शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
2
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! वेटिंग-RAC तिकिटाची स्थिती आता १० तास आधी कळणार
3
कर्जदारांना 'अच्छे दिन'! भारतीय अर्थव्यवस्था 'गोल्डीलॉक्स' स्थितीत; गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले...
4
काँग्रेसची कार्यकर्ती, वरपर्यंत ओळख असल्याचं सांगून आणायची प्रेमासाठी दबाव, त्रस्त पोलीस इन्स्पेक्टरची महिलेविरोधात तक्रार
5
मुंबई इंडियन्सची 'ती गोष्ट 'जितेंद्र भाटवडेकर'च्या मनाला लागली? रोहितसोबतचा फोटो शेअर करत म्हणाला...
6
‘टॅरिफला आता हत्यार बनवले जातेय’, निर्मला सीतारमण यांनी सांगितला 'ट्रम्प टॅरिफ'मागील खेळ...
7
वंदे भारत की राजधानी, कोणत्या ट्रेनच्या लोको पायलटला सर्वाधिक पगार मिळतो? आकडा पाहून व्हाल थक्क
8
ICICI Prudential AMC IPO Allotment: कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस? जीएमपीमध्येही जोरदार तेजी
9
गणवेशावरून चिडवलं, घरी येताच चौथीत शिकणाऱ्या प्रशांतने...; आईवडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली
10
“काँग्रेसचे पाक प्रेम उतू चाललेय, ऑपरेशन सिंदूरचा हिशोब विचारणारे देशद्रोही”: एकनाथ शिंदे
11
Meesho च्या शेअरला अपर सर्किट; इश्यू प्राईजच्या दुप्पट झाली किंमत, सह-संस्थापक बनले अब्जाधीश
12
ढाका येथील भारतीय उच्चायुक्तालयाला धमकी, सरकारने बांगलादेशी अधिकाऱ्याला समन्स बजावले
13
विराट-अनुष्काने घेतली प्रेमानंद महाराजांकडून दीक्षा, गळ्यात तुळशी माळ; जाणून घ्या त्याचे महत्व
14
Payal Gaming: कोण आहे पायल गेमिंग? १.२० मिनटांचा MMS लीक झाल्यानंतर आली चर्चेत!
15
Video: BJP आमदाराच्या मुलाचा शाही विवाह सोहळा; तब्बल ७० लाखांच्या फटाक्यांची केली आतषबाजी
16
ओला-उबरला टक्कर! १ जानेवारीपासून 'भारत टॅक्सी' ॲप होणार लाँच; प्रवाशांना स्वस्त प्रवास आणि ड्रायव्हर्सची होणार जास्त कमाई
17
लग्नानंतर एका वर्षात शोभिता धुलिपाला देणार गुडन्यूज? सासरे नागार्जुन म्हणाले, "योग्य वेळ..."
18
भारतीय बाजारात उद्याच स्वस्तातली सात सीटर कार लाँच होणार; अर्टिगा, ट्रायबरला मिळणार टक्कर...
19
स्वस्त 'पर्सनल लोन'च्या शोधात आहात? 'या' ५ बँकांमध्ये मिळतोय सर्वात कमी व्याजदर; १२ लाखांचा EMI किती?
20
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

व्यसनमुक्त गावासाठी एकवटले ग्रामस्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2020 12:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सोमावल : आदिवासींमधील मौखिक अख्यायिकांप्रमाणे आदिवासींचे दैवत राजापांठा यांच्याद्वारे आत्मसात केलेली गुणकारी तथा आयुर्वेदिक मोहाची दारू ...

लोकमत न्यूज नेटवर्कसोमावल : आदिवासींमधील मौखिक अख्यायिकांप्रमाणे आदिवासींचे दैवत राजापांठा यांच्याद्वारे आत्मसात केलेली गुणकारी तथा आयुर्वेदिक मोहाची दारू कालपरत्वे रसायनयुक्त झाल्याने मानवी शरीरास अत्यंत घातक ठरत आहे. त्यामुळे व्यसनमुक्तीची गरज भासू लागली आहे. त्यानुसार नर्मदानगर ता. तळोदा येथील ग्रामस्थांनी व्यसनमुक्त गावाचा निर्धार केला. याबाबत चळवळ सुरू करण्यासाठी एक समितीही गठीत करण्यात आली आहे.नर्मदानगर येथील सामाजिक कार्यकर्ते दरबारसिंग पाडवी हे व्यसनमुक्तीचा उपक्रम घेत आहे. यात शेकडो व्यसनाधीन वयस्क स्त्री-पुरुष व युवक सहभागी होत आहे. वर्षानुवर्षे व्यसनाधितेत जोखळलेल्या असंख्य आदिवासी कुटुंबाचे या उपक्रमांमुळे परिवर्तन झाले असून व्यसनमुक्त व सुखी संसार सुरू आहे. पूर्वजांच्या मान्यतेनुसार विविध रोगावर उपायकारक असलेली मोहाची दारू ही कालपरत्वे रासायनिक युक्त झाल्याने मानवी आरोग्यास अत्यंत घातक ठरत आहे. केमिकलयुक्त दारूच्या आहारी गेलेल्या असंख्य तरुणांमुळे गावात अशांतता पसरत वाद विवादाच्या घटनेत भर पडली आहे. तर नशेत वाहन चालवल्याने अपघाताचे प्रमाणातही वाढ झाली आहे. शिवाय संपूर्ण पिढीच बेकारीच्या खाईत अप्रत्यक्षपणे ढकलली जात असुन ही बाब समाजासाठी चिंतेची बनली आहे.व्यसनाच्या या परिस्थितीवर मात करण्यासाठी नर्मदानगर येथील ग्रामस्थानी बैठक घेत व्यसनमुक्त गावाचा संकल्प केला. यासाठी एक समितीही गठीत करण्यात आली असून व्यसनमुक्तीसाठी पुढे उपक्रम राबविण्यात येणार आहे. बैठकीत समिती प्रमुख दरबारसिंग पाडवी, सरपंच पुन्या वसावे, माजी सरपंच दिलीप पाडवी, पोलीस पाटील जयराम पाडवी, टेडग्या पाडवी, किरता वसावे, रोता पाडवी, सुरेश चौधरी, उमेश पाडवी, राजू पाडवी, देवानंद पाडवी, लालसिंग पावरा, दोरुसिंग वसावे, वजा पाडवी, सिंगा वसावे आदी उपस्थित होते.दारूच्या आहारी गेलेल्यांच्या कुटुंबाची अवस्था दयनीय झाली असून एका व्यसनाधीन व्यक्तीमुळे संपूर्ण कुटुंबच उघड्यावर येत आहे. शेती असूनही उपजीविकेसाठी पाल्यासह स्थलांतर करीत आहे.स्थलांतराने कुटुंबाचे पालनपोषण होत असले तरी कुटुंबियांना सामाजिक, आर्थिकसह बेरोजगारी, आरोग्य, पाल्याचे शिक्षण अशा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असते.शिवाय संपूर्ण पिढीच बेकारीच्या खाईत अप्रत्यक्षपणे ढकलली जात असुन ही बाब समाजासाठी चिंतेची बनली आहे.व्यसनामुळे अनेक गंभीर समस्या निर्माण होत असतांना पोलीस प्रशासन मात्र बघ्यांच्या भूमिकेत दिसून येत आहे. एवढेच नव्हे तर अवैध धंदे वाढीला काही अंशी पोलीस प्रशासनच जबाबदार असल्याचेही म्हटले जात आहे.