शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

‘तापी-बुराई’ला अडथळ्यांचा डोंगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 11:36 IST

20 वर्षात पहिला टप्पाही पूर्ण नाही : वनजमीन, खाजगी जमीन आणि वीज बिलांचा प्रश्न

मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : तापी पाटबंधारे विकास महामंडळाने फेब्रुवारी 1999 मध्ये मंजूर केलेली तापी-बुराई उपसा योजना अडचणींच्या डोंगरात उभी आहे. साठवण तलावांसाठी वन जमीनी मिळविण्याचा प्रश्न, निधीची अपुरी तरतूद, पंपगृहांसाठी लागणारी विजेची तरतूद आदी समस्या कायम राहणार आहे. त्यामुळे ही योजना एक मृगजळच ठरते की काय अशी अवस्था आहे. 20 वर्षात पहिला टप्पाही पुर्ण होऊ शकला नाही. यावरूनच या योजनेचे भवितव्य स्पष्ट होते.नंदुरबार, साक्री व शिंदखेडा तालुक्यातील अवर्षण प्रवण गावांसाठी जिवनदायी ठरणारी तापी-बुराई योजनेस तापी पाटबंधारे विकास महामंडळाने 2 फेब्रुवारी 1999 ला मान्यता दिली होती. नदीजोड प्रकल्प म्हणूनही देखील या योजनेकडे पाहिले जाते. तीन तालुक्यांना लाभदायीही योजना तीन तालुक्यांना लाभदायी ठरणार आहे. नव्या आराखडय़ानुसार बलदाणेचे अमरावतीनाला धरण भरण्यात आल्यास (66 दशलक्ष घनमीटर पाणी) पूर्वेकडील नेहमीच अवर्षण  प्रवण असलेल्या गावांना त्याचा लाभ होणार आहे. शनिमांडळ लघु पाटबंधारे प्रकल्पातून अमरावती नदीद्वारे पाणी नेवून मालपूर, ता.शिंदखेडा येथील अमरावती मध्यम प्रकल्पात (10 दशलक्ष घनमीट पाणी)पाणी साठवले जाणार आहे. त्यामुळे शनिमांडळ ते वैंदाणे-मालपूर या दरम्यान ही नदी बारमाही प्रवाहीत राहील. शनिमांडळ प्रकल्पातून पुढे बुराई प्रकल्पात अर्थात वाडी-शेवाडी (सहा दशलक्ष घनमीटर) पाणी नेले जाणार आहे. तेथून बुराई नदी बारमाहीचा प्रय} आहे. वनजमीनीचा प्रश्नपहिल्या टप्प्यातील निंभेल प्रकल्पासाठी वन जमिनीचा प्रय} करावा लागणार आहे. खाजगी सल्लागारामार्फत वनजमीन संपादनासाठी निवेदेनुसार कार्यवाही सुरू आहे. वनजमीन संपादन करण्यासाठी पर्यायी जमिनीसाठी प्रस्ताव जिल्हाधिका:यांकडे यापूर्वीच सादर करण्यात आला आहे. तर खाजगी जमीन मिळविण्यासाठी      90 टक्के खातेदार शेतक:यांचे संमतीपत्र पाटबंधारे विभागाकडे आलेली आहेत. दर निश्चिती होऊन शेतक:यांना मोबदला दिला जाणार आहे.पंपगृहांना लागणार वीजया योजनेअंतर्गत तापीपात्रात हाटमोहिदा, निंबेल, आसाणे व शनिमांडळ येथे पंपगृह उभारावे लागणार आहे. पंपाद्वारे पाणी  पुढे नेण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर विजेची आवश्यकता लागणार                 आहे. राज्य विद्युत मंडळातर्फे 10 मे.व्ॉ.वीज उपलब्ध करून देण्यास सहमती मिळविण्यात आली आहे. विद्युत खर्चासाठी 27 कोटी रुपये प्रस्तावीत करण्यात आले                आहेत. त्यानंतर योजना सुरू  झाल्यावर पंपगृहांसाठी लागणा:या विजेचा बिलाचा प्रश्न उपस्थित होणार आहे.प्रकाशा बॅरेजच्या बुडीत क्षेत्रातून पावसाळ्यात पुराचे वाहून जाणारे पाणी हाटमोहिदा गावाजवळील तापी नदीच्या डाव्या तिरावरुन इनटेक चॅनल व जॅकवेल बांधून उपसाव्दारे 41.47 दलघमी पाणी उचलणे प्रस्तावित आहे. जॅकेवल पासून 1600 मी. मी. व्यासाचा एम. एस. पाईपच्या एकेरी रांगेव्दारे पहिला टप्पा द्वारे निभेंल साठवण तलावात पाणी साठविण्यात येणार आहे. त्याची सिंचन क्षमता 1204 हेक्टर इतकी आहे. दुसरा टप्पा 1550 मी. मी. व्यासाच्या एम. एस. पाईपच्या एकेरी रांगेव्दारे आसाणे साठवण तलावात पाणी साठविण्यात येणार आहे. त्याची सिंचन क्षमता 2339 हेक्टर इतकी आहे.तिस:या टप्प्यात 1200 मी. मी. व्यासाचा एकेरी रांगेव्दारे अस्तित्वातील शनिमांडळ तालवात पाणी साठविण्यात येणार आहे. त्याची सिंचन क्षमता 354 हेक्टर इतकी आहे. चौथ्या  टप्प्यात 1200 मी. मी. व्यासाचा एकेरी रांगेव्दारे अस्तित्वातील बुराई मध्यम प्रकल्पात पाणी  पाणी साठविण्यात येणार आहे. त्याची सिचंन क्षमता 3188 हेक्टर आहे.  निभेंल व आसाणे साठवण तलाव बांधणे प्रस्तावित आहे. निंभेल व आसाणे या नवीन साठवण तलावाची तसेच ल.पा.यो. शनिमांडळ व बुराई मध्यम प्रकल्पाची वाढीव व साठवण क्षमता 7085 हे. असून 3429 हे.सिंचन क्षेत्र नंदुरबार जिल्ह्यांतर्गत नंदुरबार तालुक्यातील आहे. धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील 1708 हेक्टर व साक्री तालुक्यातील 1948 हेक्टर क्षेत्राला याचा लाभ होणार आहे.