शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
3
लक्षात ठेवा, नापास झाल्याने आयुष्य संपत नाही ! सचिन तेंडुलकर, नागराज मंजुळे झाले होते नापास
4
Sensex २९५ आणि Nifty ११४ अंकांच्या तेजीसह बंद; 'या' शेअर्समध्ये मोठा चढ-उतार
5
रशियाचा भारताला पाठिंबा! 'पहलगामच्या गुन्हेगारांना सोडता कामा नये'; पुतिन यांचा पीएम मोदींना फोन
6
मोदी सरकार देतंय ₹५ लाख लिमिट असलेलं क्रेडिट कार्ड; कसा मिळेल फायदा, जाणून घ्या
7
"ऋषभ पंतला पुन्हा फॉर्मात यायचे असेल तर त्याने धोनीला फोन करावा"; दिग्गज फलंदाजाचा सल्ला
8
Nashik Crime: तिन्ही कोयत्यांवर जाधव बंधूंच्या रक्ताचे डाग आहेत तसेच; महाजनच्या घरात सापडली शस्त्रे
9
Ather Energy IPO चं अलॉटमेंट 'असं' करा चेक, ग्रे मार्केट प्रीमिअम काय देतोय संकेत?
10
POK नाही तर 'लाहोर'वरही भारताचा ताबा होता; UNSC च्या मध्यस्थीनं कसा वाचला पाकिस्तान?
11
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
12
Mumbai: केतकीपाडा, फिल्मसिटी, दामूनगर येथील झोपड्यांवरील कारवाईला आठ दिवसांची मुदतवाढ
13
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
14
शाब्बास पोरी! ३ वेळा नापास होऊनही मानली नाही हार, मजुराची लेक झाली IAS अधिकारी
15
PF Account मधून किती रक्कम तुम्ही काढू शकता? काय आहेत नियम आणि अटी
16
परीक्षेत नापास, आयुष्यात पास! दहावीत मुलगा ६ विषयांत झाला फेल तरी पालकांनी कापला केक, कारण...
17
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
18
खळबळजनक! मनाविरुद्ध लग्न होताच काढला पतीचा काटा; बॉयफ्रेंडसह ७ जणांना अटक
19
'गँग्ज ऑफ वासेपूर', 'दबंग' फेम प्रसिद्ध कलाकाराचं दुःखद निधन, बॉलिवूडवर पसरली शोककळा
20
"पाकिस्तानी आर्मी तिथल्या तरुणांना आवडत नाही", बॉलिवूड सिंगरचा दावा, म्हणाला- "ते म्हणाले की तुम्ही भाग्यवान..."

रस्त्याअभावी विद्यार्थी बससेवा बंद :तळोदा-अमोनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 15:15 IST

तळोदा-अमोनी : शैक्षणिक नुकसान; खाजगी वाहनांचा आधार; प्रशासनाचे दुर्लक्ष

तळोदा : तळोदा-अमोनी ही विस्थापितांसाठी सुरू केलेली बस अरुंद रस्त्याचे कारण दाखवत गेल्या महिनाभरापासून बंद करण्यात             आली आहे. त्यामुळे शालेय विद्याथ्र्याचे शैक्षणिक नुकसान होत आहे. या विस्थापितांनाही खाजग वाहनातून महागडा प्रवास करावा लागत आहे. हा रस्ता आता चांगला झाला आहे. तसेच या बसचा मार्ग बदलून तो तळोदा ते कालीबेल       असा करून ही बसफेरी तातडीने सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.सरदार सरोवर प्रकल्पात बाधित झालेल्या विस्थापित गावांसाठी अक्कलकुवा आगाराने तळोदा-अमोनी ही बस सेवा गेल्या अनेक वर्षापासून सुरू केली होती. साहजिकच या बसमधून साधारण 150 शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी तळोद्याला येण्यासाठी प्रवास करीत असतात. त्याच बरोबर तेथील नागरीकही या बसमध्येच बाजारहाट व इतर कार्यालयीन कामकाजासाठी तळोद्याला येत असतात. परंतु अरूंद रस्त्याचे किरकोळ कारण दाखवत संबंधित आगार प्रमुखाने गेल्या महिनाभरापासून ही बससेवा बंद केली आहे. त्यामुळे अमोनी, रेवानगर, नर्मदानगर, सरदारनगर, राजविहीर आदी ठिकाणाहून तळोद्याला शालेय व महाविद्यालयात शिकायला येणा:या 150 विद्याथ्र्याचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यांना नाईलाजास्तव खाजगी वाहनातून महागडा प्रवास करावा लागत आहे. या उपरांतरही वाहनधारक गाडीमध्ये प्रवाशांना कोंबडय़ासारखे कोंबून आणत असल्यामुळे नाईलाजास्तव धोकादायक प्रवास करावा लागत असल्याची विद्याथ्र्याची व्यथा आहे.वास्तविक या मार्गाची डागडूजी झाली आहे. शिवाय रस्ता अरूददेखील झाला आहे. त्यामुळे सहन बस जावू शकते, अशी वस्तुस्थिती असतांना अजूनपावेतो संबंधित विभागाने ही बससेवा सुरू करण्याबाबत उदासिन धोरण घेतले आहे. रस्त्याच्या स्थितीची चौकशी करून बस सुरू करावी अशी मागणी केली आहे. त्याचबरोबर या बसचा सद्याचा मार्ग बदलून तो तळोदा, दलेलपूर, रेवानगर, रानमहू, अमोनी, कालीबेल असा करावा. कारण हा मार्ग प्रवाशांना उलटा पडतो. रेवानगरकडे येण्यासाठी 20 किलोमीटर फिरून यावे लागते. शिवाय अतिरिक्त भाडेदेखील             द्यावे लागत असते. साहजिकच प्रवाशांनाही नाहक आर्थिक भरुदड सोसावा लागतोच. त्यात वेळही            वाया जात असतो. त्यामुळे या           मार्गाने ही बससेवा तत्काळ सुरू करण्यात यावी, अशी मागणी पंचायत समिती सदस्य नाथा पावरा,          उपसरपंच दाज्या पावरा, इंदास पावरा, अनिल पावरा सचिन पावरा, लेह:या पावरा, दिगंबर पावरा यांनी केली आहे. दरम्यान तळोदा येथील बसस्थानकाचे वाहतूक नियंत्रक जयसिंग वळवी यांनी निवेदन स्विकारून सदर बस फेरी सुरू करण्यासाठी अक्कलकुवा आगारप्रमुखांकडे ताबडतोब पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.