शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
विमान कराचीला जाणार होते पण सौदी अरेबियाला कसे पोहोचले? पाकिस्तान एअरलाइन्सचा निष्काळजीपणा
4
नाशिकमध्ये महिलेने पतीचा झोपेतच दाबला गळा, हत्या करून फेकले जंगलात; गावात खळबळ
5
'तीन दिवसापूर्वीच कट रचला होता'; राधिका हत्या प्रकरणात मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा
6
समुद्र किनारी फिरताना सापडला गिफ्ट बॉक्स, उघडून बघताच बसला धक्का, थेट गाठलं पोलीस ठाणं, आतमध्ये नेमकं होतं काय?  
7
आतापर्यंत कुठे-कुठे फुटला ट्रम्प 'टॅरिफ बॉम्ब'? पाहा संपूर्ण यादी..; भारताबाबत मोठी अपडेट
8
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
9
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
10
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
11
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
12
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
13
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
14
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
15
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
16
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
17
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
18
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
19
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
20
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती

तळोदा पोलीस ठाण्यात वाहन नसल्याने हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 12:13 IST

लोकमत ऑनलाईननंदुरबार : अतिदुर्गम भागात विस्तारलेल्या तळोदा पोलीस ठाण्यास सध्या एकच वाहन उपलब्ध असून, या एकाच वाहनावर संपूर्ण बंदोबस्ताचा गाडा चालत आहे. तथापि बंदोबस्तच सांभाळतांना दुस:या वाहनाअभावी पोलिसांना प्रचंड तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे चित्र आहे. वाढता ताण लक्षात घेवून वरिष्ठ प्रशासनाने तातडीेने पुन्हा एक वाहन उपलब्ध करून देण्याची अपेक्षा ...

लोकमत ऑनलाईननंदुरबार : अतिदुर्गम भागात विस्तारलेल्या तळोदा पोलीस ठाण्यास सध्या एकच वाहन उपलब्ध असून, या एकाच वाहनावर संपूर्ण बंदोबस्ताचा गाडा चालत आहे. तथापि बंदोबस्तच सांभाळतांना दुस:या वाहनाअभावी पोलिसांना प्रचंड तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे चित्र आहे. वाढता ताण लक्षात घेवून वरिष्ठ प्रशासनाने तातडीेने पुन्हा एक वाहन उपलब्ध करून देण्याची अपेक्षा आहे.तळोदा येथील पोलीस ठाण्यास तळोदा तालुक्यातील 128 गावे जोडली आहेत. यात अक्कलकुवा तालुक्यातील तळोद्याच्या सीमेस लागून असलेली नऊ गावेदेखील जोडलेली आहे. या पोलीस ठाण्याचे क्षेत्रफळ 66 मैलार्पयत विस्तारलेले आहे. नंदुरबार जिल्ह्यात तळोदा ठाणे असे एकमेव आहे की, ज्याच्यात दोन तालुक्यातील गावांचा समावेश असल्याचे म्हटले जाते. सदर पोलीस ठाण्यास बोरद, मोदलपाडा व कोठार अशा तीन दूरक्षेत्रांचादेखील बंदोबस्ताच्या पाश्र्वभूमिवर विभागणी करण्यात आली आहे. साहजिकच सातपुडय़ातील माळखुर्द, एकधड, बोरवन, टाकली, अशा अनेक गावे अन् पाडय़ांचा समावेश या ठाण्यात आहे, असे असले तरी या ठिकाणी बंदोबस्तासाठी पोलीस विभागाकडून एकच वाहन उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यामुळे याच पोलीस गाडीवर एवढा मोठा बंदोबस्ताचा गाडा कसा तरी सुरू आहे.साहजिकच पोलिसांनाही यातून मोठी कसरत करत कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवावी लागत आहे. वास्तविक पोलीस ठाण्याचा वाढता विस्तार पाहता येथे दुस:या चारचाकी वाहनाची अत्यंत आवश्यकता असताना पोलीस प्रशासनाने याकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे. दुस:या वाहनाबाबत येथील पोलीस प्रशासनाने प्रस्ताव पाठविला होता. मात्र कायम स्वरूपी वाहन उपलब्ध करून न देता तात्पुरते वाहन दिले जाते. नंतर पुन्हा ते परत मागवून घेण्यात येते. गेल्या दोन-तीन वर्षापासून शहरात घरफोडय़ांचे प्रमाण वाढले आहे. वसाहतींमध्ये सातत्याने होणा:या घरफोडय़ा आता शहराच्या मध्यभागीदेखील होऊ लागल्या आहेत. अशा स्थितीत पोलिसांची गस्त वाढविण्याची गरज आहे. मात्र एकाच वाहनावर ते अशक्य आहे. त्यातही तालुक्यात ग्रामीण भागात रात्री-बेरात्री मारामारी, दंगल, अशा घटना घडल्या तर पोलिसांना तेथे जावे लागते, अशा वेळी पोलिसांना आपल्या खाजगी दुचाकीने रात्रीची गस्त घालावी लागत आहे. गृहविभागाने पोलीस ठाण्यास आणखीन एक चारचाकी वाहन उपलब्ध करून दिले तर दुर्घटना अथवा मारामारी दंगलीच्या ठिकाणी लवकर पोहोचता येईल. शिवाय घटनांवरही काबू राखता येईल. त्याचबरोबर तपास कामातही तातडीने गती मिळेल. एकाच वाहनामुळे तासन-तास वाट पहावी लागते, अशीही पोलिसांची व्यथा आहे. जिल्ह्यातील इतर पोलीस ठाण्यांना वरिष्ठ प्रशासनाकडून दोन वाहने दिलेली आहेत. परंतु तळोदा पोलीस ठाण्यालाच केवळ एकमेव गाडी देण्यात आलेली आहे. तळोद्याच्या बाबतीत प्रशासनाचा अशा दुजाभाव का केला जात आहे, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. शहरात कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला तर अशा वेळी दुस:यांकडून वाहन मागविण्यात येत असते. दुस:या वाहनाअभावी येथील पोलिसांचा वाढता ताण कमी करण्यासाठी गृहविभागाने गंभीर दखल घेवून तातडीने वाहन उपलब्ध करून द्यावे, अशी नागरिकांची मागणी आहे.