शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
3
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
4
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
5
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
6
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
7
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
8
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
9
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
10
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
11
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
12
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
13
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
14
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
15
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
16
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
17
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
18
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
19
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
20
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा

आज व उद्या कडकडीत बंद; लाॅकडाऊनची सवलत दोन दिवस नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात कोरोना नियंत्रणासाठी लाॅकडाऊन करण्यात आले असले तरी त्यात अनेक आस्थापनांमध्ये सवलती दिल्याने गेले ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नंदुरबार : जिल्ह्यात कोरोना नियंत्रणासाठी लाॅकडाऊन करण्यात आले असले तरी त्यात अनेक आस्थापनांमध्ये सवलती दिल्याने गेले दोन दिवस लाॅकडाऊनचा फारसा प्रभाव दिसून आला नाही. मात्र दर शनिवार आणि रविवारचा जनता कर्फ्यू कायम असल्याने हे दोन दिवस अतिशय कडकडीत बंद ठेवण्यासाठी व कारवाईसाठी पोलीस दल ‘ॲक्शनमोड’मध्ये आला आहे. लोकांना त्याची पूर्व सूचना व्हावी यासाठी शुक्रवारी स्वत: पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी रस्त्यावर येऊन लोकांना विनंती केली. दरम्यान, यापुढे नियम मोडणाऱ्यांची गय नसल्याचा इशाराही त्यांनी दिला.

नंदुरबार जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस प्रचंड वाढत आहे. उपचार घेणाऱ्या रूग्णांची संख्या साडेसहा हजारावर गेली आहे. नियंत्रणासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी यापूर्वीच १ ते १५ एप्रिलपर्यंत लाॅकडाऊनचा आदेश दिला आहे. या लाॅकडाऊनच्या काळात लोकांच्या मागणीनुसार जिल्हाधिकाऱ्यांनी अनेक सवलती दिल्या आहेत. त्यामुळे शहरी भागात दुपारी एकपर्यंत बाजारपेठेत प्रचंड गर्दी असते. एक नंतरदेखील शहरात फिरणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर दिसून येते. या काळात दुकाने बंद पण लोकांची रहदारी सुरू असे चित्र असते. बहुतांश जण अजूनही मास्क न लावता रस्त्यावर फिरतात अनेक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचाही फज्जा उडालेला दिसतो. पहिल्या दिवशीची लोकांमधील बेफिकिरीचा अनुभव घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्यासह पोलीस कर्मचारी रस्त्यावर उतरले व रस्त्यांचा ताबा घेतला.

या वेळी पोलिसांनी बेपर्वाईने फिरणाऱ्या नागरिकांना समज दिली. जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी तर स्वत: अशा लोकांना हात जोडून विनंती केली. दुपारी पोलिसांच्या या भूमिकेनंतर सायंकाळी मात्र थोडा प्रभाव जाणवला. पण विना कामाने फिरणाऱ्यांची संख्यादेखील रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर दिसून आली आहे. या वेळी उपविभागाीय पोलीस अधिकारी सचिन हिरे व शहर पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकरसह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

शनिवार-रविवार जनता कर्फ्यू कायम

लाॅकडाऊनच्या काळातही दर शनिवार आणि रविवारचा या पूर्वी जाहीर केलेला जनता कर्फ्यू कायम ठेवण्यात आला आहे. लाॅकडाऊनमध्ये दुपारी एक वाजेपर्यंत काही सेवांसाठी सवलती देण्यात आली आहे. मात्र जनता कर्फ्यूत जीवनावश्यक सेवा वगळता इतर सेवा पूर्ण बंद राहणार असल्याने सकाळी सात वाजेपासून कडकडीत बंद ठेवावा लागणार आहे.

जिल्ह्यात कोरोना नियंत्रणासाठी प्रशासनाने निर्बंध लावले आहेत. मात्र नागरिकांमध्ये त्याबाबत बेफिकिरी दिसून येत आहे. त्यामुळे आपण स्वत: रस्त्यावर विना कामाने फिरणाऱ्या लोकांना आज विनंती केली आहे. आज सर्वांना समज दिली. परंतु यापुढे मात्र कठोर कारवाई करण्यात येणार आहे. विशेषत: इतर कारवाईपेक्षा दंडात्मक कारवाईवर भर देण्यात येणार आहे. किमान त्यामुळे तरी नागरिकांना समज येईल व दुसऱ्यांदा नियम मोडणार नाही.

- महेंद्र पंडित, जिल्हा पोलीस अधीक्षक, नंदुरबार