शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

दोन पाडय़ांना यंदाही लागणार टँकर

By admin | Updated: February 8, 2017 22:13 IST

सरासरी इतका पाऊस होऊनही टंचाई : 180 गावे व 400 पाडय़ांवर उन्हाळ्यात पाणीटंचाईचे संकट

नंदुरबार : गेल्या दहा वर्षापासून नियमित पाणी टंचाई जाणवणा:या धडगाव तालुक्यातील गौ:याचा बोदलापाडा आणि गुगलमालपाडा या दोन्ही पाडय़ांना यंदाही टँकर किंवा बैलगाडीने पाणीपुरवठा करण्याची वेळ येणार आहे. त्यादृष्टीने प्रशासनाने नियोजन केले आहे. यामुळे मात्र, जिल्हा टँकरमुक्तची प्रशासनाची तयारी  वाया जाणार असल्याचे यंदाही स्पष्टच आहे.जिल्ह्यात यंदा सरासरीचा तुलनेत 90 टक्केपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. तीन तालुक्यांमधील सरासरीही ओलांडण्यात आली आहे. परिणामी यंदा पाणी टंचाईची स्थिती फारशी राहणार नसल्याचे सांगण्यात येत   होते. परंतु शहादा तालुक्यातील 135 आणि नंदुरबार तालुक्यातील 15 अशी दीडशे गावांची पीक पैसेवारी 50 पैशांच्या आत जाहीर केल्याने तो भाग दुष्काळी जाहीर करण्यात आला   आहे.याशिवाय भुजल पातळी आणि इतर सव्रेक्षणानुसार यंदाच्या उन्हाळ्यात टंचाई जाणवणा:या गावांचीही यादी तयार करण्यात आली आहे.दोन्ही पाडे कायमस्वरूपीजिल्ह्यात धडगाव तालुक्यातील दोन पाडे वगळता एकाही गावाला किंवा पाडय़ाला टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याची वेळ गेल्या 15 वर्षात आलेली नाही. त्यामुळे टँकरमुक्त जिल्हा अशी बिरुदावली जिल्हा मिरवत असला तरी या दोन पाडय़ांमुळे त्याला खिळ बसत असल्याची स्थिती आहे. गेल्या तीन ते चार वर्षात राज्यातील अनेक भागात हजारो टँकरद्वारे गावांना पाणी पुरवठा करण्यात आला. परंतु नंदुबार जिल्ह्यात तशी वेळ आलेली नव्हती. यंदा तर सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने पाणी टंचाईची शक्यता मावळली होती.भौगोलिक स्थिती अडसरधडगाव तालुक्यातील गौ:याचा बोदलपाडा हा पाडा  बिजरी ग्रामपंचायतीअंतर्गत येतो तर गुगलमालपाडा हा वोरोडी ग्रामपंचायतीअंतर्गत येतो. गौ:याचा बोदलापाडा आणि गुगलमाडा या पाडय़ांची भौगोलिक स्थिती तीव्र चढाव आणि तीव्र उताराची आहे.    त्यामुळे त्या ठिकाणी कूपनलिका करता येत नाही. काही वर्षापूर्वी पाडय़ालगत वाहणा:या नाल्यात कूपनलिका करण्यात आली, परंतु तिचा काहीही उपयोग झाला नाही. परिणामी टँकरशिवाय या दोन्ही पाडय़ांना पर्याय उरत नसल्याची स्थिती आहे.पहिल्या टप्प्यात निरंकपाणी टंचाईचे नऊ महिन्यातील तीन टप्पे करण्यात येतात. पहिला टप्पा हा ऑक्टोबर ते डिसेंबरचा असतो. दुसरा जानेवारी ते मार्च आणि तिसरा एप्रिल ते जून असा असतो. यंदा पहिल्या टप्प्यात एकाही गावाला पाणी टंचाई जाणवली नसल्याचा प्रशासनाचा दावा आहे.आता दुस:या टप्प्यात 109 गावे आणि 396 पाडय़ांवर पाणी टंचाई जाणवत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यासाठी टंचाई कृती आराखडादेखील तयार करण्यात आला आहे.तृतीय सत्रात 71 गावे आणि चार पाडय़ांवर पाणी टंचाई राहण्याची शक्यता आहे. दोन्ही टप्पे मिळून एकूण 180 गावे आणि 400 पाडय़ांना यंदा पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे.साडेचार कोटींचा खर्चजिल्ह्यात यंदा पाणी टंचाई उपाययोजनांवर जवळपास चार लाख 47 हजार 62 हजार रुपये अंदाजीत खर्च होणार असल्याचे स्पष्ट    करण्यात आले आहे. 180 गावे आणि 400 पाडय़ांसाठी एकूण    पावणेसहाशे योजनांचा समावेश करण्यात आला आहे. त्यात विहीर खोल करणे, विहिरीतून गाळ काढणे दोन ठिकाणी, खाजगी विहीर व कूपनलिका यांचे अधिग्रहण करणे याचे 54 ठिकाणी प्रस्तावित आहे. त्यात दुस:या टप्प्यात 36 तर तिस:या टप्प्यात 18 ठिकाणांचा समावेश   आहे. प्रगती पथावरील पाणी पुरवठा योजनांची कामे पूर्ण करण्याचे सात ठिकाणी प्रस्तावित असून दुस:या टप्प्यात एक तर तिस:या टप्प्यात सहा ठिकाणांचा समावेश आहे. विंधन विहीरी घेण्याचे 511 ठिकाणी नियोजन आहे. त्यात दुस:या टप्प्यात 461 तर तिस:या टप्प्यात 50 ठिकाणांचा समावेश आहे. याशिवाय तात्पुरत्या पुरक नळ पाणी पुरवठा योजना चार ठिकाणी नियोजित   आहेत. भौगोलिक परिस्थितीजिल्ह्यातील धडगाव व अक्कलकुवा तालुक्यातील अनेक गाव व पाडय़ांर्पयत जाण्यासाठी रस्ते नसल्यामुळे अशा ठिकाणी कूपनलिकेची यंत्रणा जाऊ शकत नाही. त्यामुळे अशा ठिकाणी प्रशासनाला उपाययोजना करण्यास मोठी कसरत करावी लागत असते.सर्वाधिक गावे नंदुरबार तालुक्यातीलयंदा दुस:या व तिस:या टप्प्यात पाणी टंचाई जाणवणा:या सर्वाधिक गावांची संख्या ही नंदुरबार व तळोदा तालुक्यातील आहे. तर सर्वाधिक पाडय़ांची संख्या धडगाव तालुक्यातील आहे. नंदुरबार तालुक्यातील 50 गावे व एक पाडा, नवापूर तालुक्यातील 23 गावे व एक पाडा, शहादा तालुक्यातील 33 गावे व सहा पाडे, तळोदा तालुक्यातील 44 गावे, अक्कलकुवा तालुक्यातील 30 गावे व 175 पाडे आणि धडगाव तालुक्यातील 217 पाडय़ांचा समावेश आहे. एकुण 180 गावे व 400 पाडय़ांचा टंचाई निवारणार्थ 580 उपाययोजना राबविण्यात येणार       आहे.