शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट होणे गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 12:57 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोठार : नेत्रंग-शेवाळी राष्ट्रीय महामार्गावरील तळोदा ते सेलंबा दरम्यानच्या पुलांवर जीवघेणे खड्डे पडले आहेत. या खड्डय़ांबरोबरच ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोठार : नेत्रंग-शेवाळी राष्ट्रीय महामार्गावरील तळोदा ते सेलंबा दरम्यानच्या पुलांवर जीवघेणे खड्डे पडले आहेत. या खड्डय़ांबरोबरच पुलांची मोठी दुरवस्था झाल्याने  पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट होणे गरजेचे झाले आहे.ब:हाणपूर-अंकलेश्वर  राज्यमार्गावरील तळोदा ते नेत्रंगर्पयतचा रस्ता हा  शेवाळी-नेत्रंग राष्ट्रीय महामार्गात वर्ग करण्यात आला आहे. तळोदापासून नेत्रंगर्पयतच्या रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर राष्ट्रीय महामार्गाच्या दृष्टीने कोणतेही ठोस काम या मार्गावर करण्यात आलेले नाही. तळोदा ते दरम्यान येणा:या पुलांची मोठी वाताहत झाली आहे. शेवाळी-नेत्रंग राष्ट्रीय महामार्गावरील तळोदा ते सेलंबार्पयत आठ ते दहा लहान-मोठे पूल येतात. पावसामुळे महामार्गावरील या पुलांवर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. वाहनधारकांना व पादचा:यांना जीवघेणी कसरत करून या महामार्गावरून मार्गक्रमण करावे लागते.राष्ट्रीय महामार्गावरील निंभोरा गावाजवळील श्रीकृष्ण खांडसरीजवळ असलेल्या गुजरात हद्दीतील पुलावर जीवघेणे खड्डे पडलेले आहेत. पावसामुळे पुलावरील डांबर व खडी पूर्णपणे निखळली आहे.  डांबराखाली आच्छादन केलेल्या लोखंडी सळय़ा वर आल्या असून वाहनधारकांसाठी त्या अत्यंत जीवघेण्या ठरत आहेत. अशीच परिस्थिती अक्कलकुवा ते सोरापाडय़ाला जोडणा:या वरखेडी नदीवरील पुलाची आहे. दरवर्षी या पुलांवर मोठमोठे खड्डे पडतात. अल्पावधीतच या पुलावरील खडय़ांचे भगदाडमध्ये रूपांतर होते. या पुलांवर प्रचंड प्रमाणात वाहतूक असून दररोज हजारो जड-अवजड वाहने या पुलावरून मार्गक्रमण करतात. खड्डय़ांमधून मार्ग काढत वाहनधारक आपली वाहने कशीतरी पुढे नेतात. अशा दुचाकी चालकही खड्डे टाळत ट्रक-कंटेनरला मागे टाकत जीवघेण्या पद्धतीने पुढे निघतात. या खड्डय़ांमुळे वाहतूक मंदवते व अक्कलकुवा ते सोरापाडा दरम्यान वाहनांच्या मोठय़ा रांगा लागतात. त्यामुळे या पुलावर अपघाताची शक्यता निर्माण होते.या दोन मुख्य पुलांसह राष्ट्रीय महामार्गावरील तळोदा ते सेलंबा दरम्यान कुकरमुंडा फाटय़ाजवळील पूल, अक्कलकुवा ते कुंभारखानफाटा दरम्यानचा पूल, खापर येथील देहली नदीवरील पूल आदी अनेक लहान-मोठय़ा नद्या व नाल्यांवरील पुलांची वाताहत झाली आहे. पुलांवर जीवघेणे खड्डे पडले असून संरक्षक कठडे, पिलर, जॉईंट यांचीही दुरवस्था झाली आहे. प्रशासनाने मात्र राष्ट्रीय महामार्गावरील पुलांच्या दुरुस्तीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे.  तळोदा ते सेलंबार्पयत रस्ता हा राष्ट्रीय महामार्गाचा दर्जाचा असून दिवसभरात हजारो वाहनांची या पुलांवरुन वर्दळ असते. त्यामुळे पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावे, अशी मागणी करण्यात येत आहे.दरम्यान, राष्ट्रीय महामार्गावरील या दोन्ही महत्त्वाच्या पुलांवरील खड्डय़ांची चार महिन्यापूर्वी दुरुस्ती करण्यात आली होती. परंतु पहिल्याच पावसात या पुलांवर खड्डे पडल्यानेअत्यंत निकृष्ट दर्जाची दुरुस्ती करण्यात आली असल्याचे बोलले जात आहे.

अक्कलकुवा-सोरापाडा दरम्यान वरखेडी नदीवरील पूल अत्यंत धोकेदायक बनला असून हा पूल कधीही कोसळेल अशी भीती वाहनधारकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. मागीलवर्षीही या पुलावर मोठमोठे खड्डे पडले होते. पावसाळ्यानंतर या पुलावर पडलेले भगदाड व खड्डे प्रशासनाकडून बुजवण्यात आले. परंतु पहिल्याच पावसात या पुलाला पूर्वीप्रमाणे मोठे भगदाड व खड्डे पडलेले आहेत. प्रशासनाकडून खड्डे बुजवण्यासाठी दोनदा खडी व मुरूम टाकण्यात आली. पुलावरील वाहतुकीमुळे पुलावर टाकण्यात आलेल्या मुरूम वखडीच्या ढिगा:यांमुळे  उंच-सखलपणा निर्माण झाला आहे. या उंच-सखलपणामुळे या पुलावर मार्गक्रमण करणारे ट्रक व कंटेनर त्याचप्रमाणे रिक्षा, चार चाकी वाहने उलटण्याची शक्यता असते. जीवघेणे खड्डे, खडी व मातीचे ढिगारे, उंचसखलपणा, जड-अवजड वाहनांची वर्दळ या परिस्थितीमुळे हा पूल कधी कोसळेल याचा काही नेम सांगता येत नाही. त्यामुळे या पुलावर प्रवास करताना वाहनधारक आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करत असतात.