १२ हजार ६६८, ऊसचे १० हजार ८८१ हेक्टर क्षेत्र आहे. याशिवाय बाजरी, तूर, मूग, भुईमूग, तीळ, सूर्यफूल यांचेही क्षेत्र बºयापैकी आहे.३८ हजार क्विंटल बियाणेखरीप हंगामासाठी साधारणत: ३८ हजार ६६८ क्विंटल बियाणे उपलब्ध असल्याचा कृषी विभागाचा दावा आहे. सध्या बियाण्यांची मागणी मर्यादीत स्वरूपात असल्याचे विक्रेत्यांचे म्हणने आहे. बी.टी.कापसाचे साधारणत: अडीच हजार क्विटल बियाणे उपलब्ध आहेत. महाबीज आणि खाजगी कंपन्यांकडून विविध वाणांचे बियाणे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यात महाबिजकडून १२ हजार ३८८ तर खाजगी कंपनींकडून २६ हजार २८० क्विंटल बियाण्यांचा समावेश आहे.खताचे आवंटन मंजूरखतांची उपलब्धता देखील बºयापैकी आहे. युरियाची सर्वाधिक ७० हजार २६० मे.टन मागणी करण्यात आली आहे. त्यापैकी ४७ हजार ३०० मे.टन आवंटन मंजूर करण्यात आले आहे. सद्य स्थितीत ४९ हजार ३०३ मे.टन युरिया उपलब्ध आहे. अमोनियम सल्फेटचा ४१५ मे.टन साठा, एमओपीची ७,८४० मे.टन मागणी असून ९,८०० मे.टन आवंटन मंजूर झाले आहे. एकूण ११, ४०९ मे.टन उपलब्ध आहे. डीएपीचे ६, ११५ मे.टन खत उपलब्ध आहे. एसएसपीचे ११,५०० मे.टन मागणी आहे. त्यापैकी ३ हजार २३ मे.टन उपलब्ध असून एकुण २०, १७३ मे.टन साठा उपलब्ध आहे. संयुक्त खताची मागणी १६,७१० मे.टन होती त्यापैकी १९,४८० मे.टन मंजूर झाले. आधीचे ३,४४४ मे.टन एकूण २२,९२४ मे.टन साठा उपलब्ध आहे. मिश्रखताचे ५३६ मे.टन खतसाठा उपलब्ध आहे. एकुण खतांची १ लाख १८ हजार १६० मे.टन मागणी असून त्यापैकी ९८ हजार ९३० मे.टन आवंटन मंजूर आहे. एकुण १ लाख १० हजार ८७५ मे.टन खत साठा उपलब्ध आहे.उन्हाळी हंगाम लॉकडाऊनमध्येजिल्ह्यात १९ हजार ३४० हेक्टरवर उन्हाळी पिके होती उन्हाळी बाजरी १ हजार ४२६ हेक्टर, उन्हाळी मका १ हजार ६१९, मूग १ हजार ४४४, भूईमूग १ हजार ४१, सूर्यफूल १८२, बार्टी ४१ या धान्य, कडधान्य आणि तेलबिया पिकांची एकूण ६ हजार ३५५ हेक्टरवर लागवड करण्यात आली होती़ दुसरीकडे फळे आणि भाजीपाला पिकांची एकूण १२ हजार ९८५ हेक्टर क्षेत्रात लागवड झाली होतीे़ यात कांदा ७९०, वांगी ४७, मिरची ७५, भाजीपाला ४३२, टरबूज ८३४, केळी २७७, पपई ६७ तर ऊस ४ हजार ५८ हेक्टर क्षेत्रात लागवड करण्यात आला़ एकूण १२ हजार ९८५ हेक्टरवर ही पिके होती विशेष बाब म्हणजे यंदाही उन्हाळी पिकातून ज्वारी, तीळ, सोयाबीन हे बाद झाले असल्याचे दिसून आले़ तर लागवड पिकांचे क्षेत्र हे कमीच आहे़