शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

श्रमिकांना विनामूल्य गावी पोहोचवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 12:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनामुळे देशभरात विविध ठिकाणी अडकलेल्या श्रमिकांना त्यांच्या गावी जाण्यासाठी शासनाने विनामूल्य सुविधा उपलब्ध करावी, ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोनामुळे देशभरात विविध ठिकाणी अडकलेल्या श्रमिकांना त्यांच्या गावी जाण्यासाठी शासनाने विनामूल्य सुविधा उपलब्ध करावी, अशी मागणी नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनही दिले. तसेच बडवाणी (मध्यप्रदेश) येथे एक दिवसाचे लाक्षणिक उपोषणही केले.या संदर्भात मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोनामुळे देशात अभूतपूर्व संकट निर्माण झाले आहे. त्याचा सामना सरकारला करावा लागत आहे. त्या कार्यात आपलाही सहभाग असल्याचे स्पष्ट करून त्यांनी म्हटले आहे की, या परिस्थितीत देशातील गरीब श्रमिकांवर महासंकट कोसळले आहे. अन्न, निवारा या मुलभूत समस्यांपासूनही ते दुरावले आहे. त्यामुळे नाईलाजाने महानगरांमध्ये अडकलेले हे असुरक्षित श्रमिक आपापल्या गावी परतण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु त्यांना रोखले जात असल्याने लपून छपून ते गुन्हेगारांसारखे आपल्या गावीत वाटेल ते दाम देवून जात आहेत. काहीजण शेकडो किलोमीटर पायीच प्रवास करीत आहेत. या दगदगीत काहींचा रस्त्यांवरच मृत्यूही झाला आहे. हे चित्र देशासाठी व महाराष्टÑासाठीही लाजीरवाने असून, माणुसकीला कलंक लावणारे आहे.नुकताच शासनाने या अडकलेल्या मजुरांना घरी परतण्यासाठी सकारात्मक निर्णय घेतला असला तरी राज्या राज्यांमध्ये समन्वय नसल्याने व इतर तांत्रिक बाबींमुळे घरी परतण्यासाठी लोकांना प्रचंड अडचणी येत आहेत. ही बाब पाहता शासनाने या अडकलेल्या श्रमिकांना त्यांच्या गावी जाण्यासाठी सुरक्षित व विनामूल्य व्यवस्था करावी, अशी मागणी त्यांनी निवेदनात केली आहे. दरम्यान, याच मागणीसाठी व शासनाचे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी सोमवारी बडवाणी (मध्यप्रदेश) येथे २४ तासांचे लाक्षणिक आंदोलन केले.