शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

शेतक:यांसाठी ‘उकीरडे’ ठरताहेत उत्पन्नाचा स्त्रोत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 12:48 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अक्कलकुवा :  खळवाडीत किंवा गावाच्या सिमेवर गुरांचे शेण टाकून तयार केलेले निरुपयोगी उकीरडे शेतक:यांसाठी आर्थिक उत्पन्नाचा ...

लोकमत न्यूज नेटवर्कअक्कलकुवा :  खळवाडीत किंवा गावाच्या सिमेवर गुरांचे शेण टाकून तयार केलेले निरुपयोगी उकीरडे शेतक:यांसाठी आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत बनले आहेत़ अक्कलकुवा तालुक्यातील सपाटीच्या गावांमध्ये वर्षभर तयार होणा:या या  शेणखताची खरेदी करण्यासाठी खान्देशातून मोठे शेतकरी गर्दी करत असून यातून  शेतक:यांना अर्थप्राप्तीचा नवा मार्गही सापडला आह़े  अक्कलकुवा तालुक्यात सातपुडय़ाच्या दुर्गम भागासह सपाटीवरील गावांमध्ये सर्वच शेतक:यांकडे पाळीव गुरे आहेत़ काही जणांनी दुग्धव्यवसाय म्हणून तर काहींनी शेतीसाठी उपयोगी म्हणून गुरांचे संगोपन केले आह़े यातून घरोघरी किमान चारपेक्षा अधिक गुरे हमखास दिसून येतात़ भल्या पहाटे उठून गुरांचे शेण काढून ते उकीरडय़ावर टाकत शेतकरी त्यांचा साठा करतात़ वर्षभर  होणा:या ढिगाला गेल्या दोन वर्षापासून मोठी मागणी आह़े सेंद्रीय शेतीसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या या शेणखताच्या खरेदीसाठी जळगाव, नाशिक, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याच्या विविध भागातून शेतकरी वाहनांसह येथे भेटी देत आह़े शेतक:यांसोबत वार्षिक करार करुन वाहनाच्या हिशोबाने खत भरुन घेत तातडीने पैसेही देत आहेत़ यातून दुष्काळातही शेतक:यांना आधार मिळाला असून सपाटीच्या गावांमध्ये शेणखताच्या उद्योगाचा फायदा मजूरांनाही होत असून त्यांनाही खत वाहून नेण्याचा रोजगार उपलब्ध झाला आह़े तालुक्यातून दरदिवशी 15 वाहने परजिल्ह्यात जात आहेत़ शेतक:यांकडून बांबूचे मोठे टोपले शेणखत मोजणीसाठी वापरले जात आह़े सपाटीच्या गावांमध्ये 110 ते 130 रुपये टोपले यादराने शेणखताची विक्री होत आह़े बहुतांश शेणखत हे कोरडेच खरेदी करण्याकडे मोठे शेतकरी भर देतात़  सहा चाकीट्रक साधारण 75 टोपले खत टाकल्यास ते पूर्णपणे क्षमतेने भरत़े यातून शेतक:याला आठ हजार 500 रुपये सहज मिळतात़ खत भरणे आणि वाहतूकीची जबाबदारी ही संबधित खरेदीदाराची असत़े  शेतक:यांना 15 गुरांच्या मागे आठवडय़ात 50 त 60 टोपले शेणखत मिळत असल्याने त्यांच्याकडून जागा उपलब्ध असल्यास छोटे ढिग करुन उन्हात सुकवण्यासाठी टाकले जात़े  एका एकराना साधारण 50 टोपले शेणखत लागत असल्याने बहुतांश शेतकरी वेळावेळी येथे भेट देत बुकींग करुन ठेवतात़ यातून येथील शेतक:यांना महिन्याकाठी 10 हजार मिळू लागले आहेत़ बहुतांश शेतकरी एकापेक्षा अधिक ठिकाणी शेणखताचा साठा करत आहेत़ पावसाळ्यात त्यावर पाणी पडल्यास इतर आठ महिने त्याला सुकवून वेळावेळी त्याची विक्री करता येणे शक्य होत़े माती आणि काडीकचरा एकत्र झाल्यास शेतकरीच खरेदीदाराला टोपल्यामागे 20 रुपयांर्पयतची सूट देतात़ परंतू मातीतच हे खत टाकले जाणार असल्याने खरेदीदार शेतकरी 20 रुपयांर्पयतची सूट नाकारतात़ सातपुडय़ाच्या पायथ्याशी असलेल्या गावांमध्ये जनवारांना दरदिवशी 8 ते 12 किलो चारा सहज मिळत असल्याने त्यांचे शेणखत हे सेंद्रीय खत म्हणून चांगले मानले जात़े