शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

ऊस कोरडा झाल्याने चारा विकून लागवड खर्चही भागेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 11:54 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बोरद : ऊसाची लागवड करुन त्याला पाणी देता देताच कूपनलिका आटली, त्यानंतर कोरडा ऊस तरी कामी ...

लोकमत न्यूज नेटवर्कबोरद : ऊसाची लागवड करुन त्याला पाणी देता देताच कूपनलिका आटली, त्यानंतर कोरडा ऊस तरी कामी येईल अशी अपेक्षा असताना मातीमोल दरातच त्याची विक्री करावी लागल्याची वेळ आमलाड ता़ तळोदा येथील शेतक:यावर आली आह़े दुष्काळाची धग दिवसेंदिवस वाढत असल्याने तळोदा तालुक्यात पाण्याअभावी पिके सोडून देण्याची वेळ शेतक:यांवर आली आह़े  आमलाड येथील सागर दिलीप पाटील यांनी त्यांच्या गट क्रमांक 54/1/2 या सहा एकर क्षेत्रात ऊसाची लागवड केली होती़ नोव्हेंबरपर्यंत ऊस तयार होण्याची अपेक्षा असल्याने त्यांच्याकडून संगोपनात कोणतीही कसर सोडली जात नव्हती़ पाणी पुरेल असा अंदाज असल्याने त्यांनी कारखान्यात ऊसाची नोंदणी केल्याची माहिती आह़े परंतू गत 20 दिवसांपूर्वी शेतातील कूपनलिका अचानक कोरडी झाली़ पाणीच येत नसल्याचे ध्यानी आल्यानंतर त्यांनी मोटार काढून खोली तपासली परंतू जमिनीच्या पोटात पाणीच नसल्याचे दिसून आल़े पाणी येणार अशी भाबडी अपेक्षा ठेवूनही पाण्याचा एक ठेंब कूपनलिकेत वाढला नाही़ परिणामी पाणी न मिळाल्याने 6 एकरावरील ऊसाचे पूर्ण पिक कोरडे झाल़े एकरी 23 हजार 500 रुपयांर्पयत खर्च करुनही ऊसाची दयनीय अवस्था झाल्याने शेतकरी सागर पाटील यांनी ऊस काढून टाकण्याचा निर्णय घेतला़ गावातील काहींनी त्यांना सल्ला देत पशुपालकांना चारा म्हणून ऊस विक्री करण्यास सांगितल़े परंतू उन्हामुळे पूर्णपणे कोरडा झालेल्या या चा:याला पशुपालकही अधिक दर देऊन न शकल्याने शेतक:याने नाईलाजाने मिळतील त्या दरात त्याची विक्री करुन खर्च काढण्याचा प्रयत्न करुन पाहिला़ तालुक्यात इतरही ठिकाणी अशाच प्रकारची स्थिती सध्या निर्माण झाली असून अचानक कूपनलिका आटत असल्याने शेतक:यांसमोर मोठे संकट उभे राहिले आह़े यापूर्वी तालुक्यात दुष्काळाची स्थिती उद्भवली नसल्याने सध्याच्या परिस्थितीचा सामना करावा कसा प्रश्न उपस्थित करण्यात येत आह़े एकरी 23 हजार रुपये खर्च करुन उभ्या केलेल्या ऊसाला पशुपालकांनी 1 हजार रुपये टन या प्रमाणे दर दिला होता़ यातून काही उत्पादन येऊन असे वाटत असताना केवळ सहा टन ऊसाचा चारा निघू शकला़ यामुळे शेतक:याना सहा हजार रुपये एवढीच रक्कम मिळाली़ शेतातून पाण्याअभावी कोरडा झालेला ऊस कापला जात असताना ते भावूक झाले होत़े