शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस अधिक्षकांची सीमा तपासणी नाक्यावर पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 12:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवापुर : सीमा परिवहन तपासणी नाक्यावर परप्रांतीय मजूर व कामगारांचा वाढता राबता पाहता जिल्हा पोलीस अधिक्षकांनी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापुर : सीमा परिवहन तपासणी नाक्यावर परप्रांतीय मजूर व कामगारांचा वाढता राबता पाहता जिल्हा पोलीस अधिक्षकांनी गुरुवारी येथे भेट देउन परिस्थितीची पाहणी करुन समाधान व्यक्त केले.गुजरात राज्यातुन दररोज हजारो परप्रांतीय मजुर व कामगारांचे नवापुर सीमा तपासणी नाक्यावर येणे सुरु आहे. मंगळवारी सायंकाळी एकाचवेळी सात हजाराहून अधिक लोकांचा जमाव तेथे आल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली होती. याच पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी या ठिकाणी बुधवारी भेट दिली होती़ दररोज सीमेवर हजारोंच्या संख्येने लोक येत असल्याने कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने जिल्हा पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत यांनी सीमेवर भेट दिली. येथे येणार्यांसाठी पाण्याची व्यवस्था सुरु करण्यात आली आहे. झारखंड, मध्यप्रदेश, बिहार व ओडीसा राज्यातील मजुर व कामगारांची संख्या जास्त असुन त्या प्रमाणात बस फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे़ सोशल डिस्टन्सिंगचा निकष अमलात आणून शासन धोरणानुसार एका बसमधुन २२ प्रवाशी नेले जात असल्याने महेंद्र पंडीत यांनी समाधान व्यक्त केले.तापी जिल्ह्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांचेशी जिल्हा पोलीस अधिक्षकांनी चर्चा केली. दरम्यान दररोज वाढणारी प्रवासी संख्या पाहता नवापुर सीमा व नवापुर शहरात पहावे तिकडे लालपरी उभ्या दिसत आहेत. तपासणी नाक्यावर सुमारे २०० बसेस उभ्या असून शहरातील ही संख्या शंभराच्या घरात आहे.औरंगाबाद विभागातील ७५, जळगांव विभागातुन ५० व धुळे विभागातुन १०० बसेस अशा २२५ जादा बसेस नवापुरात दाखल झालेल्या आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील १०० बसेस १० मे पासूनच सेवेत दाखल झालेल्या आहेत़नवापुर सीमा तपासणी नाक्यावरुन निघणाºया बसेस राज्याच्या विविध भागात जाऊन परत येत आहेत़ या उपक्रमामुळे २५ हजार पेक्षा अधिक परप्रांतीय त्यांच्या गावांच्या मार्गाला लागले असल्याची माहिती आहे़

गोंदिया सारख्या ८०० ते ९०० किलोमीटर अंतरावरील बसफेरी पुर्ण करण्यासाठी तीन ते सहा दिवस जात आहेत. लॉकडाउनमुळे महामार्गावर जेवणाची सोय नाही. चालक व वाहकांची संख्या वाढल्याने लांब फेरी पूर्ण करुन आलेल्या प्रत्येक चालक व वाहकास आरामाची सोय उपलब्ध होत नसल्याने मिळेल त्या ठिकाणी आराम करुन घेणे व मिळेल त अन्न पदार्थ पदार्थ खाउन पोटाची भूख शमविणे यातच ते स्वत:चे समाधान करुन घेत आहेत. सुदैवाने नवापुर शहरात सामाजिक व धार्मिक संघटनांचे जागृत कार्यकर्ते अन्नदानाचे कार्य लॉकडाउन सुरु झाल्यापासुन अविरतपणे पार पाडत असल्याने गुजरात राज्यातून येणारे प्रवासी व चालक वाहकांची बऱ्याच अंशी सोय होत आहे़