शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

चौपाळे ग्रामस्थांसह ‘स्वाभिमानी’चा हंडा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 12:32 IST

पाणी मिळावे व गुन्हे मागे घ्यावे : शेकडो महिला-पुरुष सहभागी, जिल्हाधिका:यांना निवेदन

नंदुरबार : वावद लघु तलावातून वडिलोपर्जीत असलेल्या विहिरींमधून पाणी मिळावे, पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा मागे घ्यावा व कृष्णा पार्क कायमस्वरूपी बंद करावे या मागणीसाठी चौपाळे ग्रामस्थांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर हंडा मोर्चा काढला. त्यानंतर जिल्हाधिका:यांना निवेदन देण्यात आले. चौपाळे शिवारातील कृष्णा पार्क व रिसोर्ट मध्ये ग्रामस्थांनी तोडफोड केली होती. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीमार व अश्रु धुराच्या नळकांडय़ा फोडल्या होत्या. या प्रकरणी पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणला म्हणून जमावाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यात 16 जणांना अटक करण्यात आली आहे. तर ग्रामस्थांपैकी महिलेने व रिसोर्टच्या संचालकांनी परस्पर विरोधी गुन्हे दाखल केले आहेत. या घटनेप्रकरणी बुधवारी चौपाळे ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन दिले. जिल्हाधिका:यांनी चौकशीचे आदेश दिल्याचे सांगून योग्य तो तोडगा काढण्याचे सांगितले. सकाळी 11 वाजता महिला व ग्रामस्थ नवापूर चौफुलीवर मोठय़ा संख्येने जमा झाले होते. महिलांच्या हातात हंडा होता. नवापूर चौफुलीहून मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयवर धडकला. तेथे पोलिसांनी मोर्चेक:यांना अडविले. त्यानंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिका:यांना निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की, कृष्णा पार्क कायमस्वरूपी बंद   करावे. वावद येथील प्रकल्पासाठी ज्या शेतक:यांच्या जमीनी संपादन करण्यात आल्या होत्या त्या शेतक:यांच्या वडिलोपर्जीत विहिर, कुपनलिका आहेत त्यामधून त्यांना शेतीसाठी कायमस्वरूपी पाणी वापराकरीता परवाणगी देण्यात   यावी. चौपाळे ग्रामस्थांचा     पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायमचा ग्रामसभेच्या ठरावानुसार सोडविण्यात यावा. घडलेल्या घटनेतील अटक करण्यात आलेल्या ग्रामस्थ व शेतकरी यांच्यावरील गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे. चौपाळे ही संतांची पावनभुमी आहे तिचे नाव बदनाम होणार नाही यादृष्टीने उपाययोजना कराव्या अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. दरम्यान, याबाबत जिल्हाधिकारी व सर्व संबधीत अधिकारी यांना वेळोवेळी संघटनेच्या माध्यमातून निवेदन देण्यात आली होती. परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्यामुळेच ही घटना घडल्याचा आरोपही ग्रामस्थ व स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे करण्यात आला आहे. यावेळी संघटनेचे    तालुकाध्यक्ष कृष्णदास पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. दरम्यान, वावद ग्रामपंचायतीनेही याबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन देवून रिसोर्ट बंद करण्याची मागणी केली.