शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
2
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
3
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
4
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
5
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
6
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
7
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
8
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
9
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
10
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
11
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
12
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
13
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...
14
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
15
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
16
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश
17
'पाकिस्तानची अवस्था घाबरलेल्या कुत्र्यासारखी', अमेरिकेतील माजी अधिकाऱ्याने पार इज्ज काढली
18
अवघ्या २३ वर्षांच्या मुलीने लावली पाकिस्तान-बांगलादेशच्या नात्यात आग! राजदूतांना काढावा लागला पळ
19
संकष्ट चतुर्थी २०२५: एकदंत संकष्ट चतुर्थी असणार खास, 'या' राशींची पूर्ण होणार धन-संपत्तीची आस!

नंदुरबारात राज्यस्तरीय वारकरी संमेलन सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 11:12 IST

उद्घाटन : भक्तीतच शक्ती सामावलेली-खासदार हीना गावीत

नंदुरबार : नंदुरबार- भजन कीर्तनातून संस्कार घडत असतात. भक्तीतच सर्वात मोठी शक्ती सामावलेली असून, वारकरी संप्रदायातून समानता व समाज एकात्मतेचे दर्शन घडत असते असे प्रतिपादन खा.डॉ. हिना गावित यांनी केले. राज्यस्तरीय वारकरी संमेलनाला शुक्रवारपासून सुरुवात झाली.शुक्रवार, 21 डिसेंबर पासून नंदुरबारात अखिल भारतीय वारकरी मंडळाचे जिल्हा कमिटीच्या वतीने माळीवाडा परिसरात राज्यस्तरीय वारकरी संमेलन तथा भव्य कीर्तन महोत्सव व ज्ञानेश्वरी पारायणाला सुरुवात करण्यात आली आहे. संमेलनाचे उद्घाटन खासदार गावीत यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आले त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. प्रास्ताविक वारकरी मंडळाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज माळी यांनी केले. जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक संजय पाटील, अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश महाराज बोधले, भाजप ओबीसी मोचार्चे प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी, उद्योगपती मनोज रघुवंशी, यशोदाबाई जायखेडकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख डॉ. विक्रांत मोरे, नगरसेवक आनंदा माळी, भिला खोरी महाराज, अनिल महाराज वाळवे, किशोर महाराज प्रकाशेकर, विजय महाराज जाधव, छोटू महाराज, डॉ.तुषार सनसे, कृषिभूषण पाटीलभाऊ माळी, चारुदत्त कळवणकर, गजेंद्र शिंपी, प्रविण गुरव, विजय माळी आदी उपस्थित होतेखासदार डॉ. गावित म्हणाल्या, चांगले जीवन जगण्याची दिशा संतांच्या विचारांतून होत असते. समाजात आज ज्या काही चांगल्या गोष्टी घडत आहेत त्या संतांच्या विचार प्रेरणेमुळेच घडत आहेत. वारकरी संमेलन जिल्ह्यासाठी पर्वणी ठरणार आहे. जिल्हाधिकारी डॉ.कलशेट्टी म्हणाले, संमेलनातून राष्ट्र घडत असते. या संमेलनात व्यसनमुक्तीचा प्रचार व प्रसार करण्याचे आवाहन त्यांनी संयोजकांना केले. वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश महाराज बोधले म्हणाले, अधिकारी, वारकरी व पुढारी ज्यावेळेस एकत्र येतील त्यावेळी राष्ट्राचा ख:या अर्थाने विकास व्हायला वेळ लागणार नाही. वारकरी आता भावनाहीन राहिलेला नसून तो सर्वत्र सामावलेला असल्याचे त्यांनी सांगितले. संमेलनात मोठ्या संख्येने वारकरी उपस्थित     होते.