शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

जिभेचे लाड थांबवा; मसालेदार पदार्थांमुळे अल्सरचा धोका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:35 IST

नंदुरबार : जनमानसांत तिखट आणि मसालेदार पदार्थ खाण्याकडे कल आहे. त्यात फास्टफूडला सर्वाधिक पसंती दिली आहे; परंतु ...

नंदुरबार : जनमानसांत तिखट आणि मसालेदार पदार्थ खाण्याकडे कल आहे. त्यात फास्टफूडला सर्वाधिक पसंती दिली आहे; परंतु ही पसंती अल्सरसारख्या गंभीर आजाराला आमंत्रण देणारी ठरत आहे. यामुळे वेळीच नियंत्रण मिळविले नाही मोठ्या संकटाला सामाेरे जावे लागते.

बदलत्या काळानुसार खाद्यपदार्थ, भाजीपाला यांच्यात बदल झाला आहे. आवडी-निवडीही बदलल्या आहेत. कमी वेळेत मिळेल ते खाऊन अनेक जण भूक भागवत आहेत. योग्य किंवा पाैष्टिक आहार या संकल्पनेचा जणू काही अस्त झाला आहे. त्यात नियमित व्यायाम आणि योगासने करण्याकडेही दुर्लक्ष होत आहे. परिणामी पोटाच्या विविध तक्रारी नागरिकांमध्ये बळावत आहेत. त्यातून अल्सरची तक्रार प्रामुख्याने समोर येत आहे.

तिखट आणि मसालेदार पदार्थ खाण्यामध्ये अधिक असल्याचे समोर आले आहे. अति प्रमाणात तिखट आणि मसालेदार खाणे आरोग्यासाठी घातक ठरत असतानाही अनेक जण त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. अल्सरमुळे आतड्याला, जठरला जखम होते. योग्य उपचार आणि पथ्य केल्यास अल्सर बरा होऊ शकतो; परंतु धूम्रपान, तंबाखू, गुटखा, दारूचे सेवन करणे, वेळी-अवेळी मसालेदार तसेच जंक फूडचे सेवन धोकादायक ठरते.

तिखट, मसालेदार पदार्थ खाणे टाळावे. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे व्यसन करू नये. सातत्याने पोटाचा विकार उद्भवल्यास तज्ज्ञ डाॅक्टरांच्या सल्ल्याने वेळीच उपचार घ्यावेत.

भूक लागली नसताना विनाकारण खाणे टाळावे. अल्सर होऊ नये याकिरता पाैष्टीक आणि सकस आहार घेणे आवश्यक आहे. शरीरातील उष्णता नियंत्रणात आणणाऱ्या पदार्थांचे, फळांचे सेवन करावे.

एन्डोस्कोपी केल्यावर अल्सरचे निदान हेाते. यानंतर पातळ औषधे, गोळ्या असे पूर्णत: उपचार घेणे आवश्यक आहे. खासगी तसेच सरकारी दवाखान्यांमध्येही उपचार उपलब्ध आहेत.

नागरीकांनी बाहेरचे खाणे टाळले पाहिजे. नियमित आणि संतुलित आहार घेणे गरजेचे आहे. योग्य त्यावेळी योग्य तेवढा आराम केला पाहिजे. पोटातील दुखणे किंवा इतर तक्रारी असल्यास योग्य त्या तज्ञांचा सल्ला घेत उपचार घेतले पाहिजेत. आजार बळावण्याची शक्यता दिसू लागताच उपचारांना सामोरे गेले पाहिजे. - डॉ .राजेश वळवी, नंदुरबार.

पोट दुखणे

मळमळ होणे

भूक मंदावणे

काळ्या रंगाचा शाैच होणे

ॲसिडिटी वाढणे

पोटात आग होण्यासह इतर लक्षणे आहेत. या सर्वातून अनेकवेळा मानसिक आरोग्य हिरावते.