शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
2
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
3
...अन् त्यावेळी राष्ट्रपती बनण्याचा प्रस्ताव वाजपेयींनी नाकारला; 'अटल संस्मरण' पुस्तकात दावा
4
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
5
Video - हार्ट अटॅकमुळे वेदनेने तडफडत होता पती; पत्नीने जोडले हात, पण कोणीच केली नाही मदत
6
शेतकऱ्यांसाठी मोठा अलर्ट! फार्मर आयडीशिवाय पीएम किसानचे पैसे येणार नाहीत; अशी तयार करा ID
7
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
8
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
9
BMC ELections: मुंबईत अजित पवार पडले एकटे, राष्ट्रवादीची किती जागांवर लढण्याची तयारी, बैठकीत काय झाला निर्णय? 
10
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
11
Video - लग्नात राडा! नवरदेवाच्या मित्रांनी नवरीला घातली 'स्नो स्प्रे'ने आंघोळ, मेकअपच गेला वाया
12
क्रेडिट कार्ड वापरताय? मग 'या' ७ चुका टाळा, अन्यथा बसेल आर्थिक फटका!
13
IPL मधील ऑक्शनची संपूर्ण रक्कम घरी नेतात का खेळाडू? पाहा टॅक्स, सॅलरी आणि इनहँड रकमेचा कसा असतो हिशोब
14
‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय
15
शाल, गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि डोक्यावर टिळा, अनंत अंबानींसोबत वनतारामध्ये दिसलं मेसीचं भारतीय रूप
16
कर्माची फळं इथेच भोगली! 'धुरंधर'मधील खनानी होता सगळ्यात खुंखार; भारतात पाठवायचा खोट्या नोटा, मिळाला खतरनाक मृत्यू
17
किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा
18
Saif Ali Khan : "पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती
19
"कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, जोवर दिल्लीत आणि निवडणूक आयोगात हरामखोरांचं राज्य, तोवर...;" संजय राऊतांची जीभ घसरली!
Daily Top 2Weekly Top 5

बसेस सुरू होताच स्थानकातील विक्रेत्यांच्या संसाराची गाडी रुळावर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:35 IST

नंदुरबार : अनलाॅकमुळे एसटी बसेस धावू लागल्या आहेत. सोबतच बसस्थानकावर अवलंबून असलेला रोजगारही खुला झाला असून बसमध्ये विविध पदार्थ ...

नंदुरबार : अनलाॅकमुळे एसटी बसेस धावू लागल्या आहेत. सोबतच बसस्थानकावर अवलंबून असलेला रोजगारही खुला झाला असून बसमध्ये विविध पदार्थ विक्री करून गुजराण करणाऱ्यांच्या संसाराची गाडीही पुन्हा रुळावर आली आहे. नंदुरबार बसस्थानकात सध्या ऐन भरात कामकाज सुरू असून प्रवाशांच्या गरजेनुसार खाद्यपदार्थ, थंड पेये यांसह विविध वस्तूंची विक्री सुरू आहे.

जुन्या बसस्थानकाची इमारत पाडून प्रशस्त अशा संकुलासह नवीन बसस्थानक काही वर्षांपूर्वी तयार करण्यात आले होते. याठिकाणी करार तसेच भाडेतत्त्वावर जागा घेत अनेकांनी व्यवसायही सुरू केले आहेत. दरम्यान, यात अनेक वर्षांपासून व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांनाही जागा देण्यात आली आहे. गेल्या दीड वर्षात लाॅकडाऊनमुळे या व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले होते. दुसऱ्या लाॅकडाऊनमुळे फेरीवाल्या विक्रेत्यांना बेरोजगारीची झळ बसून त्यांच्या संसारावर मोठा परिणाम झाला होता.

नंदुरबार बसस्थानकात चहा विक्रीची दुकाने आहेत. याठिकाणी पुन्हा जुन्या दिवसांसारखीच गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे. चहासोबत खाद्यपदार्थ विक्रीही होत असल्याने बाहेरगावाहून येणाऱ्या प्रवाशांची सोय होत आहे.

खाद्यपदार्थांसोबत थंड पेये आणि पाणी विक्री गेल्या काही वर्षात बसस्थानकात सुरू झाली आहे. पाण्याच्या बाटल्या विक्री करणारे फेरीवाले पुन्हा नजरेस पडत असून त्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा आनंद दिसून येत आहे.

विशेष अशा आवाजात एसटीतील प्रवाशांसाठी खाद्यपदार्थ विक्रीची एक पद्धत आहे. बऱ्याच दिवसांनी विक्रेत्यांचा तो वेगळा आवाज कानी पडत असल्याने बसमधील प्रवासीही आता त्यांना साद घालू लागले असल्याचे चित्र स्थानकात आहे.

एसटीकडून परवानगी...

n कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊनमुळे इतिहासात प्रथमच एसटीची धावणारी चाके बंद पडली होती. यातून त्यावर आधारित रोजगारही थांबला होता. स्थानकात विविध पदार्थ विक्री करणाऱ्यांना एसटीकडून परवानगी दिली जाते. अनलाॅकनंतर या विक्रेत्यांचा कोविड रिपोर्ट आणि लसीकरण प्रमाणपत्र तपासून त्यांना परवानगी देण्यात आली.

n स्थानकातील दुकानांतून साहित्य घेत त्यांची बसमध्ये विक्री करणाऱ्यांची संख्या मात्र घटली असल्याचे सांगण्यात आले. येथील रोजगार संपल्याने इतरांनी दुसऱ्या कामांकडे मोर्चा वळवल्याची माहिती दिली गेली आहे.