शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

जिभेचे लाड थांबवा; मसालेदार पदार्थांमुळे अल्सरचा धोका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:35 IST

नंदुरबार : जनमानसांत तिखट आणि मसालेदार पदार्थ खाण्याकडे कल आहे. त्यात फास्टफूडला सर्वाधिक पसंती दिली आहे; परंतु ...

नंदुरबार : जनमानसांत तिखट आणि मसालेदार पदार्थ खाण्याकडे कल आहे. त्यात फास्टफूडला सर्वाधिक पसंती दिली आहे; परंतु ही पसंती अल्सरसारख्या गंभीर आजाराला आमंत्रण देणारी ठरत आहे. यामुळे वेळीच नियंत्रण मिळविले नाही मोठ्या संकटाला सामाेरे जावे लागते.

बदलत्या काळानुसार खाद्यपदार्थ, भाजीपाला यांच्यात बदल झाला आहे. आवडी-निवडीही बदलल्या आहेत. कमी वेळेत मिळेल ते खाऊन अनेक जण भूक भागवत आहेत. योग्य किंवा पाैष्टिक आहार या संकल्पनेचा जणू काही अस्त झाला आहे. त्यात नियमित व्यायाम आणि योगासने करण्याकडेही दुर्लक्ष होत आहे. परिणामी पोटाच्या विविध तक्रारी नागरिकांमध्ये बळावत आहेत. त्यातून अल्सरची तक्रार प्रामुख्याने समोर येत आहे.

तिखट आणि मसालेदार पदार्थ खाण्यामध्ये अधिक असल्याचे समोर आले आहे. अति प्रमाणात तिखट आणि मसालेदार खाणे आरोग्यासाठी घातक ठरत असतानाही अनेक जण त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. अल्सरमुळे आतड्याला, जठरला जखम होते. योग्य उपचार आणि पथ्य केल्यास अल्सर बरा होऊ शकतो; परंतु धूम्रपान, तंबाखू, गुटखा, दारूचे सेवन करणे, वेळी-अवेळी मसालेदार तसेच जंक फूडचे सेवन धोकादायक ठरते.

तिखट, मसालेदार पदार्थ खाणे टाळावे. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे व्यसन करू नये. सातत्याने पोटाचा विकार उद्भवल्यास तज्ज्ञ डाॅक्टरांच्या सल्ल्याने वेळीच उपचार घ्यावेत.

भूक लागली नसताना विनाकारण खाणे टाळावे. अल्सर होऊ नये याकिरता पाैष्टीक आणि सकस आहार घेणे आवश्यक आहे. शरीरातील उष्णता नियंत्रणात आणणाऱ्या पदार्थांचे, फळांचे सेवन करावे.

एन्डोस्कोपी केल्यावर अल्सरचे निदान हेाते. यानंतर पातळ औषधे, गोळ्या असे पूर्णत: उपचार घेणे आवश्यक आहे. खासगी तसेच सरकारी दवाखान्यांमध्येही उपचार उपलब्ध आहेत.

नागरीकांनी बाहेरचे खाणे टाळले पाहिजे. नियमित आणि संतुलित आहार घेणे गरजेचे आहे. योग्य त्यावेळी योग्य तेवढा आराम केला पाहिजे. पोटातील दुखणे किंवा इतर तक्रारी असल्यास योग्य त्या तज्ञांचा सल्ला घेत उपचार घेतले पाहिजेत. आजार बळावण्याची शक्यता दिसू लागताच उपचारांना सामोरे गेले पाहिजे. - डॉ .राजेश वळवी, नंदुरबार.

पोट दुखणे

मळमळ होणे

भूक मंदावणे

काळ्या रंगाचा शाैच होणे

ॲसिडिटी वाढणे

पोटात आग होण्यासह इतर लक्षणे आहेत. या सर्वातून अनेकवेळा मानसिक आरोग्य हिरावते.