शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

शहादा व नंदुरबारात कापूस खरेदीला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2020 13:03 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार/शहादा :  भारतीय कपास निगम लिमिटेड अर्थात सीसीआयद्वारा येथे कापूस खरेदीला नंदुरबार व शहादा बाजार समितीअंतर्गत ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार/शहादा :  भारतीय कपास निगम लिमिटेड अर्थात सीसीआयद्वारा येथे कापूस खरेदीला नंदुरबार व शहादा बाजार समितीअंतर्गत खरेदी केंद्रावर गुरुवारपासून प्रारंभ झाला आहे. शहादा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत तर नंदुरबार केंद्राचा पळाशी येथील केंद्रावर शुभारंभ झाला. पळाशी येथील केंद्रावर पहिल्या दिवशी एक हजार क्विंटल कापसाची आवक झाली होती.कृषी उत्पन्न बाजार समिती नंदुरबार अंतर्गत स्व.राजीव गांधी कापूस खरेदी केंद्र पळाशी येथे भारतीय कपास निगम (सी.सी.आय.) मार्फत किमान आधारभूत किंमत (हमी भावाने) कापूस खरेदीचा शुभारंभ गुरूवारी जि.प.चे उपाध्यक्ष  ॲड.राम रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात       आला.  या वेळी बाजार समितीचे सभापती दिनेश पाटील, उपसभापती रागिनी पाटील,       शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष बी.के. पाटील, मजूर फेडरेशनचे चेअरमन अंकुश पाटील, बाजार समितीचे संचालक हिरालाल      पाटील, रवींद्र परदेशी, आनंदराव कदमबांडे, संभाजी वसावे, सयाजीराव मोरे, भरत पाटील, देवमन पवार, हरिश्चंद्र पाटील, किशोर पाटील, रोहिदास राठोड, भैय्याभाऊ गिरासे, नवीन बिर्ला, परवेज खान, बापू    पाटील, भारतीय कपास निगम (सीसीआय)चे केंद्रप्रभारी तिवारी, बाजार समितीचे सचिव, कर्मचारी व खरेदीदार उपस्थित होते. पळाशी येथील कापूस खरेदी केंद्रात ४५ वाहनांमधून कापूस विक्रीस आला व साधारणतः एक हजार क्विंटल कापूस आवक झाली होती. तसेच नोंदणीकृत शेतकऱ्यांनी आपला कापूस स्वच्छ व कोरडा करून विक्रीस आणावा. तसेच भारतीय कपास निगम (सीसीआय)मार्फत खरेदी केलेल्या कापसाचे चुकारे संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार      असल्याने हमाली व अनुषांगिक खर्चाची रक्कम संबंधितांकडे रोख स्वरुपात अदा करावी, असे आवाहन बाजार समितीचे सभापती व सचिव यांनी केले.शहादाशहादा येथे सीसीआयमार्फत गुरुवारपासून कापूस खरेदीचा शुभारंभ कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी सहायक निबंधक नीरज चौधरी, बाजार समितीचे सचिव संजय चौधरी, सीसीआयचे ग्रेडर किटुकले, श्रीजी कोटेक्सचे अजय गोयल, राधिका कॉटनचे कैलास पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती. सीसीआय कापूस खरेदी केंद्रावर कापूस विक्रीसाठी आणताना एका वाहनासोबत एक शेतकरी व चालक असणे बंधनकारक असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियम पाळत शेतकऱ्यांनी सहकार्य करावे. खरेदी केंद्रावर १२ टक्के आद्रतेखालील कापूस विक्रीसाठी आणावा. खरेदी केंद्रावर आठ टक्के आद्रतेच्या कापसास पाच हजार ७२५ रूपये, नऊ टक्के आद्रतेचे कापसास पाच हजार ६६७, १० टक्के आर्द्रता असलेल्या कापसास पाच हजार ६१० रूपये, ११ टक्के आद्रतेच्या कापूसला पाच हजार ५५३ तर १२ टक्के आद्रतेचे कापसाला पाच हजार ४९६ भाव सीसीआयमार्फत देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी कापूस खरेदी केंद्रावर १२ टक्के आद्रतेच्यावरील कापूस विक्रीसाठी आणू नये, अशी माहिती बाजार समितीचे सभापती सुनील पाटील यांनी दिली.