शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
2
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
3
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
4
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
5
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
6
अमेरिकेच्या टॅरिफचा फटका! सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी कोसळला, 'या' क्षेत्राला सर्वाधिक धक्का
7
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
8
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
9
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
10
Ganesh Chaturthi 2025:वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मोठ्या मुलानेच गणपती आणायचा? पंचांगकर्ते सोमण सांगतात... 
11
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; सासरच्यांनी पकडल्यावर मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून...,
12
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
13
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
14
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
15
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
16
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
17
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
18
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
19
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
20
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा

सततच्या पाणीटंचाईने त्रस्त गावांना मिळाला तापीचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2019 12:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा प्रशासनाचा निर्धार आणि लोकप्रतिनिच्या सहकायार्मुळे नंदुरबार तालुक्यातील भादवड, न्याहली, बलदाणे, सातुर्के, कंड्रे व ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा प्रशासनाचा निर्धार आणि लोकप्रतिनिच्या सहकायार्मुळे नंदुरबार तालुक्यातील भादवड, न्याहली, बलदाणे, सातुर्के, कंड्रे व निंभेल गावाची पाणी समस्या दूर झाली आहे. जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने तापी नदीवरून सुरू केलेल्या तात्पुरत्या नळपाणीपुरवठा योजनेमुळे गेल्या तीन वषार्पासून टंचाईचा सामना करणा:या या गावातील नागरिकांना आणि पशुधनाला उन्हाळ्यातही पाणी उपलब्ध झाले आहे.नंदुरबार तालुक्यातील भादवड, न्याहली, बलदाणे, सातुर्के, कंड्रे व निंभेल या गावात गत तीन ते चार वर्षांपासून गावकरीभीषण पाणी टंचाईचा सामना करीत होते. दोन वर्षांपासून पर्जन्यमान अगदीच कमी झाल्याने भूजल पातळी अगदीच खोल गेली आहे. गावातील सर्वच विहिरी व विंधनविहिरीआटल्या असून परिसरातील सर्वच बंधारे कोरडे पडले आहेत. या गावांना पाण्याचा आधार असलेले बलदाणे धरणही पूर्णत: आटले आहे. परिणामीपाणीटंचाईची भीषणता आणखीनच वाढली होती. या उन्हाळ्यात गावक:यांसमोरगावे सोडण्याचे संकट उभे ठाकले होते.या भागात दुष्काळामुळे पाण्याची समस्या निर्माण झाल्याने नागरिकांचे स्थलांतर आणि पशुधनाचे पालनही मोठी समस्या झाली होती. मात्र शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून घेत या गावांसाठी पाणी पुरवठा योजना राबविण्यात आली. तापी नदीपासून 12 किलोमीटर लांबीच्या जलवाहिन्या टाकून या गावांना पाणी पुरवठा करण्यात आला.या गावांच्या जवळपास कोणतेच पाण्याचे स्त्रोत नसल्याने, दूरवर असलेल्या तापी नदीच्या पात्रातून पाणी उचल करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. जिल्हा परिषद, जिल्हा प्रशासन, लोक प्रतिनिधी व ग्रामपंचायत स्तरावरील तातडीच्यापाणीटंचाई निवारणासाठी असलेल्या सर्व निधी, स्थानिक विकास कार्यक्रम आणि सीएसआरच्या माध्यमातून उपलब्ध होणा?्या निधींचाएकत्रित वापर करूनयोजना राबविण्यात आली.प्रथम टप्प्यात तापीनदीच्या किनारी विंधनविहीर करून पाण्याची उचल करण्यात आली आणि सुमारे नऊ किलोमीटर जलवाहिन्या टाकून भादवड येथील मोठ्या विहिरीत पाणीसाठा करून या गावाची पाणी समस्या दूर करण्यात आली. त्याच विहिरीतून उद्भव घेऊन  न्याहली, बलदाणे, व कार्ली या गावांपयर्ंत साडेचार किलोमीटर जलवाहिन्या टाकून तेथील विहिरीपयर्ंत पाणी नेण्यात आले.जलवाहिन्यांच्या मार्गात रेल्वे रूळ येत असल्याने केंद्रीयरेल्वे प्रशासनानेही पाणीटंचाईचेगांभीर्य लक्षात घेता जलवाहिन्या टाकण्याची परवानगी तातडीने दिली. या चारही गावातील एकत्रित 9,800 लोकसंख्येसाठी यशस्वीपणे पाणीपुरवठा करण्यात आला आहे.मौजे सातुर्के येथील 1,250 लोकसंख्येला व निंभेल व कंड्रे या गावातील एकत्रित 2,640 लोकसंख्येलाही अशाच प्रकारेपाणीपुरवठा करण्यात आला.शासनाच्या विविध निधींचामाध्यमातून तातडीने योजना राबविली गेल्यानेदुष्काळने त्रस्त झालेल्या नागरिकांच्या घरापयर्ंत पिण्याचे पाणी पोहोचविण्यात शासनाला यश आले आहे. भर उन्हाळ्यातपिण्याचे पुरेशे पाणी व पशुधनाच्या संगोपनासाठी लागणारे पाणी उपलब्ध झाल्याने या गावातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.