शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

जिल्ह्यातील साखर हंगाम आता समारोपाकडे..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2020 12:01 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : यंदा ऊसाची कमतरता लक्षात घेता जिल्ह्यातील तिन्ही साखर कारखान्याकडून गेल्या वर्षाच्या तुलनेत साधारणत: दोन ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : यंदा ऊसाची कमतरता लक्षात घेता जिल्ह्यातील तिन्ही साखर कारखान्याकडून गेल्या वर्षाच्या तुलनेत साधारणत: दोन ते अडीच लाख क्विंटल कमी साखर उत्पादन होण्याची शक्यता आहे. सद्य स्थितीत सातपुडा साखर कारखाना बंद झाला आहे. तर आयान शुगर आणि आदिवासी साखर कारखाना महिना अखेर बंद होण्याची शक्यता आहे.खान्देशात यंदा पाच कारखान्यांनी ऊस गाळप हंगाम घेतला आहे. त्यापैकी तीन कारखाने एकट्या नंदुरबार जिल्ह्यातील आहेत. जिल्ह्यातील शहादा येथील सातपुडा सहकारी साखर कारखाना, नवापूर तालुक्यातील आदिवासी सहकारी साखर कारखाना व खाजगी तत्वावरील नंदुरबार तालुक्यातील आयान शुगर या कारखान्यांचा त्यात समावेश आहे. नोव्हेंबर महिन्यात या तिन्ही साखर कारखान्यांनी गाळप हंगामास सुरुवात केली होती.यंदा ऊसाची कमतरता असल्यामुळे सर्वच कारखान्यांनी कमी कालावधीत जास्तीत जास्त ऊस गाळप करण्यासाठी प्रयत्न केला होता. असे असले तरी लगतच्या गुजरात व मध्यप्रदेशातील खांडसरी आणि साखर कारखान्यांनी जिल्ह्यातील ऊस पळविण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता. त्यामुळे तिन्ही साखर कारखान्यांच्या गाळप हंगामावर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.सद्य स्थितीत सातपुडा साखर कारखान्याने त्यांच्याकडे शेतकऱ्यांनी नोंद केलेला सर्व ऊस गाळप केला आहे. आणखी ऊस मिळण्याची आशा मावळल्याने कारखान्याने आपल्या गाळप हंगामाचा समारोप केला आहे.गेल्या वर्षी जिल्ह्यात साधारणत: दहा लाखापेक्षा अधीक साखर उत्पादन झाले होते. यंदा जवळपास ७ लाख ५५ हजार क्विंटलपेक्षा अधीक साखर उत्पादन शक्य आहे.आयान शुगर कारखाना देखील पुर्ण १०० दिवस चालण्याची शक्यता आहे. कारखान्याकडे अजूनही ऊसाचा पुरवठा सुरू आहे. आदिवासी साखर कारखान्याचे जवळपास ९० दिवस सुरू ठेवण्याचे नियोजन केल्याचे समजते. कारखान्याकडे अजूनही ऊस पुरवठा सुरू आहे.पुढील वर्षी चांगला हंगामयंदा साधारणत: सरासरीपेक्षा दीडशे टक्के पाऊस झाला आहे. विहिरी, कुपनलिका यांच्या पाण्याची पातळी समाधानकारक आहे. अनेक जलप्रकल्प अद्यापही ६० ते ७० टक्केपेक्षा अधीक भरलेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी यंदा ऊस लागवडीला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे पुढील वर्षी तिन्ही साखर कारखान्यांना मुबलक प्रमाणात ऊस उपलब्ध होण्याची शक्यता आहे. कारखान्यांनी ऊस लागवडीसाठी शेतकºयांना प्रोत्साहन देणे देखील सुरू ठेवले आहे.

यंदाच्या साखर हंगामात सर्वाधिक साखर उत्पादन खाजगी तत्वावरील आयान शुगर कारखाना घेणार आहे. १७ तारखेच्या अहवालानुसार कारखान्याने ३,२३,५३० मे.टन ऊस गाळप केले आहे. त्यातून ३,२९,८५० क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. सरासरी साखर उतारा १०.२८ टक्के मिळाला आहे.नवापूर तालुक्यातील आदिवासी सहकारी साखर कारखान्याने ९९,९३३ मे.टन ऊस गाळप करून ९५,३०० क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. सरासरी साखर उतारा ९.६० टक्के मिळाला आहे. कारखाना आणखी काही दिवस चालण्याची शक्यता आहे.सातपुडा साखर कारखान्याने १०.२५ सरासरी साखर उताऱ्याच्या तुलनेत २ लाख ८१ हजारापेक्षा अधीक ऊस गाळप करून २ लाख ८६ हजारापेक्षा अधीक साखर उत्पादन घेतले आहे. कारखाना सरासरी ८८ दिवस सुरू राहिला.