शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
2
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
3
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
6
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
7
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
8
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
9
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
10
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
11
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
12
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
13
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
14
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
15
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
16
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
17
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
18
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
19
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
20
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी

60 ठिकाणी सब-वे : नंदुरबार-सुरत अवघ्या दोन तासांचा होणार प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 12:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : उधना-जळगाव रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाअंतर्गत 300 कि.मी.अंतरात तब्बल 60 सब वे काढण्यात आले असून यामुळे ही लाईन मुंबई परिमंडळात सर्वात सुरक्षित रेल्वे लाईन म्हणून ओळखली जाणार आहे. दरम्यान, उधना ते सुरत दरम्यान तिसरा रेल्वेमार्ग टाकला जाणार असल्यामुळे ताप्ती सेक्शनवरील रेल्वे गाडय़ांना होणारा 25 ते 30 मिनिटांचा उशीर ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : उधना-जळगाव रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाअंतर्गत 300 कि.मी.अंतरात तब्बल 60 सब वे काढण्यात आले असून यामुळे ही लाईन मुंबई परिमंडळात सर्वात सुरक्षित रेल्वे लाईन म्हणून ओळखली जाणार आहे. दरम्यान, उधना ते सुरत दरम्यान तिसरा रेल्वेमार्ग टाकला जाणार असल्यामुळे ताप्ती सेक्शनवरील रेल्वे गाडय़ांना होणारा 25 ते 30 मिनिटांचा उशीर आता कमी होणार आहे. उधना-जळगाव रेल्वे मार्गाचे काम 75 टक्के पुर्ण झाले आहे. उधना ते नंदुरबार आणि जळगाव ते शिंदखेडा दरम्यानचे काम पुर्ण झाले आहे. आता शिंदखेडा ते नंदुरबार दरम्यानचे काम बाकी आहे. हे काम मार्च 2018 अखेर पुर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. परंतु सध्याची कामाची गती पहाता ते शक्य नसल्याची स्थिती आहे. सुरक्षीत मार्ग म्हणून ओळख300 किलोमिटर अंतराच्या या मार्गावर तब्बल 60 सबवे काढण्यात आलेले आहेत. त्यामुळे हा रेल्वे मार्ग सर्वात सुरक्षीत राहणार आहे. 60 सबवेंवर एकुण 60 कोटी अतिरिक्त खर्च आला आहे. या सबवे मुळे खाजगी वाहने आणि रेल्वे    यांच्यातील धडक किंवा मानवरहित रेल्वे फाटके ही बाब कालबाह्य ठरणार आहे. याशिवाय रेल्वे गाडय़ांची वर्दळीच्या वेळी त्यांना पासींगसाठी देखील सात वेगळे पूल तयार  करण्यात आले आहेत. सिगAलची अत्याधुनिक यंत्रणा देखील  कार्यान्वीत करण्यात येणार आहे. आरआरआय रिले रूट इंटरलॉकिंग याचा उपयोग त्यासाठी केला जाणार आहे. अर्धा ते पाऊण तास वायासध्या सुरत ते भुसावळ या प्रवासात अर्धा ते पाऊण तास वाया जात आहे. त्याला कारण सुरत ते उधना दरम्यान मुंबई लाईनवर गाडय़ांची वर्दळ आणि त्यांना पासिंगसाठी ताप्ती सेक्शनवरील गाडय़ांना थांबवून ठेवणे हे आहे. त्यामुळे किमान 25 ते 30 मिनिटे किंवा जास्तीत जास्त 45 मिनिटांचा वेळ वाया जातो. त्यामुळे एकतर गाडय़ा सुरत किंवा उधना स्थानकावर थांबून राहतात.आता उधना ते सुरत या 19 कि.मी.च्या अंतरात तिसरी रेल्वे लाईन टाकली जाणार आहे. त्यामुळे अनेक रेल्वेगाडय़ा या तिस:या ट्रॅकवर वळविण्यात येणार असल्यामुळे  रहदारी सुरळीत राहण्यास मदत होणार आहे.या रेल्वेंना होतो उशीरसध्याच्या परिस्थितीत ताप्ती सेक्शनमधील ताप्ती-गंगा, अहमदाबाद-ईलाहाबाद, बडोदा-वाराणसी, महामना-मालदा टाऊन, ओखा-पूरी, अहमदाबाद-पूरी, हावडा, नवजीवन, बिकानेर-सिकंदराबाद, जोधपूर-चेन्नई, अहमदाबाद-यशवंतपूर, अजमेर-पूरी, पोरबंदर-हावडा, गांधीधाम-विशाखापट्टणम, राजकोट-रेवा, हापा-बिलासपूर, ओखा-रामेश्वरम,  अहमदाबाद-दरबंगा या एक्सप्रेस गाडय़ांचा समावेश   आहे. त्यांना सुरत स्थानकानंतर उधनामार्गे भुसावळ लाईनवर वळविण्यात येते. प्रत्येक गाडीला यामुळे सहाजिकच किमान अर्धातास उशीर होतो. आता टाकण्यात येणारी तिसरी लाईन ही सुरत रेल्वे स्थानकातील चौथ्या फ्लॅटफार्मवरून थेट उधना स्थानकाच्या भुसावळ रेल्वे लाईनर्पयत राहणार आहे त्यामुळे थेट पासींग होण्यास मदत होणार आहे.