शहरं
Join us  
Trending Stories
1
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
2
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
3
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
4
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
5
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
6
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
7
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
8
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
9
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
10
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
11
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
12
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
13
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
14
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
15
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
16
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
17
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
18
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
19
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

शहादा तालुक्यातील अनेक गावांतील विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल नेटवर्कच्या शोधात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:21 IST

जयनगर : सलग दुसऱ्या वर्षीही कोरोना महामारीमुळे शाळा बंद असून ऑनलाईन शिक्षण चालू आहे. शाळा ऑनलाईन सुरू होऊन अर्धा ...

जयनगर : सलग दुसऱ्या वर्षीही कोरोना महामारीमुळे शाळा बंद असून ऑनलाईन शिक्षण चालू आहे. शाळा ऑनलाईन सुरू होऊन अर्धा महिना उलटला. मात्र शहादा तालुक्यातील अनेक गावांतील विद्यार्थी या ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल नेटवर्कच्या शोधात आहेत; कारण शहादा तालुक्यातील लोंढरे, धांद्रे, कुकावल, कळंबू, बोराळे, मातकूट, खापरखेडा या गावांमध्ये मोबाईल नेटवर्क पुरेसे नसल्याने ऑनलाईन शिक्षणाच्या सोयी-सुविधा अजूनही पुरेशा प्रमाणात उपलब्ध झालेल्या नाहीत. तसेच तालुक्यातील अनेक गावांमधील मुलांकडे स्मार्टफोन नसल्याने त्यांच्या शिक्षणाचे काय होणार? हा प्रश्न पालकांसहित शासनाच्याही विचारात असावा.

राज्य सरकार आणि शिक्षण मंडळाने कोरोना महामारीमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मागील वर्षाप्रमाणेच या वर्षीही ऑनलाईन शिक्षण सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या गावांमध्ये नेटवर्क व ऑनलाईन शिक्षणाच्या सुविधा आहेत, ती मुले सलग दुसऱ्या वर्षी ऑनलाईन शिक्षणासाठी हजर आहेत. मात्र गरीब विद्यार्थी स्मार्टफोनअभावी तसेच अनेक गावांमध्ये पुरेशा नेटवर्कअभावी बरेच विद्यार्थी ऑनलाईनला मागील वर्षापासून सतत गैरहजर दिसत आहेत. म्हणून अशा विद्यार्थ्यांचे भवितव्य सध्या तरी अंधारातच दिसत आहे. आताही कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या भीतीने अजूनही शाळा चालू होण्याची चिन्हे दिसत नसून, विद्यार्थ्यांच्या ऑनलाईनला गैरहजेरीचे प्रमाण वाढतच राहणार आहे.

गेल्या वर्षी प्राथमिक शाळा उघडल्याच नाहीत; तर माध्यमिक शाळा दोन-अडीच महिने चालल्यावर पुन्हा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने डोके वर काढल्याने शासनाला पुन्हा या शाळा बंद कराव्या लागल्या. नंतर बोर्डाच्या परीक्षा इतिहासात प्रथमच शासनाला रद्द कराव्या लागल्या आणि सरसकट सगळ्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता या सगळ्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण चालू आहे. मात्र तालुक्यात अनेक गावांमध्ये पुरेसे नेटवर्क तसेच अनेक विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन नसल्याने अनेक विद्यार्थी सलग दुसऱ्या वर्षाच्या शिक्षणापासून वंचित आहेत. त्यामुळे शिक्षण विभागाने काहीतरी उपाययोजना करून अशा नेटवर्क नसलेल्या भागात तसेच स्मार्टफोन नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी काहीतरी उपाययोजना करायला हवी, अशी प्रतिक्रिया पालकांकडून व्यक्त केली जात आहे.

शाळेची इमारत न पाहताच विद्यार्थी दुसरीला

पालकांनी मागील वर्षी सहा वर्षे वय पूर्ण झाल्यावर आपल्या पाल्यांना पहिलीला प्रवेश मिळवून दिला होता. मात्र ॲडमिशन झाल्यावर सलग एक वर्ष शाळेची इमारत न पाहताच मुले दुसरीला गेली आहेत. आताही सहा वर्षे वय झालेल्या मुलांची नावे अंगणवाडीमधून पहिलीसाठी प्रवेशित झाली आहेत. असे विद्यार्थी ऑनलाईनमुळे या वर्षीही शाळा न पाहताच दुसरीला जातील, असे चित्र दिसत आहे.