शहरं
Join us  
Trending Stories
1
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
2
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
3
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
4
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
5
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
6
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
7
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
8
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
9
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार
10
'मी का लोकांच्या शिव्या खाऊ; यापुढे रस्ता खराब झाला तर...', नितीन गडकरींचा मोठा निर्णय, जाणून घ्या
11
KKR: आयपीएल २०२६ पूर्वी केकेआरच्या संघात मोठा बदल, अभिषेक नायरवर मोठी जबाबदारी!
12
Mumbai Children Hostage: ओलीस मुलांची सुखरुप सुटका; अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले 
13
Mumbai Hostage: बिग ब्रेकिंग! मुंबईत एका क्लासमधील मुलांना ओलीस ठेवण्यात आले; पोलिसांनी इमारत घेरली  
14
जिओचा 'या' २ राज्यात दबदबा! दोन कोटी ५१ लाखांहून अधिक युजर्स; एअरटेल-व्हीआयला मोठा फटका
15
Smartphone Tips : बिघडण्याआधी तुमचा स्मार्टफोन देतो 'हे' संकेत! तुम्ही दुर्लक्ष तर करत नाही ना?
16
रासायनिक खतांचे दर नऊ वर्षांत ७५ टक्क्यांनी वाढले; शेतकऱ्यांचे मरण, उसाचा दर केवळ २२ टक्केच वाढला
17
गंभीर आजारांवर केवळ रेग्युलर प्लॅन पुरेसा नाही; 'क्रिटिकल इलनेस' कव्हरचे गणित समजून घ्या
18
IND vs AUS : क्रांतीनं झाकली हरमनप्रीतची मोठी चूक! स्टार्क बायकोला चीअर करायला आला, पण...
19
अमेरिकेचा भारताला दिलासा! चाबहार पोर्टवरील निर्बंधातून डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली सूट
20
लेकाच्या सिनेमात काम करणार का? शाहरुख खान म्हणाला, "त्याला परवडलं तर आणि..."

दक्षिण काशीला लाभणार नवा ‘लूक’

By admin | Updated: June 12, 2017 17:19 IST

पर्यटन विभागाची मंजुरी : विकासासाठी साडेआठ कोटींचा निधी

 रमाकांत पाटील/ ऑनलाईन लोकमत

नंदुरबार,दि.12 - संपूर्ण भारतात दक्षिणकाशी म्हणून परिचित असलेल्या पुरातन नगरी श्रीक्षेत्र प्रकाशा येथील केदारेश्वर मंदिर परिसराच्या विकासासाठी पर्यटन विभागाने साडेआठ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर प्रथमच  या परिसराला  नवा ‘लूक’ लाभणार आहे.
प्रकाशा हे गाव प्रतीकाशी म्हणून ओळखले जाते. त्याबाबतच्या अनेक पौराणिक कथाही प्रचलित आहेत. इतिहासातही हे गाव प्राचीन असल्याचे संदर्भ सापडतात. पुरातत्वज्ञ डॉ.थापर, व्ही.टी. आठवले, के.रमेशराव व आर.शाही यांनी 1955 मध्ये प्रकाशा येथे तापी-गोमाईच्या संगमावर केलेल्या उत्खननात याठिकाणी सापडलेल्या पुरातन वस्तूंमुळे त्यांना याठिकाणी दख्खन आणि मध्य भारतीय संस्कृतीचा मिलाप झालेला दिसून आला. तसेच हरप्पन संस्कृतीच्या वसाहतीही आढळून आल्या. अर्थातच येथील प्राचिनतेचा इतिहास जसा समृद्ध आहे. या ठिकाणी असंख्य पुरातन मंदिरे असून देशभरातील भाविक येथे येत असतात. विशेषत: या भागातील केदारेश्वर मंदिराजवळील पुष्पदंतेश्वराचे मंदिर हे देशातील एकमेव मंदिर मानले जाते. त्यामुळे चारधाम यात्रा करणा:या भाविकांची यात्रा येथे आल्याशिवाय पूर्ण होत नाही, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे याठिकाणी बाराही महिने भाविकांचा ओघ सुरू असतो. तथापि, त्या तुलनेत परिसराचा विकास मात्र झालेला नाही. याच मंदिराजवळ तापी नदीवर बॅरेज प्रकल्प झाल्याने परिसराचे सौंदर्य वाढले आहे. आता पर्यटन विभागाने या भागाच्या विकासासाठी विशेष लक्ष घातले आहे. 
विशेषत: जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्याचकडे पर्यटन मंत्रालय असल्याने त्यांनी त्यासाठी लक्ष केंद्रीत केले आहे. जिल्हाधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी यांच्या मार्गदर्शनानुसार केदारेश्वर परिसराच्या विकासासाठी एक विशेष आराखडा तयार करण्यात आला होता. त्याला पर्यटन विभागाने नुकतीच मंजुरी दिली आहे. साधारणत: साडेआठ कोटी रुपये खर्च त्यावर होणार आहे. त्यामुळे हा परिसर अधिकच सुशोभित होणार आहे. त्यामुळे साहजिकच पर्यटकांची संख्याही वाढणार आहे.