शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

कापणीपूर्वी सोयाबीन दर पडले; अन् शेतकऱ्यांचे गणित बिघडले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:33 IST

नंदुरबार : कापणीचा हंगाम सुरू होण्यापूर्वीच बाजारात साेयाबीन दरांनी ८ हजारांची उसळी घेतली होती. यामुळे यंदा सोयाबीन तारून नेणार ...

नंदुरबार : कापणीचा हंगाम सुरू होण्यापूर्वीच बाजारात साेयाबीन दरांनी ८ हजारांची उसळी घेतली होती. यामुळे यंदा सोयाबीन तारून नेणार अशी शक्यता वर्तवली जात असतानाच सोयाबीनचे दर पडण्यास सुरुवात झाली असून यामुळे शेतकऱ्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे. प्रत्येक दिवशी दर कमी होत असल्याने शेतकरी बांधवांच्या चिंता वाढत आहेत.

कमी वेळेत अधिक उत्पादन मिळत असल्याने जिल्ह्यात सोयाबीनचा पेरा वाढला आहे. यंदाही शेतकऱ्यांनी ३० हजारापेक्षा अधिक हेक्टर क्षेत्रात सोयाबीन पेरा केला आहे. त्याची कापणी काही दिवसात सुरू होणार आहे. दरम्यान, तत्पूर्वी साेयाबीनचे दर ८ हजारांपेक्षा अधिक असल्याचे हवा बाजारात निर्माण झाली होती. परंतु बाजारातील दरवाढीची हवा निघून गेली असून ८ हजारांचा दर थेट साडेचार हजारांवर आल्याचे चित्र सध्या बाजारात आहे.

सोयाबीनवर माझ्यासह परिसरातील सर्वच शेतकरी बांधवांची भिस्त आहे. बाजारात दर १० हजारापर्यंत पोहोचल्याचे ऐकून होतो. बाजारातील दर पडल्याचे सांगितले जात आहे. यामुळे सरकारने शेतकऱ्यांचा सोयाबीन खरेदी करावा, यामुळे शेतकरी बांधवांचे नुकसान टळेल.

- विलास चाैधरी, शेतकरी, माेड

यंदा लांबलेला पाऊस, दुबार पेरणी यामुळे सोयाबीनसाठीही खर्च केला होता. यात पावसामुळे उत्पादन खराब झाले आहे. परंतु दर चांगले असल्याने खर्च वसूल होणार अशी शक्यता होती. परंतु दरांमध्ये घसरण झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची अधिक शक्यता आहे.

- दिलीप पाटील, मोड, ता. तळोदा.

दरम्यान, याबाबत शहादा आणि नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत चाैकशी केली असता, दरांमधील चढ-उतार ही बाजार भावानुसार होणारी प्रक्रिया असल्याची माहिती देण्यात आली. शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात आलेल्या मालाला मिळालेला भाव हा त्यावेळच्या दरांनुसार असल्याचे सांगण्यात आले आहे. सद्यस्थितीत साेयाबीनचे दर स्थिर असून दरांमध्ये चढ-उतार होणे सुरूच राहणार असल्याने शेतकरी बांधवांनी सोयाबीन विक्रीची घाई करू नये, असे व्यापारी सांगत आहेत.