शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
2
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
3
कुठल्याही प्रोजेक्टमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
4
दिवाळीपूर्वी मोठी भेट! कपडे, खाद्यपदार्थांवरील GST ५% होणार? 'या' वस्तू आणि सेवांवरील टॅक्सही घटणार
5
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
6
Pune: लक्ष्मी रोडवरील थरार... गर्दीत बस येताच चालकाला ह्रदयविकाराचा झटका; पोलीस धावले अन्...
7
Atharva Sudame: पुण्याचा रीलस्टार ते थेट राज ठाकरेंशी मैत्री; कोण आहे अथर्व सुदामे?
8
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
9
वाह! आयुष्य असावं तर 'या' क्रिकेटरसारखं...; ६ महिने आराम अन् पगार मिळतो २७ कोटी
10
तंत्रज्ञानाची किमया! इंटरनेटशिवाय WhatsApp कॉल; गुगलचा आश्चर्याचा धक्का, काय आहे प्लॅन?
11
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
12
अर्जुन-सानिया यांच्या साखरपुड्यासंदर्भातील फिरकी घेणारा प्रश्न अन् सचिन तेंडुलकरचा 'स्ट्रेट ड्राइव्ह'
13
उकडीचे की तळणीचे मोदक? वाद मोठा जहाल, पण दोन्ही मोदक आरोग्याच्या हिताचे; वाचा फायदे
14
मेड इन इंडिया! मारुतीची पहिली इलेक्ट्रिक कार अखेर लॉन्च, परदेशातही निर्यात होणार
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
16
गणेश चतुर्थी २०२५: गुरुजींना उशीर झाला? रेकॉर्डेट कंटेट नको? स्वतःच करा गणपती प्राणप्रतिष्ठा पूजाविधी
17
चीनमध्ये शक्तीप्रदर्शन; मोदी, पुतिन आणि जिनपिंग एकाच व्यासपीठावर, अमेरिकेला लागणार मिरची
18
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
19
पैसै घेऊन मूर्तीकार पळाला, कारखाना जैसे थे ठेवला; ऐनवेळी मूर्ती कुठून आणायची, गणेशभक्तांना चिंता
20
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल

पोषण पुनर्वसन व बाल उपचार केंद्र तातडीने सुरू करा- जि.प. सीईओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:23 IST

नंदुरबार : पावसाळ्यात कुपोषण व बालमृत्यूचे प्रमाण वाढू नये यासाठी जिल्ह्यातील सर्व पोषण पुनर्वसन केंद्र व बाल उपचार केंद्र ...

नंदुरबार : पावसाळ्यात कुपोषण व बालमृत्यूचे प्रमाण वाढू नये यासाठी जिल्ह्यातील सर्व पोषण पुनर्वसन केंद्र व बाल उपचार केंद्र अद्ययावत ठेवून त्यात बालकांना दाखल करून घेण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी काढले आहेत. ‘लोकमत’ने याबाबत वृत्त देताच प्रशासन स्तरावर हालचाली गतिमान झाल्या आहेत.

जिल्ह्यातील पोषण पुनर्वसन केंद्र बंद असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेऊन जिल्हा प्रशासनाने तातडीने ते सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत जिल्हा परिषदेेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक यांना पत्र दिले आहे. त्यात म्हटले आहे की, जिल्ह्यात मार्च २०२१च्या मासिक अहवालानुसार ९०८ सॅम तर आठ हजार ५२१ मॅम बालके आहेत. या बालकांवर ग्राम बालविकास केंद्र तसेच बाल उपचार केंद्र/पोषण पुनर्वसन केंद्रामध्ये तातडीने उपचार करण्यासाठी सूचीत करण्यात आले आहे.

सद्य:स्थितीत जिल्ह्यातील बहुसंख्य आदिवासी कुटुंब स्थलांतराहून परत आलेली आहेत. या कुटुंबांमधील सहा वर्षांखालील बालकांमध्ये कुपोषित बालके तसेच आरोग्य समस्या असणाऱ्या बालकांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे दरवर्षी जिल्ह्यात मान्सूनपूर्व विशेष आरोग्य तपासणी मोहिमेअंती प्राप्त अहवालामध्येसुद्धा कुपोषित आणि आजारी बालकांच्या संख्येत वाढ झाल्याचे निष्पन्न झालेले आहे. ही सर्व परिस्थिती लक्षात घेता जिल्ह्यात सॅम, मॅम आणि आरोग्य समस्या असणाऱ्या बालकांवर वेळेवर उपचार करणे आवश्यक आहे. अन्यथा मान्सून कालावधीत जिल्ह्यात बालमृत्यूचे प्रमाण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्यामुळे सर्व पोषण पुनर्वसन केंद्र व बाल उपचार केंद्रामधील सेवा पूर्णवेळ संपूर्ण मनुष्यबळ, आहार व औषध साठ्यासह अद्ययावत ठेवावे, असेही या पत्रात मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी स्पष्ट केले आहे.