शहरं
Join us  
Trending Stories
1
Jaipur Bus Accident: कामगारांनी भरलेली बस हाय-टेन्शन लाईनच्या संपर्कात आली, १० जण गंभीर भाजले; दोघांचा मृत्यू
2
लाडकी बहीण योजनेसाठी सरकार किती निधी देते? ‘इतके’ कोटी होतात खर्च, आकडा पाहून व्हाल अवाक्
3
प्रत्येक टनामागे १ रुपया...! 'वसंतदादा शुगर'ची चौकशी लागली; शरद पवार, अजितदादांशी संबंधीत संस्था कचाट्यात
4
समस्त ओला ईलेक्ट्रीक स्कूटर मालकांसाठी महत्वाची बातमी! तुमचे तुम्हीच स्पेअर पार्ट घ्या, मेकॅनिककडून दुरुस्त करा...
5
वंदे भारत-राजधानी ट्रेनचे तिकीट कमी होईल, तब्बल ५००₹ वाचतील; ९०% लोकांना ट्रिक माहिती नाही!
6
२५ देशामध्ये अफाट संपत्ती, मॉलचेही आहेत मालक; 'हे' आहेत UAE चे सर्वात श्रीमंत भारतीय, ५० हजार कोटींपेक्षा अधिक नेटवर्थ
7
मंदीच्या काळातही ‘या’ 8 क्षेत्रांत कर्मचारी कपातीचा धोका नाही, भविष्यात मोठी संधी; जाणून घ्या...
8
VIRAL : महिला प्रवासी रिक्षात विसरली इयरफोन; वस्तू परत करण्यासाठी रिक्षा चालकाने लढवली 'अशी' शक्कल! होतंय कौतुक
9
टेस्लामध्ये मोठा पेच! पॅकेजवरून वाद, एलन मस्क कंपनी सोडण्याची शक्यता; अध्यक्षांचा गंभीर इशारा...
10
लग्नाच्या वर्षभरात योगिता चव्हाण-सौरभ चौघुलेच्या नात्यात दुरावा?, एकमेकांना केलं अनफॉलो, लग्नाचे फोटोही केले डिलीट
11
कॅनरा बँकेची गुंतवणूक असलेल्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण; निव्वळ नफा २० टक्क्यांनी घटला
12
बिहारमधील मतदानापूर्वी प्रशांत किशोर अडचणीत, नव्या गौप्यस्फोटामुळे खळबळ
13
वडिलांनी जमीन गहाण टाकून लेकासाठी 'नवरी' आणली; लग्नाच्या पहिल्या रात्रीच तिनं सगळ्यांची झोप उडवली!
14
लठ्ठपणा कमी करण्यासाठी 'ब्रह्मास्त्र'; आरोग्य मंत्रालयाने फ्रीमध्ये सांगितली वजन घटवण्याची पद्धत
15
एकनाथ खडसेंच्या जळगावातील बंगल्यात चोरी; किती मुद्देमाल चोरून नेला?
16
UK च्या पंतप्रधानांचा डबल गेम! आधी भारतासोबत मोठा करार, आता 'या' विरोधी देशासोबत मिळवले हात
17
प्रबोधिनी एकादशी २०२५: १४२ दिवसांची विष्णुंची योगनिद्रा संपणार; २ दुर्मिळ योगांत ७ राशींचे भाग्य उजळणार
18
२५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्येपूर्वीची शेवटची पोस्ट व्हायरल, चाहते हळहळले
19
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! आतापर्यंत ११,६०० रुपये स्वस्त; आता खरेदी करावे की वाट पाहावी?
20
धावत्या ट्रेनमध्ये तरुणावर हल्ला; तब्बल ५४ वेळा चाकूने वार! वादाचं कारण ऐकून बसेल धक्का

तळोदा तालुका : वातावरण बदलामुळे केळीचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 11:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : वातावरणातील बदलामुळे तळोद्यात केळीवर करपा रोगाचा  प्रादुर्भाव झाला आह़े या मुळे परिसरातील केळी उत्पादक हवालदिल झाले आहेत़ कृषी विभागाने मार्गदर्शन करण्याची आवश्यकता आह़ेगेल्या वर्षी केळीस चांगला भाव मिळाल्याने यंदा शेतक:यांचा कल या पिकाकडे वाढला होता़ साहजिकच केळीच्या क्षेत्रातही वाढ झाली आह़े कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार तळोदा तालुक्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : वातावरणातील बदलामुळे तळोद्यात केळीवर करपा रोगाचा  प्रादुर्भाव झाला आह़े या मुळे परिसरातील केळी उत्पादक हवालदिल झाले आहेत़ कृषी विभागाने मार्गदर्शन करण्याची आवश्यकता आह़ेगेल्या वर्षी केळीस चांगला भाव मिळाल्याने यंदा शेतक:यांचा कल या पिकाकडे वाढला होता़ साहजिकच केळीच्या क्षेत्रातही वाढ झाली आह़े कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार तळोदा तालुक्यात साधारणत 500 हेक्टर क्षेत्रावर केळीची लागवड करण्यात आली आह़े रासायनिक व सेंद्रिय खतांचा पुरेसा वापर, शिवाय वेळोवेळी मशागत केल्याने केळीचे पिक समाधानकारक स्थितीत                होत़े दरम्यान, गेल्या महिनाभरापासून वातावरणात सातत्याने बदल होत असल्यामुळे केळीवर मोठय़ा प्रमाणात करप्याचा प्रादुर्भाव पसरत आह़े या रोगामुळे झाडाची वाढ खुंटते, त्याचबरोबर हिरवे पानदेखील पिवळे पडत आहेत़ परिणामी केळीचा दर्जा खालावत आह़े शिवाय यामुळे केळीचे घड अपरिपक्व असतानाच पिकायला लागत आहेत़ शेतकरी आपला माल लांबच्या बाजारपेठेर्पयत पाठवत असल्याने तोर्पयत तो टिकवणेदेखील महत्वाचे असत़े परंतु करप्यामुळे केळी बाजारपेठेत नेत असतानाच तिचा दर्जा खालावत आह़े त्यामुळे शेतक:यांना प्रचंड प्रमाणात आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आह़े आधीच शेतक:यांनी केळीसाठी रासायनिक खते, ठिबक सिंचन, टिश्यू, मशागत, किटकनाशक यासाठी पैसा खर्च करण्यात आला आह़े मात्र आता करप्याचा वाढता प्रादुर्भावामुळे केळीसाठी लावण्यात आलेला खर्च तरी निघणार की नाही? असा प्रश्न शेतक:यांपुढे आह़े वास्तविक करपा हा रोग वर्षानुवर्षे केळी पिकाला लक्ष करीत असतो़ त्याचा नायनाट करण्यासाठी शेतकरी किटकनाशकांचाही वापर करीत असतात़ परंतु हा रोग संधीसाधु, बुरशीजन्य असल्याने तो लगतच्या पिकालाही सहज प्रभावित करु शकतो़ त्यामुळे कृषी विभागाने संपूर्ण परिसरात सामुहिकरित्या करपा रोगाचे निमरुलन करणे आवश्यक असल्याचे  म्हटले जात आह़े या शिवाय शेतक:यांना सवलतीत किटकनाशके पुरविण्याचेही शेतक:यांची अपेक्षा आह़े चार वर्षापूर्वी अशा प्रकारची किटकनाशके शेतक:यांना दिली जात होती़ परंतु आता ते बंद करण्यात आल्याने शासनाच्या धोरणाबाबत शेतक:यांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आह़े