शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

ग्रामविकासाच्या चळवळीला दिशा देणारा सोनपाडाचा ‘मानसिंग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2020 11:54 IST

रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :गावाच्या रस्त्याभोवती साचणारे उकिरडे, कचरा यामुळे आरोग्याला घातक ठरलेल्या अस्वच्छतेवर मात करण्यासाठी ...

रमाकांत पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :गावाच्या रस्त्याभोवती साचणारे उकिरडे, कचरा यामुळे आरोग्याला घातक ठरलेल्या अस्वच्छतेवर मात करण्यासाठी सोनपाडा, ता.नवापूर येथील मानसिंग वळवी व त्यांच्या साथीदारांनी सुरू केलेली चळवळ ही निश्चितच ग्रामिण युवकांपुढे आदर्श निर्माण करणारी आहे. या उपक्रमातून गावात स्वच्छता तर झालीच पण अनेकांना उद्योग-व्यवसायही मिळाल्याने समृद्धीचा नवा मार्ग त्यांनी उभा केला आहे.सोनपाडा हे १०० टक्के आदिवासी वस्तीचे गाव. या गावात कृषी विज्ञान केंद्र कोळदा येथील तज्ज्ञांनी भेट देवून शेतकऱ्यासाठी मार्गदर्शन मेळावा घेतला होता. त्यावर प्रभावीत होऊन मानसिंग एनथा वळवी व त्यांच्या काही सहकार्यांनी कृषी विज्ञान केंद्राशी संपर्क साधला आणि काय करता येईल यावर चर्चा केली. त्यातूनच गावाच्या रस्त्याभोवती उकीरडे व कचरा जास्त असल्याचे मानसिंग वळवी यांनी सांगितले.त्यातूनच गांडूळ खत निर्मितीची संकल्पना पुढे आली. त्यांच्या मार्गदर्शनानुसार सुरुवातीला केवळ पाच बेडचा गांडूळखत निर्मितीचा प्रकल्प सुरू केला. त्यासाठी गावातील शेतकऱ्यांचे शेनखत विकत घेतले व रस्त्याभोवती साचलेला कचरा गोळा केला. पहिल्या वर्षाचा यशस्वी प्रयोगानंतर त्याचा विस्तार केला.गेल्या पाच वर्षापासून हा उपक्रम सुरू असून यावर्षी १०९ टन गांडूळ खत निर्मिती केली आहे. गावातील शेतकºयांचे शेनखत त्यासाठी घेतले जाते. याच बरोबर बचत गटाच्या माध्यमातून दाळमिळही सुरू केली आहे. त्याला आता मुंबईतही मागणी वाढल्याने मुंबईचा लोकांचा मागणीच्या धरतीवर या प्रकल्पाला नवा आकार देण्याचाही प्रयत्न सुरू आहे.गांडूळखत निर्मितीमुळे शेती विकासालाही चालना मिळाली आहे. यासंदर्भात मानसिंग वळवी यांनी त्यांच्या स्वत:च्या एक एकर शेतात प्रयोग केला. त्यातील यशानंतर हळूहळू त्यांनी आता ३५ एकर क्षेत्र भाड्याने घेतले. त्यात वेगवेगळे प्रयोग सुरू आहेत. विशेषत: भात, तूर, ज्वारीचे पीकं घेतली जात असून या सेंद्रीय धान्याला मागणीही वाढली आहे.मानसिंग वळवी यांचे प्रयोग पाहून गावातील अनेक शेतकरी आता सेंद्रीय शेतीचे प्रयोग करू लागले आहेत. त्यामुळे हे गाव प्रयोगशील गाव म्हणून जिल्ह्यात नावारुपास येवू पहात आहे. तांदूळ महोत्सवात या गावाच्या तांदुळाला विशेष मागणी असते.प्रयोगशील गाव... मानसिंग वळवी व त्यांच्या पाच सहकार्यांनी बचत गटाच्या माध्यमातून गावात दाळमिल, सेंद्रीय तांदूळ, गांडूळखत निर्मिती आणि सेंद्रीय शेतीचे प्रयोग सुरू केले आहेत. त्यांचा आदर्श घेत गावातील ४१ शेतकºयांनी सेंद्रीय शेतीचे प्रयोग यंदा राबविले आहेत. पर्यावरण आणि स्वच्छतेचा संदेश देत गावात स्वयंरोजगार आणि व्यवसायाला गती मिळाल्यामुळे गावात समृद्धीचा नवा मार्ग निर्माण झाला आहे. त्यामुळे गावही बदलू लागले असून अनेकजण या गावातील प्रयोग पहाण्यासाठी व माहितीसाठी येत आहेत.