शहरं
Join us  
Trending Stories
1
Virat Kohli Test Retirement: 'किंग कोहली'ची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; १४ वर्षांचा 'विराट' प्रवास थांबवला!
2
पाकिस्तानवरील कारवाईदरम्यान बंद केलेली ३२ विमानतळं, आता सरकारनं घेतला महत्त्वाचा निर्णय; जाणून घ्या
3
ना कोणी आले, ना गेले! केरळच्या श्री पद्मनाभस्वामी मंदिरात 'चमत्कार'; गायब झालेला सोन्याचा रॉड सापडला
4
किंमत २३९ कोटी रुपये, जगात फक्त ३ लोकांकडे आहे ही कार; कोणती आहे ही गाडी? पाहा डिटेल्स
5
पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालींवर भारताच्या 'या' 10 डोळ्यांची करडी नजर, ISRO प्रमुखांची माहिती
6
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मी बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
7
मैत्रिणीच्या मेहंदीला गेला अन्..; प्रसिद्ध अभिनेत्याचं ३४ व्या वर्षी निधन, मनोरंजनविश्वावर शोककळा
8
९०च्या स्पीडने येत होती वंदे भारत, अचानक जोडप्याने घेतली ट्रॅकवर उडी अन्...    
9
India Pakistan War :'तुम्ही पाकिस्तानला संपवा, आम्ही त्यांच्यावर मागून हल्ला करतो'; बलुचिस्तानमधून भारताला संदेश
10
बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना
11
अमेरिका आणि चीनमधील टॅरिफ वॉर शमणार? व्हाईट हाऊसने दिली महत्त्वाची माहिती, कुणी घेतली माघार?
12
IPL खेळायला भारतात परतले तर ठीक, नाहीतर...; 'त्या' खेळाडूंविरोधात BCCI घेणार कठोर निर्णय
13
दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत सामील झाले पाकिस्तानचे लष्करी अधिकारी, भारताने नावेच जाहीर केली!
14
..तर वयाच्या पन्नाशीआधीच २ कोटी रुपये जमा होतील; कोट्यधीश करणारा १२-१२-२५ चा फॉर्म्युला
15
सारा तेंडुलकरचा नवा व्हिडिओ व्हायरल; चाहत्यांचं लाजीरवाणं कृत्य, उडवली फिटनेसची खिल्ली
16
Ritual: महत्त्वाच्या कामाला निघताना एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? शास्त्र सांगते...
17
कतारची रॉयल फॅमिली देणार डोनाल्ड ट्रम्प यांना सर्वात महागडं गिफ्ट; ४० कोटी डॉलरचं विमान
18
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
19
"ते कधीच मूर्ख महिलेसाठी घर...", गोविंदासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चेवर सुनीता आहुजानं सोडलं मौन
20
१००० रुपये किंमतीचा Jio चा प्लान आहे बेस्ट; दीर्घ वैधतेसह एन्टरटेन्मेंटचीही मजा, पाहा डिटेल्स

कापणीपूर्वी सोयाबीन दर पडले; अन् शेतकऱ्यांचे गणित बिघडले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:33 IST

नंदुरबार : कापणीचा हंगाम सुरू होण्यापूर्वीच बाजारात साेयाबीन दरांनी ८ हजारांची उसळी घेतली होती. यामुळे यंदा सोयाबीन तारून नेणार ...

नंदुरबार : कापणीचा हंगाम सुरू होण्यापूर्वीच बाजारात साेयाबीन दरांनी ८ हजारांची उसळी घेतली होती. यामुळे यंदा सोयाबीन तारून नेणार अशी शक्यता वर्तवली जात असतानाच सोयाबीनचे दर पडण्यास सुरुवात झाली असून यामुळे शेतकऱ्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे. प्रत्येक दिवशी दर कमी होत असल्याने शेतकरी बांधवांच्या चिंता वाढत आहेत.

कमी वेळेत अधिक उत्पादन मिळत असल्याने जिल्ह्यात सोयाबीनचा पेरा वाढला आहे. यंदाही शेतकऱ्यांनी ३० हजारापेक्षा अधिक हेक्टर क्षेत्रात सोयाबीन पेरा केला आहे. त्याची कापणी काही दिवसात सुरू होणार आहे. दरम्यान, तत्पूर्वी साेयाबीनचे दर ८ हजारांपेक्षा अधिक असल्याचे हवा बाजारात निर्माण झाली होती. परंतु बाजारातील दरवाढीची हवा निघून गेली असून ८ हजारांचा दर थेट साडेचार हजारांवर आल्याचे चित्र सध्या बाजारात आहे.

सोयाबीनवर माझ्यासह परिसरातील सर्वच शेतकरी बांधवांची भिस्त आहे. बाजारात दर १० हजारापर्यंत पोहोचल्याचे ऐकून होतो. बाजारातील दर पडल्याचे सांगितले जात आहे. यामुळे सरकारने शेतकऱ्यांचा सोयाबीन खरेदी करावा, यामुळे शेतकरी बांधवांचे नुकसान टळेल.

- विलास चाैधरी, शेतकरी, माेड

यंदा लांबलेला पाऊस, दुबार पेरणी यामुळे सोयाबीनसाठीही खर्च केला होता. यात पावसामुळे उत्पादन खराब झाले आहे. परंतु दर चांगले असल्याने खर्च वसूल होणार अशी शक्यता होती. परंतु दरांमध्ये घसरण झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची अधिक शक्यता आहे.

- दिलीप पाटील, मोड, ता. तळोदा.

दरम्यान, याबाबत शहादा आणि नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत चाैकशी केली असता, दरांमधील चढ-उतार ही बाजार भावानुसार होणारी प्रक्रिया असल्याची माहिती देण्यात आली. शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात आलेल्या मालाला मिळालेला भाव हा त्यावेळच्या दरांनुसार असल्याचे सांगण्यात आले आहे. सद्यस्थितीत साेयाबीनचे दर स्थिर असून दरांमध्ये चढ-उतार होणे सुरूच राहणार असल्याने शेतकरी बांधवांनी सोयाबीन विक्रीची घाई करू नये, असे व्यापारी सांगत आहेत.