शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

आरोग्य सेवेबाबत मानवी हक्क आयोगाचे आरोग्य सचिवांना समन्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2020 11:27 IST

  लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  जिल्ह्यातील दुर्गम भागातील आरोग्य सेवेच्या खालावलेल्या दर्जाबाबत राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाकडे करण्यात आलेल्या ...

  लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  जिल्ह्यातील दुर्गम भागातील आरोग्य सेवेच्या खालावलेल्या दर्जाबाबत राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाकडे करण्यात आलेल्या तक्रारीनुसार १७ नोव्हेंबर रोजी मुंबई येथे सुनावणी ठेवण्यात आली आहे. राज्याचे आरोग्य सचिव व जिल्हाधिका-यांना उपस्थित राहण्याचे बजावण्यात आले आहे.  दरम्यान याबाबत ‘लोकमत’नेही गेल्या सहा महिन्यात जिल्ह्यातील आरोग्य        सेवेवर वेळोवेळी  वृत्त प्रकाशीत केले होते. यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते दिग्विजय राजपूत यांनी पाठविलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, धडगाव तालुका तसेच नंदुरबार जिल्ह्यातील इतर सर्व मागास तालुक्यात आरोग्य सुविधांची खूप मोठ्या प्रमाणात कमतरता आहे. औषधी, आरोग्य कर्मचारी तसेच ॲम्बुलन्स व ऍम्ब्युलन्ससाठी लागणारा रस्ता या सर्वच मूलभूत सुविधांची आदिवासी तसेच मागास भागात वानवा आहे, स्वातंत्र्योत्तर काळापासून ते आजपावेतो या जिल्ह्याकडे किंवा जिल्ह्याच्या समस्याकडे कोणीही सकारात्मकतेने बघितले नाही, या अतीमागास भागातील नागरिकांना आरोग्य, दळणवळण यासारख्या मूलभूत सुविधा न मिळणे म्हणजे त्यांच्या मूलभूत हक्कांवर गदा आणण्याचा प्रकार आहे. ॲम्बुलन्स नसल्याकारणाने बांबूच्या झोळीत रुग्णास दवाखान्यापर्यंत नेले जाते ही अतिशय लाजिरवाणी बाब आहे. प्रशासनामार्फत या मागास भागातील आदिवासी बांधवांना आरोग्यसुविधा न पुरवणे म्हणजे त्यांच्या मूलभूत हक्कांना हिरावणे म्हणता येईल, यासाठी संपूर्णपणे जबाबदार आरोग्य प्रशासन तसेच जिल्हा प्रशासन असल्याचे तक्रारीत नमुद करण्यात आले होते.यासंबंधी राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाकडे सामाजिक कार्यकर्ते दिग्विजयसिंग राजपूत यांनी २२ सप्टेंबर रोजी  तक्रार दाखल केली होती. यानंतर सदर आयोगामार्फत ही तक्रार राज्य मानवी हक्क   आयोगाकडे वर्ग करण्यात आली. या तक्रारीची दखल घेऊन राज्य       मानवी हक्क आयोगा द्वारे १७ नोव्हेंबर रोजी सुनावणी लावण्यात आली    आहे. या सुनावणीसाठी राज्याचे आरोग्य विभागाचे सचिव यांना       हजर राहण्याचे आदेश सदर विभागामार्फत देण्यात आले आहेत तसेच नंदुरबार जिल्हाधिकारी यांना देखील राज्य मानवी हक्क आयोगाने समस पाठवला असून मानवी हक्क आयोगाद्वारे गंभीर दखल घेण्यात आली आहे. मानवी हक्क आयोगाने पहिल्यांदाच याची दखल घेतली   आहे.