शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: मनोज जरांगेंना तिसऱ्या दिवशीही आझाद मैदानात आंदोलनास परवानगी
2
मोठी बातमी! मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनात सहभागी तरुणाचा मृत्यू
3
मनोज जरांगेंची भाषा मुजोरपणाची, गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल; पवार-ठाकरेंवरही संतापले
4
७ वर्षांनी पंतप्रधान मोदी चीनला पोहचले, रेड कार्पेटवर भव्य स्वागत; पुतिन-जिनपिंग यांना भेटणार
5
KCL 2025 मध्ये सलमानची हवा! १२ चेंडूत ११ उत्तुंग षटकारांसह २६ चेंडूत कुटल्या ८६ धावा (VIDEO)
6
अमित शाहांच्या विमानात तांत्रिक बिघाड; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मदतीला सरसावले
7
इंडोनेशियात आमदारांच्या पगारावरून गोंधळ, जमावाने विधानसभा जाळली; तिघांचा मृत्यू
8
सपा-काँग्रेसनं रचला संभलची डेमोग्राफी बदलण्याचा कट, हिंदूंना ठरवून लक्ष्य केलं गेलं! मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मोठा दावा
9
'बिहारसाठी मीच योग्य', तेजस्वी यादवांनी राहुल गांधींसमोर मुख्यमंत्रिपदावर ठोकला दावा
10
विरार इमारत दुर्घटना प्रकरण; विकासक, जागामालकांसह ५ जणांना अटक
11
'भारतामुळे पाकिस्तानात पूर', डोनाल्ड ट्रम्प असे बोललेच नाही, व्हायरल व्हिडीओचं सत्य काय?
12
Nagpur Crime: एंजेलसारखीच मोनिकाची झाली होती हत्या; नागपुरात ११ मार्च २०११ रोजी काय घडलं होतं?
13
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मनोज जरांगेंसोबत उद्धव ठाकरेंनी फोनवरून साधला संवाद
14
सरकारसोबतची पहिली बैठक अयशस्वी; तुम्ही आमच्या जीवाशी खेळताय, मनोज जरांगे पाटील संतापले
15
'ट्रम्प यांच्या टॅरिफ'ला धक्का बसणार ! जपानमधील मेगा डीलनंतर पंतप्रधान मोदी चीनला पोहोचले
16
रात्री गाढ झोपले, सकाळी मृतदेह बाहेर काढले; भूस्खलनात आई-वडिलांसह ५ मुलांचा मृत्यू
17
Nagpur Girl Stabbed: एका दिवसाची आईची साथ सुटली अन् एंजेल नेहमीसाठीच दुरावली!
18
फोनवरील 'तो' संवाद अन् ट्रम्प यांचा प्लॅन फसला; भारत-अमेरिका संबंध कसे बिघडले? सर्वात मोठा खुलासा
19
Gauri Pujan 2025: गौरी पूजेच्या वेळी माहेरवाशिणीचाही असतो मान; तिला का बोलवतात? वाचा
20
बदलीमुळे अभियंता संतापला, रागाच्या भरात पाणीपुरवठा खंडित केला; सत्य आले समोर

मालवाहतुकीमुळे एसटीला मिळाला रस्ता, चालक मात्र खाताहेत खस्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:23 IST

नंदुरबार : कोराेना महामारीमुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. यातून या व्यवस्थेवर अवलंबून असलेले कर्मचारी विनावेतन काम करत ...

नंदुरबार : कोराेना महामारीमुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. यातून या व्यवस्थेवर अवलंबून असलेले कर्मचारी विनावेतन काम करत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान प्रवासी वाहतूक बंद असली तरी मालवाहतूक होऊ शकते या उद्देशाने सुरू केलेली एसटी माल वाहतूक सेवा नंदुरबार आगाराला बळ देणारी ठरली असून गेल्या वर्षात २४ लाख रुपयांचे भाडे वसूल केले आहे.

एसटीला मालवाहतुकीच्या रुपाने हा नवा रस्ता मिळाला असला तरी ही मालवाहतूक करणारे चालक मात्र खस्ताच खात असल्याचे दिसून आले आहे. एसटीची मालवाहतूक सेवा अधिक प्रबळ व्हावी यासाठी नुकतेच शासनाने त्या-त्या प्रशासनातील २५ टक्के माल वाहतुकीची कामे एसटीला देण्याचे सक्तीचे केले आहे. यातून एसटीला बुस्टर मिळणार आहे. दरम्यान मालवाहतुकीतून नंदुरबार आगाराला खूप मोठा लाभ झाला नसला तरी आगाराची गाडी वेगात सुरू आहे. दर दिवशी वर्दी मिळत असल्याने येथील पाचही ट्रक माल घेऊन रवाना होत आहेत. गेल्या वर्षात कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यानंतर केवळ सहा महिन्यात २५ लाख रुपयांचे भाडे वसूल करण्यात आले होते. यंदाच्या वर्षातही मालवाहतुकीला आगार वेग देत असून अधिकारी नियमितपणे व्यापाऱ्यांच्या भेटी घेत आहेत.

ॲडव्हान्स मिळतो, पण सुलभ हप्त्याने कट होतो

कोरोनामुळे वेतन वेळेवर होत नसल्याने घरापासून लांब जाणारे चालक आर्थिक अडचणीत येऊ नयेत, यासाठी एसटी महामंडळाकडून त्यांना ॲडव्हान्स देण्याची तरतूद करण्यात आली आहे. साधारण दोन हजारांपर्यंतची रक्कम चालकांनी लगेच दिली जाते. परंतु ही रक्कम त्यांच्या वेतनातून सुलभ हप्त्याने कपात केली जाते.

लांबवर जाणाऱ्या चालकांना आरोग्याच्या तक्रारी जाणवल्यास त्यांना रिलिव्हर म्हणून आणखी एक चालक सोबत पाठवला जात आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लाॅकडाऊनमुळे एसटीच्या मालवाहतूक सेवेला व्यापारी पसंती देत आहेत. नंदुरबार आगारातून सुटणाऱ्या एका गाडीला किमान २० हजारांपेक्षा भाडे मिळते. यातून चालकांचे वेतन वेळेवर करण्यासाठी पैसे आगाराकडे सातत्याने जमा होत असल्याचे सांगण्यात आले.

तीन दिवसात परतीच्या प्रवासाची सोय

नंदुरबार आगारातून राज्यात माल घेऊन गेल्यानंतर परतीचा प्रवास करणे गैरसोयीचे झाल्याने चालकांचे गेल्यावर्षी हाल झाले होते. यातून आता वर्दी न मिळाल्यास तीन दिवसात चालकाने ट्रक सोडून परत यावे अशा सूचना आहेत. दुसऱ्या आगाराचा ट्रक मिळाल्यानंतर चालकांचा परतीचा प्रवास सुरू होतो. आगाराकडूनही वेळोवेळी चालकांसोबत संपर्क केला जातो.

नंदुरबार आगारातील मालवाहतूक वाढली असल्याने आगारातून आणखी १५ ट्रक तयार करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. येत्या काळात एसटीची प्रवासी सेवा सुरू झाल्यानंतरही या वाहतुकीला सुरूच ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

गेल्या वर्षात २४ लाख रुपयांची कमाई

नंदुरबार आगारातून २०२० या वर्षात ५५ हजार किलोमीटरचा प्रवास करून मालवाहतूक ट्रकांनी केला होता. यातून २४ लाख ३८ हजार रुपयांची रक्कम वसूल झाली होती.

२०२१ या वर्षातही एसटीची मालवाहतूक सेवा सुरूच ठेवण्यात आली. यातून मार्च आणि एप्रिल या दोन महिन्यात ४ लाख १० हजार रुपयांची वसुली झाली असून ट्रक सुमारे ८ हजार ३०० किलोमीटर फिरल्याची माहिती आहे. मे महिन्याही वाहतूक सुरू आहे.

आगारातून निरोप आल्यावर नियमितपणे माल वाहतुकीला जात आहे. गेल्या वर्षात आलेल्या अडचणींमुळे यंदा काम करण्याची भीती होती. अद्यापतरी अडचणी आलेल्या नाहीत.

-चालक, नंदुरबार आगार

प्रवासी वाहतूक बंद असल्याने ट्रक चालवून भागत आहे. गेल्या वर्षी बाहेरगावी अडकून पडल्याने कुटुंबांचे हाल झाले होते. यंदा मात्र स्थिती व्यवस्थित असल्याने काम सुरू आहे.

-चालक, नंदुरबार,

नंदुरबार आगारातून नियमित मालवाहतूक सुरू आहे. यातून आर्थिक उत्पन्नही मिळत आहे. येत्या काळात आगारातून आणखी ट्रक तयार करण्याचे उद्दिष्ट आहे. यंदाही वाहतूक सुरळीतपणे सुरू आहे. चालकांना वेळेवर वेतन देत आहोत.

-मनोजकुमार पवार,

आगारप्रमुख, नंदुरबार