शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
9
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
10
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
11
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
12
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
13
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

वाहतूक व्यवस्थेवर ताण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 13:27 IST

ट्रॅव्हल्सचीही मनमानी : रेल्वे हाऊसफुल्ल तर एसटीच्या दरवाढीने प्रवासी हवालदिल

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : ऐन सणासुदीच्या दिवसांमधील प्रवाशांची गर्दी लक्षात घेता नंदुरबार येथील खाजगी ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून आता आडमुठीपणाची भूमिका घ्यायला सुरुवात झाली आह़े दिवाळीच्या दरम्यान भाडय़ात वाढ करुन प्रवाशांना वेठीस धरण्याचा प्रयत्न करण्यात येत आह़े यामुळे इतर वाहतूक व्यवस्थेवरही ताण आला आह़ेदिवाळीच्या पर्वाला सुरुवात झाली आह़े त्यामुळे मोठय़ा संख्येने प्रवासी या दिवसांमध्ये ये-जा करीत असतात़ त्यामुळे साहजिकच दळणवळण व्यवस्थेवर मोठा बोजा पडताना दिसून येत आह़े त्यामुळे या दिवसांमध्ये खाजगी ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून भाडेवाढ करण्यात आली आह़े नंदुरबारातून पुणे, नाशिक व मुंबई या मार्गावर सर्वाधिक वाहतूक करण्यात येत असत़े त्यामुळे ऐरवी पाचशे ते सहाशे रुपये असलेले भाडे आता वाढवून बाराशे ते पंधराशे करण्यात आले आह़े त्यामुळे ऐन दिवाळीत प्रवाशांना प्रवासासाठी मोठय़ा प्रमाणात खिसे खाली करावे लागत असल्याचे म्हटले जात आह़े दिवाळीनिमित्त वाहतूक व्यवस्थेवर प्रचंड ताण जाणवत आह़े आधीच  रेल्वे हाऊसफूल्ल आहेत तर एसटीनेही नुकतीच हंगामी भाडेवाढ केली आह़े त्यातच खाजगी ट्रॅव्हल्सकडूनही आता जास्तीचे भाडे आकारण्यात येत असल्याने प्रवासी कोंडीत सापडत असल्याचे चित्र दिसून येत आह़े त्यामुळे ग्राहकांना पर्याय नसल्याने नाईलाजाने एसटी तसेच खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करावा लागत आह़े प्रवासासाठी रेल्वे उत्तम माध्यम मानले जात असले तरी यात होणारी गर्दी प्रचंड आह़े त्याच रेल्वे प्रशासनाकडून दिवाळीनिमित्त कुठलीही जादा गाडीची व्यवस्था करण्यात आली नसल्याने परिणामी आहे त्या रेल्वे गाडय़ांवरच अधिक भर पडत असल्याचे दिसून येत आह़े त्यामुळे प्रवास करताना प्रवाशांचे चांगलेच हाल होत असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येत आह़े खाजगी ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून दिवाळीनिमित्त सोडण्यात येणा:या ट्रॅव्हल्सची बुकींग  करुन देण्यात येत आह़े यात, दुप्पट भाडेवाढ करण्यात आली आह़े नंदुरबारातून नाशिकसाठी फार कमी ट्रॅव्हल्स जात असतात़ त्यामुळे याचाही  फायदा घेऊन कंपन्यांकडून प्रवाशांची अडवणूक करण्यात येत असल्याचे प्रवाशांकडून सांगण्यात आल़े