शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
3
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
4
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
5
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
6
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
7
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
8
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
9
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
10
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
11
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
12
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
13
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
14
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
15
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
16
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
17
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
18
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
19
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
20
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

जिल्ह्यातील साखर हंगाम आता समारोपाकडे..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2020 12:01 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : यंदा ऊसाची कमतरता लक्षात घेता जिल्ह्यातील तिन्ही साखर कारखान्याकडून गेल्या वर्षाच्या तुलनेत साधारणत: दोन ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : यंदा ऊसाची कमतरता लक्षात घेता जिल्ह्यातील तिन्ही साखर कारखान्याकडून गेल्या वर्षाच्या तुलनेत साधारणत: दोन ते अडीच लाख क्विंटल कमी साखर उत्पादन होण्याची शक्यता आहे. सद्य स्थितीत सातपुडा साखर कारखाना बंद झाला आहे. तर आयान शुगर आणि आदिवासी साखर कारखाना महिना अखेर बंद होण्याची शक्यता आहे.खान्देशात यंदा पाच कारखान्यांनी ऊस गाळप हंगाम घेतला आहे. त्यापैकी तीन कारखाने एकट्या नंदुरबार जिल्ह्यातील आहेत. जिल्ह्यातील शहादा येथील सातपुडा सहकारी साखर कारखाना, नवापूर तालुक्यातील आदिवासी सहकारी साखर कारखाना व खाजगी तत्वावरील नंदुरबार तालुक्यातील आयान शुगर या कारखान्यांचा त्यात समावेश आहे. नोव्हेंबर महिन्यात या तिन्ही साखर कारखान्यांनी गाळप हंगामास सुरुवात केली होती.यंदा ऊसाची कमतरता असल्यामुळे सर्वच कारखान्यांनी कमी कालावधीत जास्तीत जास्त ऊस गाळप करण्यासाठी प्रयत्न केला होता. असे असले तरी लगतच्या गुजरात व मध्यप्रदेशातील खांडसरी आणि साखर कारखान्यांनी जिल्ह्यातील ऊस पळविण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता. त्यामुळे तिन्ही साखर कारखान्यांच्या गाळप हंगामावर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.सद्य स्थितीत सातपुडा साखर कारखान्याने त्यांच्याकडे शेतकऱ्यांनी नोंद केलेला सर्व ऊस गाळप केला आहे. आणखी ऊस मिळण्याची आशा मावळल्याने कारखान्याने आपल्या गाळप हंगामाचा समारोप केला आहे.गेल्या वर्षी जिल्ह्यात साधारणत: दहा लाखापेक्षा अधीक साखर उत्पादन झाले होते. यंदा जवळपास ७ लाख ५५ हजार क्विंटलपेक्षा अधीक साखर उत्पादन शक्य आहे.आयान शुगर कारखाना देखील पुर्ण १०० दिवस चालण्याची शक्यता आहे. कारखान्याकडे अजूनही ऊसाचा पुरवठा सुरू आहे. आदिवासी साखर कारखान्याचे जवळपास ९० दिवस सुरू ठेवण्याचे नियोजन केल्याचे समजते. कारखान्याकडे अजूनही ऊस पुरवठा सुरू आहे.पुढील वर्षी चांगला हंगामयंदा साधारणत: सरासरीपेक्षा दीडशे टक्के पाऊस झाला आहे. विहिरी, कुपनलिका यांच्या पाण्याची पातळी समाधानकारक आहे. अनेक जलप्रकल्प अद्यापही ६० ते ७० टक्केपेक्षा अधीक भरलेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी यंदा ऊस लागवडीला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे पुढील वर्षी तिन्ही साखर कारखान्यांना मुबलक प्रमाणात ऊस उपलब्ध होण्याची शक्यता आहे. कारखान्यांनी ऊस लागवडीसाठी शेतकºयांना प्रोत्साहन देणे देखील सुरू ठेवले आहे.

यंदाच्या साखर हंगामात सर्वाधिक साखर उत्पादन खाजगी तत्वावरील आयान शुगर कारखाना घेणार आहे. १७ तारखेच्या अहवालानुसार कारखान्याने ३,२३,५३० मे.टन ऊस गाळप केले आहे. त्यातून ३,२९,८५० क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. सरासरी साखर उतारा १०.२८ टक्के मिळाला आहे.नवापूर तालुक्यातील आदिवासी सहकारी साखर कारखान्याने ९९,९३३ मे.टन ऊस गाळप करून ९५,३०० क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. सरासरी साखर उतारा ९.६० टक्के मिळाला आहे. कारखाना आणखी काही दिवस चालण्याची शक्यता आहे.सातपुडा साखर कारखान्याने १०.२५ सरासरी साखर उताऱ्याच्या तुलनेत २ लाख ८१ हजारापेक्षा अधीक ऊस गाळप करून २ लाख ८६ हजारापेक्षा अधीक साखर उत्पादन घेतले आहे. कारखाना सरासरी ८८ दिवस सुरू राहिला.