शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
3
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
4
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
5
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
6
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
7
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
8
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
9
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
10
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
11
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
12
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
13
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
14
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे ५ कॅरेबियन खेळाडू, पाहा फोटो
15
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
16
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
17
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
18
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
19
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
20
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले

बॉयलर कोंबडीसाठी एका ग्रा.पं.ची अशीही परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2020 12:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ब्राह्मणपुरी : कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी केंद्र सरकारने संपूर्ण भारत लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्कब्राह्मणपुरी : कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी केंद्र सरकारने संपूर्ण भारत लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जीवनावश्यक वस्तू आणण्यासाठी चक्क धुळे जिल्ह्यातून बॉयलर कोंबडी आणण्यासाठी ग्रामपंचायतमार्फत परवानगी देण्यात येत असल्याचेसमोर आले आहे.याबाबत असे की, सध्या कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यातच मुबंई-पुणे सारख्या शहरासह नंदुरबार, धुळे व जळगाव जिल्ह्यातदेखील कोरोनाचा शिरकाव झाला असून, नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.जिल्हा प्रशासनामार्फत जीवनावश्यक वस्तू आणण्यासाठी सूट देण्यात आली आहे. त्यासाठी आॅनलाइन पास घेणे तसेच तहसील, आर.टी. ओ यांच्याकडून परवानगी घेण्यासाठी साईटदेखील सुरू करण्यात आली आहे. परंतु परजिल्ह्यातून जीवनावश्यक वस्तू वाहतुकीसाठी चक्क ग्रामपंचायतमार्फत परवानगी देण्यात आल्याचे समोर आले आहे.प्रशासनामार्फत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी विविध प्रकारे खबरदारी करण्यात येत आहे. इतर जिल्ह्यात जाण्यासाठी आॅनलाइन नोंद होत असल्याने प्रशासनाकडे त्याची माहिती असते तरी ग्रामपंचायत जर इतर जिल्ह्यात जाण्यासाठी परवानगी देत असेल तर कोरोना विषाणू इतर जिल्ह्यात सहज प्रवेश करू शकतो. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने याकडे गाभीर्यपणे लक्ष देऊन परजिल्ह्यातून येणाऱ्या वाहनचालकाची आरोग्य तपासणी करण्यात यावी अशी मागणी होत आहे.