शहरं
Join us  
Trending Stories
1
'दोषींना पाठिशी घालणाऱ्यांवरही कारवाई करणार', एकनाथ शिंदेंनी घेतली वैष्णवी हगवणेच्या आईवडिलांची घेतली भेट
2
अंबा एक्सप्रेसची ओव्हरहेड वायर तुटली! विदर्भ एक्स्प्रेस, नागपूर-पुणे एक्स्प्रेससह अनेक गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले
3
तीन वर्षांच्या मुलाला अंधार असलेल्या खोलीत नेले अन्...; उल्हासनगरात डान्स टीचरचा अल्पवयीन मुलावर अत्याचार
4
EPF News: 7 कोटींपेक्षा जास्त लोकांसाठी गुड न्यूज! केंद्र सरकारने पीएफवरील व्याजाची केली घोषणा
5
'...तर कमी लोक मेले असते', पहलगाममध्ये कुंकू पुसलं गेलेल्या महिलांबद्दल भाजप खासदाराचं वादग्रस्त विधान
6
नाव ऐकून गुन्हेगारांना भरायची धडकी! नागपूरचे माजी पोलीस आयुक्त एस.पी. यादव यांचे मुंबईत निधन
7
वैष्णवी मृत्यु प्रकरण : 'कार, दोन पिस्तूल, चांदीची भांडी...' हगवणेंच्या घरून पोलिसांनी जप्त केलं घबाड
8
जिथं संधी मिळते तिथं तो 'बेस्ट'च देतो! टेस्टमधून डावललेल्या श्रेयस अय्यरनं पुन्हा दाखवली आपली ताकद
9
केरळजवळच्या समुद्रात बुडतंय परदेशी जहाज, तटरक्षक दलाने ९ जणांना वाचवले 
10
Mahayuti: छगन भुजबळ यांना काटशह देण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून नरेंद्र दराडे, राजकारण काय?
11
"ज्यांना अजून देश समजला नाही त्यांना परराष्ट्र धोरण काय समजणार?’’, बावनकुळेंची राहुल गांधींवर बोचरी टीका  
12
"मला बऱ्याच दिवसांपासून हे सांगायचं होतं की, मी अनुष्कासोबत रिलेशनशिपमध्ये'; तेज प्रताप यादवांनी दिली प्रेमाची कबुली
13
Sai Sudharsan: भारतीय संघात निवड झाल्यानंतर साई सुदर्शनची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
14
Crime: लग्न मोडल्याच्या रागातून दिवसाढवळ्या तरुणीची निर्घृण हत्या, घरात घुसून चिरला गळा
15
Karun Nair : रोहित-विराटच्या टेस्ट निवृत्तीनंतर आठवला 'त्रिशतकवीर'! आठ वर्षांनी कमबॅकची संधी
16
'धनंजय मुंडेंना क्लीनचिट मिळाली तर मी मंत्रिपदाचा राजीनामा देईन', मंत्री होताच छगन भुजबळांचे मोठे विधान
17
बंदूक नाही पण निलेश चव्हाणचा लॅपटॉप पोलिसांच्या हाती, आत सापडले… 
18
Mohammed Shami: इंग्लंड दौऱ्यासाठी मोहम्मद शमीची निवड का झाली नाही? अजित आगरकर म्हणाले...
19
मोठी अपडेट : वैष्णवी हगवणे प्रकरणात निलेश चव्हाण सहआरोपी, पोलिसांच्या हाती लागण्याची प्रतिक्षा कायम
20
टीम इंडियातील 'प्रिन्स'च्या गळ्यात कॅप्टन्सीची माळ; गंभीर-गिल जोडीसह कसोटीत नवे पर्व

संडे स्पेशल मुलाखत- डीबीटीचा निर्णय रद्द झालाच पाहिजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2020 12:34 IST

आदिवासी विद्यार्थ्यांचे खऱ्या अर्थाने शैक्षणिक भवितव्याचा सरकारला विचार करायचा असेल तर डीबीटी निर्णय बंद झालीच पाहिजे. -राजेद्र गावीत

रमाकांत पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कआदिवासींच्या विकासासंदर्भात व त्यांच्या शिक्षणासंदर्भात सरकार अनेक योजना राबवत असले तरी खºया अर्थाने योजनांचा व त्या योजना कशा राबवाव्यात या बाबतचे निर्णय अभ्यास न होताच घेतले जातात. त्यातील एक निर्णय म्हणजे डीबीटीचा. हा निर्णय जेव्हा राज्यातील फडणवीस सरकारने घेतला त्यावेळी देखील आपण त्या निर्णयाला विरोध केला होता. परंतु तो घेतला गेला. आता या निर्णयावर फेरविचार करण्यासंदर्भात राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारने सुरू केलेली प्रक्रिया स्वागतार्ह असून डीबीटीचा निर्णय रद्द झालाच पाहिजे अशी आपली स्पष्ट भुमिका असल्याचे प्रतिपादन पालघरचे खासदार राजेंद्र गावीत यांनी ‘लोकमत’शी बोलतांना केले.डीबीटी निर्णया संदर्भात आपली भुमिका काय?डीबीटीचा निर्णय हा पुर्णपणे चुकीचा आहे.कारण विद्यार्थ्यांचा हातात जेंव्हा एकरकमी रक्कम पडते तेव्हा ते खर्च करण्याचे अनेक मार्ग असतात. प्रत्येकाचा दैनंदिन अडीअडचणी असतातच त्यामुळे सरकार जेव्हा एखाद्या विशिष्ट हेतूसाठी ती रक्कम देणार तेव्हा ती रक्कम संबधीत विद्यार्थी व पालक दुसºया कामासाठी ते पैसे वापरू शकतात. नव्हेतर गेल्या वर्ष दोन वर्षातील असे अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे शासनाच्या मुळ हेतूच दूर पडतो. त्यामुळे डीबीटीचा निर्णय रद्द करणे आदिवासींच्या हिताचा ठरणार आहे.हा निर्णय झाला तेव्हा देखील आपण लोकप्रतिनिधी होता, तेव्हा विरोध केला होता का?हो निश्चितच, या संदर्भात सर्वप्रथम आपण विरोध दर्शविला होता. तत्कालीन मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांची भेट घेऊनही त्या संदर्भात आपली भुमिका मांडली होती. त्या काळातच हा निर्णय रद्द होणे अपेक्षीत होता. पण झाले नाही. त्याला अनेक कारणे असू शकतात. पण आता आदिवासी विकास मंत्री अ‍ॅड.के.सी.पाडवी यांनी चांगला निर्णय घेतला असून त्यातून चांगला निर्णय होइल.आपण स्वत: वसतिगृहात शिक्षण घेतले आहे. आदिवासी विद्यार्थी संघटनेचे राज्याचे अध्यक्षपदही भुषविले आहे. आदिवासी विकास राज्यमंत्री म्हणून काम पाहिले आहे. त्यामुळे डीबीटीचा निर्णयामुळे आदिवासी विद्यार्थ्यांचा शिक्षणावर काय परिणाम होऊ शकतो हे आपण बारकाईने अभ्यास केला आहे. त्यामुळे या विषयावर खूप काही वाद न घालता निर्णय रद्द झाला पाहिजे.डीबीटीचा निर्णयासंदर्भात राज्य शासनाने जी समिती नेमली आहे त्याचे प्रमुखपदी माजी मंत्री अ‍ॅड.पद्माकर वळवी यांची नियुक्ती केली आहे. ते देखील आदिवासींच्या प्रश्नांवर जाणकार, अनुभवी व अभ्यासू आहेत. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली ही समिती चांगले काम करेल व आदिवासींच्या हिताचा निर्णय त्यातून होईल याची आपल्याला खात्री आहे. त्यासाठी त्यांना सर्व संघटनांनी व पदाधिकाऱ्यांनी सहकार्य करण्याची गरज आहे.