शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

यंदाच्या हंगामात नंदुरबारात साडेपाच लाख क्विंटल साखर उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 12:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : गेल्या वर्षाच्या ऊस पळवापळवीचा आणि इतर कारखान्यांकडून उसाचे पेमेंट वेळेत न मिळाल्याच्या पाश्र्वभुमिवर यंदा शेतक:यांचा कल स्थानिक कारखान्यांनाच ऊस पुरविण्याचा दिसून येत आहे. गेल्या 75 ते 80 दिवसाच्या हंगामात जिल्ह्यातील तिन्ही साखर कारखान्यांनी एकुण पाच लाख 52 हजार 376 क्विंटल साखर उत्पादन केले आहे. आणखी किमान ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : गेल्या वर्षाच्या ऊस पळवापळवीचा आणि इतर कारखान्यांकडून उसाचे पेमेंट वेळेत न मिळाल्याच्या पाश्र्वभुमिवर यंदा शेतक:यांचा कल स्थानिक कारखान्यांनाच ऊस पुरविण्याचा दिसून येत आहे. गेल्या 75 ते 80 दिवसाच्या हंगामात जिल्ह्यातील तिन्ही साखर कारखान्यांनी एकुण पाच लाख 52 हजार 376 क्विंटल साखर उत्पादन केले आहे. आणखी किमान दोन महिन्यापेक्षा अधिक काळ कारखाने चालतील असा अंदाज आहे.जिल्ह्यातील सातपुडा साखर कारखाना, अॅस्ट्रोरिया शुगर व आदिवासी साखर कारखान्यांनी यंदा नियमितपणे नोव्हेंबर महिन्यापासून गाळपाला सुरुवात केली. तिन्ही कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात मुबलक ऊस असल्यामुळे तिन्ही कारखान्यांनी आतार्पयत समाधानकारक गाळप  केले आहे. तिन्ही कारखाने मिळून आणखी किमान दोन लाख क्विंटल साखर उत्पादन होण्याचा अंदाज  आहे.यंदा जिल्ह्यात ब:या प्रमाणात ऊस उपलब्ध आहे. तिन्ही कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात नोंदीचा व बिगर नोंदीचा ऊस मिळून तिन्ही कारखाने आपल्या क्षमतेप्रमाणे चालतील असा अंदाज होता. परंतु यंदाचा साखर हंगाम आणखी    किमान दोन महिना चालेल असा अंदाज आहे.पळवा-पळवीला यंदा फाटागेल्यावर्षी इतर जिल्ह्यात उसाची कमतरता लक्षात घेता अनेक साखर कारखान्यांनी जिल्ह्यातील ऊस पळविला होता. गुजरातमधील एका कारखान्याने जादा भाव देण्याचे अमिष दाखवून लाखो टन ऊस पळवून नेला होता. नंतर पेमेंट देतांना शेतक:यांची फिरवाफिरव केली होती. त्यामुळे यंदा जिल्ह्यातील शेतक:यांनी जिल्हाबाहेरील कारखान्यांना ऊस देण्याचे टाळले आहे. काही कारखान्यांनी जिल्ह्यात   गट कार्यालये देखील सुरू केली आहेत, परंतु त्यांना अद्याप फारसा प्रतिसाद मिळत नसल्याची स्थिती आहे. तिन्ही कारखाने पूर्ण क्षमतेने यंदा जिल्ह्यातील सातपुडा, अॅस्ट्रोरिया व आदिवासी कारखाना पुर्ण क्षमतेने गाळप करीत आहेत. सातपुडा साखर कारखान्याची गाळप क्षमता पाच हजार मे.टन प्रतिदिन आहे. या कारखान्याची एकच मील सध्या सुरू असली तरी त्यातही क्षमतेपेक्षा जास्त म्हणजे तीन ते साडेतीन हजार मे.टन गाळप करीत आहे. अॅस्ट्रोरिया शुगर हा कारखाना     देखील दैनंदिन साडेतीन ते चार     हजार मे.टन गाळप करीत आहे. आदिवासी साखर कारखानाही दैनंदिन एक हजार 200 मे.टन र्पयत गाळप करीत आहे.साखर उताराजिल्ह्यातील तिन्ही साखर कारखान्यांचा साखर उतारा सरासरी दहाच्या आतच आहे. सर्वाधिक साखर उतारा हा आदिवासी साखर कारखान्याचा 9.88 इतका आहे. सातपुडा साखर कारखान्याचा साखर उतारा सरासरी 9.33 तर अॅस्ट्रोरिया शुगर कारखान्याचा उतारा सरासरी 9.39 इतका आहे. तिन्ही साखर कारखान्यांकडून सरासरी उतारा दहार्पयत नेण्याचा प्रयत्न सुरू असला तरी अनेक तांत्रिक अडचणींमुळे ते शक्य नसल्याचे चित्र आहे.पुढील वर्षी ऊस मिळावा यासाठी यंदा तिन्ही साखर कारखान्यांनी ऊस लागवडीसाठी शेतक:यांना प्रोत्साहित करण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी ऊस बेण्यांची उपलब्धता, तांत्रिक मार्गदर्शन यासह इतर  बाबींद्वारे  प्रोत्साहन दिले जात आहे. यामुळे ऊस लागवडीत वाढ होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.