शहरं
Join us  
Trending Stories
1
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
2
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
3
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
4
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
5
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
6
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
7
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
8
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन
9
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
10
जातगणना : मॅजिक की मंडल?
11
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
12
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
13
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
14
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
15
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
16
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
17
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
18
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
19
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
20
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक

नदीजोड प्रकल्प यशस्वीतेबाबत संशयच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 11:54 IST

जलपरिषद : राजेंद्रसिह यांचे मत

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नदीजोड प्रकल्पामुळे पाणी वाटपातले वाद आणखीच वाढतील. त्यामुळे देशात नदी जोड प्रकल्प यशस्वी होईल की नाही याबाबत शंकाच असल्याचे मत ज्येष्ठ जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह यांनी येथे आयोजित जलपरिषदेत बोलतांना व्यक्त केले.  शहिद दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज नाटय़मंदीर परिसरात जलपरिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलतांना राजेंद्रसिंह यांनी सांगितले, सध्या सरकार नदीजोड प्रकल्प राबविण्याठी योजना आखत आहे. परंतु नदीजोड प्रकल्पामुळे राज्याराज्यात, जिल्ह्याजिल्ह्यात तंटे वाढतील. परिणामी नदीजोड प्रकल्प यशस्वी होईल का? हा मोठाच प्रश्न आहे. राज्यातील जलयुक्त शिवार प्रकल्पात ठेकेदारी घुसल्यानंतर हे अभियान देखील आता भरकटू लागले आहे. लोकसहभागातून जी कामे होतील तीच या अभियानाच्या यशस्वीतेत भर घालतील असे आपण आधीच राज्य सरकारला सांगितले होते. परंतु आता तीन लाखांच्या वरची कामे थेट ठेकेदारांना दिली जात असल्यामुळे या अभियानाचे भवितव्य किती आणि कसे राहील? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. यावेळी शिवाजी भोईटे, चैत्राम पवार, प्रतिभा शिंदे, प्रा.डॉ.पीतांबर सरोदे, सुमन पांडे, प्रा.डॉ.विश्वास पाटील आदी उपस्थित होते.