शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

60 ठिकाणी सब-वे : नंदुरबार-सुरत अवघ्या दोन तासांचा होणार प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 12:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : उधना-जळगाव रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाअंतर्गत 300 कि.मी.अंतरात तब्बल 60 सब वे काढण्यात आले असून यामुळे ही लाईन मुंबई परिमंडळात सर्वात सुरक्षित रेल्वे लाईन म्हणून ओळखली जाणार आहे. दरम्यान, उधना ते सुरत दरम्यान तिसरा रेल्वेमार्ग टाकला जाणार असल्यामुळे ताप्ती सेक्शनवरील रेल्वे गाडय़ांना होणारा 25 ते 30 मिनिटांचा उशीर ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : उधना-जळगाव रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाअंतर्गत 300 कि.मी.अंतरात तब्बल 60 सब वे काढण्यात आले असून यामुळे ही लाईन मुंबई परिमंडळात सर्वात सुरक्षित रेल्वे लाईन म्हणून ओळखली जाणार आहे. दरम्यान, उधना ते सुरत दरम्यान तिसरा रेल्वेमार्ग टाकला जाणार असल्यामुळे ताप्ती सेक्शनवरील रेल्वे गाडय़ांना होणारा 25 ते 30 मिनिटांचा उशीर आता कमी होणार आहे. उधना-जळगाव रेल्वे मार्गाचे काम 75 टक्के पुर्ण झाले आहे. उधना ते नंदुरबार आणि जळगाव ते शिंदखेडा दरम्यानचे काम पुर्ण झाले आहे. आता शिंदखेडा ते नंदुरबार दरम्यानचे काम बाकी आहे. हे काम मार्च 2018 अखेर पुर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. परंतु सध्याची कामाची गती पहाता ते शक्य नसल्याची स्थिती आहे. सुरक्षीत मार्ग म्हणून ओळख300 किलोमिटर अंतराच्या या मार्गावर तब्बल 60 सबवे काढण्यात आलेले आहेत. त्यामुळे हा रेल्वे मार्ग सर्वात सुरक्षीत राहणार आहे. 60 सबवेंवर एकुण 60 कोटी अतिरिक्त खर्च आला आहे. या सबवे मुळे खाजगी वाहने आणि रेल्वे    यांच्यातील धडक किंवा मानवरहित रेल्वे फाटके ही बाब कालबाह्य ठरणार आहे. याशिवाय रेल्वे गाडय़ांची वर्दळीच्या वेळी त्यांना पासींगसाठी देखील सात वेगळे पूल तयार  करण्यात आले आहेत. सिगAलची अत्याधुनिक यंत्रणा देखील  कार्यान्वीत करण्यात येणार आहे. आरआरआय रिले रूट इंटरलॉकिंग याचा उपयोग त्यासाठी केला जाणार आहे. अर्धा ते पाऊण तास वायासध्या सुरत ते भुसावळ या प्रवासात अर्धा ते पाऊण तास वाया जात आहे. त्याला कारण सुरत ते उधना दरम्यान मुंबई लाईनवर गाडय़ांची वर्दळ आणि त्यांना पासिंगसाठी ताप्ती सेक्शनवरील गाडय़ांना थांबवून ठेवणे हे आहे. त्यामुळे किमान 25 ते 30 मिनिटे किंवा जास्तीत जास्त 45 मिनिटांचा वेळ वाया जातो. त्यामुळे एकतर गाडय़ा सुरत किंवा उधना स्थानकावर थांबून राहतात.आता उधना ते सुरत या 19 कि.मी.च्या अंतरात तिसरी रेल्वे लाईन टाकली जाणार आहे. त्यामुळे अनेक रेल्वेगाडय़ा या तिस:या ट्रॅकवर वळविण्यात येणार असल्यामुळे  रहदारी सुरळीत राहण्यास मदत होणार आहे.या रेल्वेंना होतो उशीरसध्याच्या परिस्थितीत ताप्ती सेक्शनमधील ताप्ती-गंगा, अहमदाबाद-ईलाहाबाद, बडोदा-वाराणसी, महामना-मालदा टाऊन, ओखा-पूरी, अहमदाबाद-पूरी, हावडा, नवजीवन, बिकानेर-सिकंदराबाद, जोधपूर-चेन्नई, अहमदाबाद-यशवंतपूर, अजमेर-पूरी, पोरबंदर-हावडा, गांधीधाम-विशाखापट्टणम, राजकोट-रेवा, हापा-बिलासपूर, ओखा-रामेश्वरम,  अहमदाबाद-दरबंगा या एक्सप्रेस गाडय़ांचा समावेश   आहे. त्यांना सुरत स्थानकानंतर उधनामार्गे भुसावळ लाईनवर वळविण्यात येते. प्रत्येक गाडीला यामुळे सहाजिकच किमान अर्धातास उशीर होतो. आता टाकण्यात येणारी तिसरी लाईन ही सुरत रेल्वे स्थानकातील चौथ्या फ्लॅटफार्मवरून थेट उधना स्थानकाच्या भुसावळ रेल्वे लाईनर्पयत राहणार आहे त्यामुळे थेट पासींग होण्यास मदत होणार आहे.