शहरं
Join us  
Trending Stories
1
Corona Virus : धोक्याची घंटा! कोरोना पाठ सोडेना, रुग्णसंख्येत होतेय दिवसागणिक वाढ; तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला
2
“एक महिना झाला, पहलगाम हल्ल्यात सामील दहशतवादी कुठे आहेत?”; काँग्रेसचा केंद्राला थेट सवाल
3
कुली बनला IAS...! स्टेशनच्या फ्री वाय-फायचा वापर करत पास केली सर्वात कठीण UPSC परीक्षा
4
कोरोनाचा भयावह वेग! ब्रिटनमध्ये मृत्यू झालेल्यांची संख्या एका आठवड्यात झाली दुप्पट
5
तीन दिवसांच्या घसरणीला 'ब्रेक'! सेन्सेक्स-निफ्टी उसळले, 'या' शेअर्सनी दिला बंपर फायदा!
6
IPL 2025: वैभव सूर्यवंशी अन् त्याला आलेले ५०० 'मिस्ड कॉल'; राहुल द्रविडसमोर झाली 'पोलखोल'
7
Luck Sign: देवपूजा करताना 'या' गोष्टींचे घडणे, म्हणजे साक्षात ईश्वरीकृपेचे शुभसंकेत!
8
Nala Sopara: नालासोपाऱ्यात अडीच कोटींचे अंमली पदार्थ जप्त, नायजेरियन आरोपीला अटक
9
CPEC चा विस्तार अफगाणिस्तानपर्यंत होणार, पाकिस्तानच्या सहकार्याने चीनचा नवी खेळी
10
धक्कादायक! चक्क ग्रामपंचायत कार्यालयच २० लाख रुपयांना ठेवलं गहाण, सरपंच बरखास्त, एफआयआर दाखल 
11
अमेरिकेला 'धक्का' देणारी मूडीज भारतावर 'फिदा'! अर्थव्यवस्था मजबूत, पाकिस्तानला मात्र 'झटका'
12
ज्योती मल्होत्रा जिथे जिथे जाऊन आली तिथे तिथे पाकिस्तानचे ऑपरेशन सिंदूरवेळी हल्ले? गोल्डन टेंपल, पठाणकोट अन् काश्मीर...
13
“शिष्टमंडळ पाठवून काही फायदा नाही, चीन, श्रीलंका, तुर्कस्थानात कुणाला पाठवले का?”: संजय राऊत
14
'कपिल शर्मा शो'मधील सर्वांच्या लाडक्या व्यक्तीचं झालं निधन, कलाकारांनी व्यक्त केली हळहळ
15
चेक बाउन्स झाला तर आता काही खरं नाही! सरकारचे नवे नियम, दुप्पट दंड ते तुरुंगापर्यंतची शिक्षा!
16
कधीकाळी पाकिस्तानात राहत होते ज्योती मल्होत्राचे कुटुंब?; तपासात समोर आली नवी माहिती
17
IPL 2025: सीएसकेच्या पराभवानंतर माजी क्रिकेटपटू संजय बांगर धोनीवर भडकले, म्हणाले...
18
"बिहार निवडणुकीसाठी भाजपाची खेळी..."; पहलगाम हल्ल्यावर काय म्हणाले यशवंत सिन्हा?
19
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची पहिली झलक समोर, 'या' दिवशी प्रदर्शित होणार चित्रपट
20
मल्टीबॅगर शेअर, 75 देशांमध्ये Tejas चा व्यवसाय; आता मिळाली ₹1526 कोटींची ऑर्डर

प्रकल्पग्रस्तांतर्फे देहली प्रकल्पाचे काम बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 12:50 IST

लोकमत न्यूज नेटवर्क खापर : देहली प्रकल्पाच्या बाधितांचे न्याय्य पुनर्वसन झाले पाहिजे म्हणून लोकसंघर्ष मोर्चा सातत्याने संघर्ष करीत आला ...

लोकमत न्यूज नेटवर्कखापर : देहली प्रकल्पाच्या बाधितांचे न्याय्य पुनर्वसन झाले पाहिजे म्हणून लोकसंघर्ष मोर्चा सातत्याने संघर्ष करीत आला आहे. या प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या मान्य केल्याची आश्वासने सरकारने वेळोवेळी दिलेलीही आहेत मात्र त्यांची अंमलबजावणी न करता आता जवळपास धरणाचे काम पूर्ण होत आले असून या पावसाळ्यात या लोकांची घरे व शेती पाण्याखाली बुडण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आधी पुनर्वसनातील समस्या दूर करा नंतरच धरणाचे काम सुरू करा, असा इशारा देत अखेर हे काम बंद पाडून 28 मे पासून जिल्हाधिकारी कार्यालयावर बेमुदत धरणे व उपोषणाचा निर्णय या प्रकल्पग्रसतांनी घेतला आहे.रविवारी मोठय़ा संख्येने अंबाबारी येथील लोकांनी धरणाच्या बांधकामावर जाऊन शांततापूर्ण मार्गाने धरणाचे बांधकाम बंद केले आहे. जोर्पयत सर्व प्रकल्पग्रस्तांच्या संपूर्ण पुनर्वसनाचा प्रश्न सुटत नाही तोर्पयत धरणाचे काम सुरू होऊ देणार नाही, असा इशारा सर्व ग्रामस्थांनी यावेळी दिला.अक्कलकुवा तालुक्यातील देहली नदीवरमध्यम प्रकल्प बांधला जात असून त्यात आंबाबरी गावातील 692 सरकारमान्य व 20 मोजणी न झालेले असे 712 कुटुंब विस्थापित होत आहेत. या गावातील लोकांनी योग्य पुनर्वसनासाठी 1993 मध्ये मोठा सत्याग्रह केला होता. त्यावेळी सुमारे 45 दिवस गावातील सर्व महिला-पुरुषांना तुरुंगात तर त्यांच्या अल्पवयीन मुलांना सुधारगृहात ठेवण्यात आले होते. आमचा धरणाला विरोध नाही मात्र आमचं मरण करून आम्ही धरण उभं करू देणार नाहीत, ही प्रमुख मागणी होती. अक्कलकुवा तालुक्यातील आदिवासी शेतक:यांची सुमारे तीन हजार 500 एकर जमीन ओलीताखाली येईल याचा आम्हाला आनंद आहे. मात्र आम्हाला भूमिहीन करून व साधनहिन करून धरण बांधायला गावक:यांचा विरोध आहे. आधी पुनर्वसन मग धरण ही भूमिका घ्यावी लागली व 2003 मध्ये मुंबई येथे मंत्रालयावर आंबाबरी ग्रामस्थांनी उपोषण केले होते. त्या वेळी मंत्रिमंडळाची बैठक घेवून आंबाबारी धरणग्रतांना विशेष बाब म्हणून जमीन अगदी भूमिहीन व बुडितात जाणा:या सर्व शेतक:यांना देण्यात येईल. आदिवासी विकास विभागामार्फत विविध आर्थिक उत्पन्न वाढवण्याच्या योजना विशेष बाब म्हणून देण्यात येतील. घरांचा 50 टक्के घसरा परत केले जाईल. शबरी योजनेत घरे दिली जातील यासह विविध विभागांच्या योजनांचे एकत्रीकरण करून लाभ देण्यात येईल या अटीवर धरणाचे काम माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावीत यांच्या हस्ते सुरू केले. लोकांना घरासाठी अनुदान मिळाले मात्र जमिनीचा प्रश्न तसाच राहिला. 22 नोहेंबर 2018 रोजी निघालेल्या उलगुलान मोर्चाच्यावेळी मुख्यमंत्री व जलसंपदा मंत्र्यांच्या उपस्थितीत सर्व मागण्या पुन्हा मान्य करीत आश्वासन दिले. लोकांनी आनंदाने धरणाचे काम सुरू ठेवू दिले. आता धरणाचे काम फक्त नदीपात्रातले बाकी आहे म्हणून लोकांनामध्ये प्रचंड असंतोष होता. त्यांनी शांततापूर्ण मार्गाने सत्याग्रह करीत रविवारी धरणावर जावून धरणाचे काम बंद पाडले व 28 मे पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय घेतला. धरणस्थळी अभियंता भालेराव व अक्कलकुवाचे पोलीस निरीक्षक उपस्थित होते. आंबाबारी ग्रामस्थांनी त्यांना लोकसंघर्ष मोर्चामार्फत मागण्यांचे निवेदन दिले.रविवारी झालेल्या आंदोलनात 800 पेक्षा जास्त ग्रामस्थ उपस्थित होते. रामदास तडवी, मणिलाल तडवी, सुकलाल           तडवी, गुलाब वसावे, हरचंद तडवी, नारायण विजयसिंह तडवी, कांतीलाल  तडवी, आंबालाल खालपा तडवी, उदयसिंग मोंज्या तडवी, नारायण तडवी, अजरुन तडवी यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले.