शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
2
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
3
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
4
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
5
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
6
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
7
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
8
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
9
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
10
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
11
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
12
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
13
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर
14
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा
15
Viral Video: ट्रेनमधून प्रवास करताना कधीच 'अशी' चूक करू नका; जीवघेणी घटना कॅमेऱ्यात कैद!
16
Tulsi Vivah 2025 Wishes: तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Images, Whatsapp Status शेअर करून आमंत्रित करा आपल्या नातेवाईकांना
17
दुबार मतदार दिसले तर तिथेच फोडून काढायचे; राज ठाकरे यांचा घणाघात, पडदा हटवला, पुरावे दाखवले
18
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’च्या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण झाली: शरद पवार
19
Crime: घरात एकटीच होती प्रेयसी, प्रियकर भेटायला गेला, तेवढ्यात आला भाऊ अन्...शेवट भयंकर!
20
प्रीमियम लूक, ड्युअल स्क्रीन, ५००किमी रेंज; तयार रहा मारुतीची पहिली इलेक्ट्रिक एसयुव्ही येतेय!

तळोदा पोलीस ठाण्यात वाहन नसल्याने हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 12:13 IST

लोकमत ऑनलाईननंदुरबार : अतिदुर्गम भागात विस्तारलेल्या तळोदा पोलीस ठाण्यास सध्या एकच वाहन उपलब्ध असून, या एकाच वाहनावर संपूर्ण बंदोबस्ताचा गाडा चालत आहे. तथापि बंदोबस्तच सांभाळतांना दुस:या वाहनाअभावी पोलिसांना प्रचंड तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे चित्र आहे. वाढता ताण लक्षात घेवून वरिष्ठ प्रशासनाने तातडीेने पुन्हा एक वाहन उपलब्ध करून देण्याची अपेक्षा ...

लोकमत ऑनलाईननंदुरबार : अतिदुर्गम भागात विस्तारलेल्या तळोदा पोलीस ठाण्यास सध्या एकच वाहन उपलब्ध असून, या एकाच वाहनावर संपूर्ण बंदोबस्ताचा गाडा चालत आहे. तथापि बंदोबस्तच सांभाळतांना दुस:या वाहनाअभावी पोलिसांना प्रचंड तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे चित्र आहे. वाढता ताण लक्षात घेवून वरिष्ठ प्रशासनाने तातडीेने पुन्हा एक वाहन उपलब्ध करून देण्याची अपेक्षा आहे.तळोदा येथील पोलीस ठाण्यास तळोदा तालुक्यातील 128 गावे जोडली आहेत. यात अक्कलकुवा तालुक्यातील तळोद्याच्या सीमेस लागून असलेली नऊ गावेदेखील जोडलेली आहे. या पोलीस ठाण्याचे क्षेत्रफळ 66 मैलार्पयत विस्तारलेले आहे. नंदुरबार जिल्ह्यात तळोदा ठाणे असे एकमेव आहे की, ज्याच्यात दोन तालुक्यातील गावांचा समावेश असल्याचे म्हटले जाते. सदर पोलीस ठाण्यास बोरद, मोदलपाडा व कोठार अशा तीन दूरक्षेत्रांचादेखील बंदोबस्ताच्या पाश्र्वभूमिवर विभागणी करण्यात आली आहे. साहजिकच सातपुडय़ातील माळखुर्द, एकधड, बोरवन, टाकली, अशा अनेक गावे अन् पाडय़ांचा समावेश या ठाण्यात आहे, असे असले तरी या ठिकाणी बंदोबस्तासाठी पोलीस विभागाकडून एकच वाहन उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यामुळे याच पोलीस गाडीवर एवढा मोठा बंदोबस्ताचा गाडा कसा तरी सुरू आहे.साहजिकच पोलिसांनाही यातून मोठी कसरत करत कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवावी लागत आहे. वास्तविक पोलीस ठाण्याचा वाढता विस्तार पाहता येथे दुस:या चारचाकी वाहनाची अत्यंत आवश्यकता असताना पोलीस प्रशासनाने याकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे. दुस:या वाहनाबाबत येथील पोलीस प्रशासनाने प्रस्ताव पाठविला होता. मात्र कायम स्वरूपी वाहन उपलब्ध करून न देता तात्पुरते वाहन दिले जाते. नंतर पुन्हा ते परत मागवून घेण्यात येते. गेल्या दोन-तीन वर्षापासून शहरात घरफोडय़ांचे प्रमाण वाढले आहे. वसाहतींमध्ये सातत्याने होणा:या घरफोडय़ा आता शहराच्या मध्यभागीदेखील होऊ लागल्या आहेत. अशा स्थितीत पोलिसांची गस्त वाढविण्याची गरज आहे. मात्र एकाच वाहनावर ते अशक्य आहे. त्यातही तालुक्यात ग्रामीण भागात रात्री-बेरात्री मारामारी, दंगल, अशा घटना घडल्या तर पोलिसांना तेथे जावे लागते, अशा वेळी पोलिसांना आपल्या खाजगी दुचाकीने रात्रीची गस्त घालावी लागत आहे. गृहविभागाने पोलीस ठाण्यास आणखीन एक चारचाकी वाहन उपलब्ध करून दिले तर दुर्घटना अथवा मारामारी दंगलीच्या ठिकाणी लवकर पोहोचता येईल. शिवाय घटनांवरही काबू राखता येईल. त्याचबरोबर तपास कामातही तातडीने गती मिळेल. एकाच वाहनामुळे तासन-तास वाट पहावी लागते, अशीही पोलिसांची व्यथा आहे. जिल्ह्यातील इतर पोलीस ठाण्यांना वरिष्ठ प्रशासनाकडून दोन वाहने दिलेली आहेत. परंतु तळोदा पोलीस ठाण्यालाच केवळ एकमेव गाडी देण्यात आलेली आहे. तळोद्याच्या बाबतीत प्रशासनाचा अशा दुजाभाव का केला जात आहे, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. शहरात कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला तर अशा वेळी दुस:यांकडून वाहन मागविण्यात येत असते. दुस:या वाहनाअभावी येथील पोलिसांचा वाढता ताण कमी करण्यासाठी गृहविभागाने गंभीर दखल घेवून तातडीने वाहन उपलब्ध करून द्यावे, अशी नागरिकांची मागणी आहे.