शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
8
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
9
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
10
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
12
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
13
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
14
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
15
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
16
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
17
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
18
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
19
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
20
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?

मागासवर्गीय महामंडळांची कर्ज माफ करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 11:35 IST

समाज प्रबोधन संवाद यात्रा : लक्ष्मणराव ढोबळे यांची मागणी

ठळक मुद्दे 52 जातींना सवलतींबाबत काहीच माहिती नाही राज्यभरात एकटय़ा मातंग समाजात 300 संघटना आहेत. दलित समाजातील प्रमुख पाच पोटजातीमध्ये अशीच मतभेदाची दारूण अवस्था आहे. अनुसूचित जातीच्या 59 जातीमधील 52 उपेक्षीत जाती अशा आहेत की त्यांना सवलती कशाशी खातात हे माहितीसु

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : मागासवर्गीय महामंडळाची कर्जे माफ करावी व अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतर} पुरस्कार जाहीर करावा अशी मागणी माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली. राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी समाज प्रबोधनासाठी राज्यभर संवाद यात्रा काढली आहे. त्याअंतर्गत ते शनिवारी नंदुरबारात आले होते. यावेळी पत्रकार परिषदेत बोलतांना ढोबळे यांनी सांगितले, शेतक:यांचे हजारो कोटींचे कर्ज माफ होते. परंतु जो शेतात राबतो. कष्ट करतो त्या उपेक्षीतांचे कर्ज माफ करण्याबाबत सरकार काहीही हालचाल करीत नाही. राज्यातील सर्वच मागासवर्गीय महामंडळांची कज्रे माफ करून या उपेक्षीत घटकाला दिलासा द्यावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यासाठी मुख्यमंत्र्यांकडे विनंती करण्यात आली आहे. यासाठी कुठलेही आंदोलन केले जाणार नाही. सनदशीर मार्गाने मागणी लावून धरली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.मातंग समाजासह मागासवर्गीयांसाठी अण्णाभाऊ साठे यांनी काम केले. या वंचीत घटकांची अंत्यप्रेरणा जागृत करण्याचे काम केले. आपल्या साहित्यातून त्यांनी जागृती केली अशा या महान व्यक्तीला त्यांचा कार्याचा गौरव म्हणून भारत रत्न जाहीर करावा अशी मागणी देखील त्यांनी केली.समाजातील वंचीत घटकांनी मुख्य प्रवाहात यावे यासाठी विविध माध्यमातून प्रय} केले जात आहेत. त्यासाठीच प्रबोधन संवाद यात्रा देखील काढण्यात आलेली आहे. प्रत्येक ठिकाणी जावून आपण आर्थिक, शैक्षणिक बाबतीत मार्गदर्शन करीत आहोत. काटकसरीने 50 ते 100 रुपये बचत करून बँकांचे खाते जिवंत ठेवा, सैनिक, पोलीस भरती यासाठी समाजातील तरुणांनी तयारी करावी. आरोग्य, शिक्षण व बचतगट यामध्ये पुढाकार घ्यावा. आपली मुलं मिरवणुकीने पहिलीच्या शाळेत घालावी यासाठी आग्रही राहावे असे प्रबोधन या माध्यमातून करण्यात येत आहे. 1 ऑगस्टपासून वाटेगावहून ही यात्रा सुरू करण्यात आली असून 31 ऑगस्ट रोजी मुंबई चिरागनगर येथे तिचा समारोप होणार असल्याचेही लक्ष्मणराव ढोबळे यांनी सांगितले.