शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

तामिळनाडूत अडकलेल्या मुली परतल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2020 12:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क विसरवाडी : तामिळनाडू राज्यात रोजगारासाठी गेलेल्या नवापूर तालुक्यातील गावांमधील २० मुली लॉकडाऊनमुळे अडकून होत्या. या मुलींनी ...

लोकमत न्यूज नेटवर्कविसरवाडी : तामिळनाडू राज्यात रोजगारासाठी गेलेल्या नवापूर तालुक्यातील गावांमधील २० मुली लॉकडाऊनमुळे अडकून होत्या. या मुलींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या गावी परत येण्याची मदतीची याचना केली होती. सोशल मिडियाच्या माध्यमातून त्या अडचणीवर मात करीत शनिवारी विसरवाडी येथे सुखरूप परत आल्या. त्यांची आरोग्य विभागाकडून तपासणी करण्यात घेऊन त्यांना होम क्वॉरंटाईन करण्यात आले आहे.नवापूर तालुक्यातील विविध गावातील २० मुली तामिळनाडू राज्यातील पेरूंदुराई जिल्ह्यातील एका मिलमध्ये कामास होत्या. मागील दोन महिन्यांपासून लॉकडाऊन सुरू असल्याने कंपनी बंद पडली. या मुलींकडील पैसे संपले, गावाकडे जाण्याचा मार्ग बंद पडला. अशा बिकट अवस्थेमुळे त्यांना मूळ गावी परतायचे होते. मात्र त्यांना लॉकडाऊनच्या कडक नियमांमुळे गावी येणे शक्य नव्हते. अशातच या तरुणींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एक व्हिडीओ क्लिप प्रसारित केली. या क्लिपच्या आधारे भारतीय ट्रायबल पार्टीचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष के.टी. गावीत व राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ.उल्हास वसावे यांनी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांच्याकडे पाठपुरावा करून या मुलींना त्यांच्या मूळ गावी परत आणता यावे म्हणून वेळोवेळी सर्व कागदपत्रांची पूर्तता केली. या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेता जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. नंदुरबार जिल्ह्यात येणाऱ्या लोकांची यादी व फार्म भरून देण्यात आले. ही यादी तामिळनाडू राज्यातील जिल्हाधिकारी डॉ.राधाकृष्णन यांना आॅनलाईन चौकशी करून या जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांकडे ई-मेलद्वारा पाठविण्यात आले. प्रवास करणाºया सर्व मुलींची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यांचा अहवाल निगेटीव्ह आल्याने मुलींना परवानगी देण्यात आली. अखेर सर्व २० मुली व त्यांच्यासोबत ११ मुले बसने तीन दिवसांचा प्रवास करून विसरवाडी येथे सुखरूप पोहोचले. त्यांची वैद्यकीय पथकाकडून आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच त्यांना १४ दिवस होम क्वारंटाईन करण्यात आले. या सर्व मुलींची भोजनाची व्यवस्था के.टी. गावीत यांनी केली. आपल्या जिल्ह्यात परत आलेल्या मुलींच्या व त्यांच्या पालकांच्या चेहºयावरील आनंद ओसंडून वाहत होता.आम्ही आठच महिन्यापूर्वी रोजगारासाठी चेन्नईला गेलो. तेथील भाषा, संस्कृती आहार याचा धड परिचयही झाला नव्हता. अशातच कोरोनाचे संकट आले व लॉकडाऊन झाले. मग पुढचे हाल विचारूच नका... गावाचीसारखी ओढ, पैसे नाहीत, परमुलखात ओळख नाही. अशा अवस्थेत घरच्यांना फोन केला. त्यांनी कोणत्याही जबाबदार पालकांप्रमाणे नंदुरबार जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींशी संपर्क साधला. लोकप्रतिनिधींना आम्हीही फोन लावला. आश्वासन मिळत होते, मदत करू... पण प्रत्यक्षात काहीच नाही. अशावेळी भारतीय ट्रायबल पार्टीचे जिल्हाध्यक्ष के.टी. गावीत व डॉ.उल्हास वसावे यांच्याशी संपर्क झाला. सुरूवातीला आम्हाला काही आशा उरली नव्हती. पण अचानक एकेदिवशी चेन्नई चे पोलीस उपायुक्त आमच्याकडे आले आणि आम्हाला सविस्तर परिस्थिती विचारून आमची राहण्या-खाण्याची व्यवस्था केली. त्यांच्याकडून कळले की, डॉ.उल्हास वसावे यांचा फोन आणि प्रयत्नांमुळे ते आमच्यापर्यंत पोहोचले होते. या घटनेवरून आमचा विश्वास वाढल्याने आम्ही के.टी. गावीत व डॉ.उल्हास वसावे यांच्याशी सतत संपर्कात राहिलो आणि अवघ्या पाचच दिवसात त्यांच्या प्रयत्नांनी आम्ही आज गावी सुखरूप पोहचलो, अशी प्रतिक्रिया चेन्नईहून परतलेल्या युवक-युवतींच्या को-आॅर्डिनेटर करूणावती गावीत यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.