शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यांअभावी एसटी चालकांचे अतोनात हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 11:27 IST

रस्त्यांची स्थिती सुधारावी : विभागीय कार्यालयाकडे मांडल्या व्यथा

नंदुरबार : अक्कलकुवा, नवापूर, शहादा आदी आगारातील एसटी बसचालकांचे सध्या मोठय़ा प्रमाणात हाल होत आहेत़ दुर्गम भागात पावसामुळे रस्त्यांची दैनावस्था झालेली आह़े त्यामुळे एसटी चालकांना ओबडधोबड रस्त्यांवरुन बस चालवतांना तारेवरची कसरत करावी लागत आह़े याबाबत अक्कलकुवा आगाराकडून विभागीय कार्यालयाकडे आपल्या व्यथा मांडण्यात आलेल्या आहेत़ अक्कलकुवा तालुक्यातील अमोनी, तुळाजा, दलेलपूर मार्ग तसेच रेवानगर आदी मार्ग, नवापूर तालुक्यातील रंगावली नदी डॅम जवळील परिसर, नागङिारी रस्ता, कोळदा नाला परिसर, तोरणमाळकडे जाणारा मार्ग, तसेच शहादा आगाराअंतर्गत येणारा, शेल्टी, शिंदे, झुरखेडा आदी मार्गावरील रस्त्याची दैनावस्था झालेली आह़े नवापूर तालुक्यात नुकतेच महापुराने थैमान घातले होत़े यात, तालुक्यातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली होती़ महापुरामुळे तीन दिवस एसटी बसेसदेखील बंद ठेवण्यात आलेल्या होत्या़ सोमवारपासून एसटी बसफे:या नियमित सोडण्यात आलेल्या आहेत़ असे असले तरी अनेक रस्ते ओबडधोबड झाले असल्याने या मार्गावरुन बस ने-आण करीत असताना चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आह़े अशीच परिस्थिती अक्कलकुवा, तळोदा तालुक्याचीसुध्दा आह़े अक्कलकुवा आगारातर्फे अनेक दुर्गम भागातील बसफे:या बंद करण्यात आलेल्या आहेत़ अमोनी, तुळाजा बसेस बंद ठेवण्यात आल्या आहेत़ त्या ऐवजी दलेलपूर मार्गे बसेस वळविण्यात आलेल्या आहेत़ रेवानगर मार्गे बसफेरी सुरु करण्याची मागणीकाही दिवसांपूर्वी रेवानगर मार्गे बसफेरी सुरु करण्यात यावी अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून अक्कलकुवा प्रशासनाला करण्यात आलेली होती़ त्यानुसार अक्कलकुवा आगाराकडून संबंधित मार्गाचे सव्रेक्षण करण्यात आले होत़े परंतु हा मार्ग वाहतुकीस योग्य नसल्याचे यातून दिसून आले होत़े त्यामुळे या मार्गावर बसफेरी होणे शक्य नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आल़े फाटय़ापासून माघारी फिरतात बसेस्अक्कलकुवा तालुक्यातील अनेक ठिकाणी गावरस्ते ओबडधोबड झालेले असल्याने अनेक बसेस थेट गावात न जाता गावाच्या फाटय़ापासूनच माघारी फिरत असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आह़े त्यामुळे ग्रामस्थांना फाटय़ापासून पुढे एक ते दीड किलो मीटर पायी जावे लागत असल्याचे सांगण्यात आल़े घाटांवरील रस्तेही धोकेदायकअक्कलकुवा, तळोदा तालुक्यातील दुर्गम भागात अनेक घाटरस्ते आहेत़ या ठिकाणाहून वाहतूक करणे धोकेदायक आहेत़ त्यामुळे अक्कलकुवा आगाराकडून अशा घाट रस्त्याचेही सव्रेक्षण करण्यात आले होत़े सध्या सर्वत्र पावसाचा जोर वाढला असल्याने साहजिकच अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटनाही घडत आह़े रस्त्यांवर दरडी कोसळत असल्याने मार्गावर सर्वत्र चिखल जमा होत असून रस्तेही ओबडधोबड होतात़ रात्रीच्या वेळी अशा मार्गावरुन वाहतूक करणे अत्यंत धोकेदायक ठरत असत़े त्यामुळे अशा परिस्थितीत घाटमार्ग अधिकच धोकेदायक ठरत असतात़ त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग व आगार प्रशासन यांनी समन्वयातून यावर तोडगा काढावा अशी अपेक्षा सर्वसामान्यांकडून व्यक्त करण्यात येत आह़े