शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

शेतक:यांसाठी ‘उकीरडे’ ठरताहेत उत्पन्नाचा स्त्रोत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 12:48 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अक्कलकुवा :  खळवाडीत किंवा गावाच्या सिमेवर गुरांचे शेण टाकून तयार केलेले निरुपयोगी उकीरडे शेतक:यांसाठी आर्थिक उत्पन्नाचा ...

लोकमत न्यूज नेटवर्कअक्कलकुवा :  खळवाडीत किंवा गावाच्या सिमेवर गुरांचे शेण टाकून तयार केलेले निरुपयोगी उकीरडे शेतक:यांसाठी आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत बनले आहेत़ अक्कलकुवा तालुक्यातील सपाटीच्या गावांमध्ये वर्षभर तयार होणा:या या  शेणखताची खरेदी करण्यासाठी खान्देशातून मोठे शेतकरी गर्दी करत असून यातून  शेतक:यांना अर्थप्राप्तीचा नवा मार्गही सापडला आह़े  अक्कलकुवा तालुक्यात सातपुडय़ाच्या दुर्गम भागासह सपाटीवरील गावांमध्ये सर्वच शेतक:यांकडे पाळीव गुरे आहेत़ काही जणांनी दुग्धव्यवसाय म्हणून तर काहींनी शेतीसाठी उपयोगी म्हणून गुरांचे संगोपन केले आह़े यातून घरोघरी किमान चारपेक्षा अधिक गुरे हमखास दिसून येतात़ भल्या पहाटे उठून गुरांचे शेण काढून ते उकीरडय़ावर टाकत शेतकरी त्यांचा साठा करतात़ वर्षभर  होणा:या ढिगाला गेल्या दोन वर्षापासून मोठी मागणी आह़े सेंद्रीय शेतीसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या या शेणखताच्या खरेदीसाठी जळगाव, नाशिक, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याच्या विविध भागातून शेतकरी वाहनांसह येथे भेटी देत आह़े शेतक:यांसोबत वार्षिक करार करुन वाहनाच्या हिशोबाने खत भरुन घेत तातडीने पैसेही देत आहेत़ यातून दुष्काळातही शेतक:यांना आधार मिळाला असून सपाटीच्या गावांमध्ये शेणखताच्या उद्योगाचा फायदा मजूरांनाही होत असून त्यांनाही खत वाहून नेण्याचा रोजगार उपलब्ध झाला आह़े तालुक्यातून दरदिवशी 15 वाहने परजिल्ह्यात जात आहेत़ शेतक:यांकडून बांबूचे मोठे टोपले शेणखत मोजणीसाठी वापरले जात आह़े सपाटीच्या गावांमध्ये 110 ते 130 रुपये टोपले यादराने शेणखताची विक्री होत आह़े बहुतांश शेणखत हे कोरडेच खरेदी करण्याकडे मोठे शेतकरी भर देतात़  सहा चाकीट्रक साधारण 75 टोपले खत टाकल्यास ते पूर्णपणे क्षमतेने भरत़े यातून शेतक:याला आठ हजार 500 रुपये सहज मिळतात़ खत भरणे आणि वाहतूकीची जबाबदारी ही संबधित खरेदीदाराची असत़े  शेतक:यांना 15 गुरांच्या मागे आठवडय़ात 50 त 60 टोपले शेणखत मिळत असल्याने त्यांच्याकडून जागा उपलब्ध असल्यास छोटे ढिग करुन उन्हात सुकवण्यासाठी टाकले जात़े  एका एकराना साधारण 50 टोपले शेणखत लागत असल्याने बहुतांश शेतकरी वेळावेळी येथे भेट देत बुकींग करुन ठेवतात़ यातून येथील शेतक:यांना महिन्याकाठी 10 हजार मिळू लागले आहेत़ बहुतांश शेतकरी एकापेक्षा अधिक ठिकाणी शेणखताचा साठा करत आहेत़ पावसाळ्यात त्यावर पाणी पडल्यास इतर आठ महिने त्याला सुकवून वेळावेळी त्याची विक्री करता येणे शक्य होत़े माती आणि काडीकचरा एकत्र झाल्यास शेतकरीच खरेदीदाराला टोपल्यामागे 20 रुपयांर्पयतची सूट देतात़ परंतू मातीतच हे खत टाकले जाणार असल्याने खरेदीदार शेतकरी 20 रुपयांर्पयतची सूट नाकारतात़ सातपुडय़ाच्या पायथ्याशी असलेल्या गावांमध्ये जनवारांना दरदिवशी 8 ते 12 किलो चारा सहज मिळत असल्याने त्यांचे शेणखत हे सेंद्रीय खत म्हणून चांगले मानले जात़े