शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

श्रमिकांना विनामूल्य गावी पोहोचवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 12:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनामुळे देशभरात विविध ठिकाणी अडकलेल्या श्रमिकांना त्यांच्या गावी जाण्यासाठी शासनाने विनामूल्य सुविधा उपलब्ध करावी, ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोनामुळे देशभरात विविध ठिकाणी अडकलेल्या श्रमिकांना त्यांच्या गावी जाण्यासाठी शासनाने विनामूल्य सुविधा उपलब्ध करावी, अशी मागणी नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनही दिले. तसेच बडवाणी (मध्यप्रदेश) येथे एक दिवसाचे लाक्षणिक उपोषणही केले.या संदर्भात मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोनामुळे देशात अभूतपूर्व संकट निर्माण झाले आहे. त्याचा सामना सरकारला करावा लागत आहे. त्या कार्यात आपलाही सहभाग असल्याचे स्पष्ट करून त्यांनी म्हटले आहे की, या परिस्थितीत देशातील गरीब श्रमिकांवर महासंकट कोसळले आहे. अन्न, निवारा या मुलभूत समस्यांपासूनही ते दुरावले आहे. त्यामुळे नाईलाजाने महानगरांमध्ये अडकलेले हे असुरक्षित श्रमिक आपापल्या गावी परतण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु त्यांना रोखले जात असल्याने लपून छपून ते गुन्हेगारांसारखे आपल्या गावीत वाटेल ते दाम देवून जात आहेत. काहीजण शेकडो किलोमीटर पायीच प्रवास करीत आहेत. या दगदगीत काहींचा रस्त्यांवरच मृत्यूही झाला आहे. हे चित्र देशासाठी व महाराष्टÑासाठीही लाजीरवाने असून, माणुसकीला कलंक लावणारे आहे.नुकताच शासनाने या अडकलेल्या मजुरांना घरी परतण्यासाठी सकारात्मक निर्णय घेतला असला तरी राज्या राज्यांमध्ये समन्वय नसल्याने व इतर तांत्रिक बाबींमुळे घरी परतण्यासाठी लोकांना प्रचंड अडचणी येत आहेत. ही बाब पाहता शासनाने या अडकलेल्या श्रमिकांना त्यांच्या गावी जाण्यासाठी सुरक्षित व विनामूल्य व्यवस्था करावी, अशी मागणी त्यांनी निवेदनात केली आहे. दरम्यान, याच मागणीसाठी व शासनाचे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी सोमवारी बडवाणी (मध्यप्रदेश) येथे २४ तासांचे लाक्षणिक आंदोलन केले.