शहरं
Join us  
Trending Stories
1
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
2
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
3
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
4
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
5
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
6
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
7
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
8
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
9
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
10
"सगळे या..सगळे या...", मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
11
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
12
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
13
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
14
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
15
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
16
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
17
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
18
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
19
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
20
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!

दक्षिण काशीला लाभणार नवा ‘लूक’

By admin | Updated: June 12, 2017 17:19 IST

पर्यटन विभागाची मंजुरी : विकासासाठी साडेआठ कोटींचा निधी

 रमाकांत पाटील/ ऑनलाईन लोकमत

नंदुरबार,दि.12 - संपूर्ण भारतात दक्षिणकाशी म्हणून परिचित असलेल्या पुरातन नगरी श्रीक्षेत्र प्रकाशा येथील केदारेश्वर मंदिर परिसराच्या विकासासाठी पर्यटन विभागाने साडेआठ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर प्रथमच  या परिसराला  नवा ‘लूक’ लाभणार आहे.
प्रकाशा हे गाव प्रतीकाशी म्हणून ओळखले जाते. त्याबाबतच्या अनेक पौराणिक कथाही प्रचलित आहेत. इतिहासातही हे गाव प्राचीन असल्याचे संदर्भ सापडतात. पुरातत्वज्ञ डॉ.थापर, व्ही.टी. आठवले, के.रमेशराव व आर.शाही यांनी 1955 मध्ये प्रकाशा येथे तापी-गोमाईच्या संगमावर केलेल्या उत्खननात याठिकाणी सापडलेल्या पुरातन वस्तूंमुळे त्यांना याठिकाणी दख्खन आणि मध्य भारतीय संस्कृतीचा मिलाप झालेला दिसून आला. तसेच हरप्पन संस्कृतीच्या वसाहतीही आढळून आल्या. अर्थातच येथील प्राचिनतेचा इतिहास जसा समृद्ध आहे. या ठिकाणी असंख्य पुरातन मंदिरे असून देशभरातील भाविक येथे येत असतात. विशेषत: या भागातील केदारेश्वर मंदिराजवळील पुष्पदंतेश्वराचे मंदिर हे देशातील एकमेव मंदिर मानले जाते. त्यामुळे चारधाम यात्रा करणा:या भाविकांची यात्रा येथे आल्याशिवाय पूर्ण होत नाही, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे याठिकाणी बाराही महिने भाविकांचा ओघ सुरू असतो. तथापि, त्या तुलनेत परिसराचा विकास मात्र झालेला नाही. याच मंदिराजवळ तापी नदीवर बॅरेज प्रकल्प झाल्याने परिसराचे सौंदर्य वाढले आहे. आता पर्यटन विभागाने या भागाच्या विकासासाठी विशेष लक्ष घातले आहे. 
विशेषत: जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्याचकडे पर्यटन मंत्रालय असल्याने त्यांनी त्यासाठी लक्ष केंद्रीत केले आहे. जिल्हाधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी यांच्या मार्गदर्शनानुसार केदारेश्वर परिसराच्या विकासासाठी एक विशेष आराखडा तयार करण्यात आला होता. त्याला पर्यटन विभागाने नुकतीच मंजुरी दिली आहे. साधारणत: साडेआठ कोटी रुपये खर्च त्यावर होणार आहे. त्यामुळे हा परिसर अधिकच सुशोभित होणार आहे. त्यामुळे साहजिकच पर्यटकांची संख्याही वाढणार आहे.