शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कापणीपूर्वी सोयाबीन दर पडले; अन् शेतकऱ्यांचे गणित बिघडले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:33 IST

नंदुरबार : कापणीचा हंगाम सुरू होण्यापूर्वीच बाजारात साेयाबीन दरांनी ८ हजारांची उसळी घेतली होती. यामुळे यंदा सोयाबीन तारून नेणार ...

नंदुरबार : कापणीचा हंगाम सुरू होण्यापूर्वीच बाजारात साेयाबीन दरांनी ८ हजारांची उसळी घेतली होती. यामुळे यंदा सोयाबीन तारून नेणार अशी शक्यता वर्तवली जात असतानाच सोयाबीनचे दर पडण्यास सुरुवात झाली असून यामुळे शेतकऱ्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे. प्रत्येक दिवशी दर कमी होत असल्याने शेतकरी बांधवांच्या चिंता वाढत आहेत.

कमी वेळेत अधिक उत्पादन मिळत असल्याने जिल्ह्यात सोयाबीनचा पेरा वाढला आहे. यंदाही शेतकऱ्यांनी ३० हजारापेक्षा अधिक हेक्टर क्षेत्रात सोयाबीन पेरा केला आहे. त्याची कापणी काही दिवसात सुरू होणार आहे. दरम्यान, तत्पूर्वी साेयाबीनचे दर ८ हजारांपेक्षा अधिक असल्याचे हवा बाजारात निर्माण झाली होती. परंतु बाजारातील दरवाढीची हवा निघून गेली असून ८ हजारांचा दर थेट साडेचार हजारांवर आल्याचे चित्र सध्या बाजारात आहे.

सोयाबीनवर माझ्यासह परिसरातील सर्वच शेतकरी बांधवांची भिस्त आहे. बाजारात दर १० हजारापर्यंत पोहोचल्याचे ऐकून होतो. बाजारातील दर पडल्याचे सांगितले जात आहे. यामुळे सरकारने शेतकऱ्यांचा सोयाबीन खरेदी करावा, यामुळे शेतकरी बांधवांचे नुकसान टळेल.

- विलास चाैधरी, शेतकरी, माेड

यंदा लांबलेला पाऊस, दुबार पेरणी यामुळे सोयाबीनसाठीही खर्च केला होता. यात पावसामुळे उत्पादन खराब झाले आहे. परंतु दर चांगले असल्याने खर्च वसूल होणार अशी शक्यता होती. परंतु दरांमध्ये घसरण झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची अधिक शक्यता आहे.

- दिलीप पाटील, मोड, ता. तळोदा.

दरम्यान, याबाबत शहादा आणि नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत चाैकशी केली असता, दरांमधील चढ-उतार ही बाजार भावानुसार होणारी प्रक्रिया असल्याची माहिती देण्यात आली. शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात आलेल्या मालाला मिळालेला भाव हा त्यावेळच्या दरांनुसार असल्याचे सांगण्यात आले आहे. सद्यस्थितीत साेयाबीनचे दर स्थिर असून दरांमध्ये चढ-उतार होणे सुरूच राहणार असल्याने शेतकरी बांधवांनी सोयाबीन विक्रीची घाई करू नये, असे व्यापारी सांगत आहेत.