शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

वाटवी येथे सोलर प्रकल्पांचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 12:56 IST

लोकमत न्यूज नेटवर्कखांडबारा : महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान व सेल्को यांच्या संयुक्त विद्यमाने ग्राम वाटवी येथील सामूहिक संस्थांच्या सोलार प्रकल्पांचे उद्घाटन पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी आमदार सुरूपसिंग नाईक, आमदार डॉ.विजयकुमार गावीत, माजी खासदार माणिकराव गावीत, नवापूर पं.स.च्या सभापती सविता गावीत, जिल्हाधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी, जिल्हा पोलीस ...

लोकमत न्यूज नेटवर्कखांडबारा : महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान व सेल्को यांच्या संयुक्त विद्यमाने ग्राम वाटवी येथील सामूहिक संस्थांच्या सोलार प्रकल्पांचे उद्घाटन पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी आमदार सुरूपसिंग नाईक, आमदार डॉ.विजयकुमार गावीत, माजी खासदार माणिकराव गावीत, नवापूर पं.स.च्या सभापती सविता गावीत, जिल्हाधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी, जिल्हा पोलीस अधीक्षक संजय पाटील, सहायक जिल्हाधिकारी निमा               अरोरा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी.एम. मोहन, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जालींदर पठारे, बागूल, खरेदी-विक्री संघाचे         चेअरमन अजित नाईक, वाटवीच्या सरपंच लैला कोकणी, गटविकास अधिकारी नंदकुमार वाघमारे, सविता जयस्वाल, अॅड.योगिनी खानविलकर आदी उपस्थित होते.पालकमंत्री रावल म्हणाले की, मुख्यमंत्री ग्रामपरिवर्तन योजनेंतर्गत नवापूर तालुक्यातील सहा गावांची निवड करण्यात आली असून,               यापैकी वाटवी हे एक गाव आहे. या गावात शासनाच्या सर्व योजना एकत्रिपणे लागू करून या योजना प्रभावीपणे राबविण्यात याव्यात. रोजगार हमी योजनेचे सर्व  पॅकेजनुसार योजना द्याव्यात. सर्व यंत्रणांच्या कामांच्या यादीमध्ये ग्राम परिवर्तन योजनेंतर्गत निवड केलेल्या गावांचा समावेश असणे आवश्यक आहे. डिजिटल शाळेत विजेअभावी समस्या निर्माण  होवू नये यासाठी या शाळेत सोलार प्रकल्प देण्यात आला  असून, या गावातील पालकांनी आपल्या पाल्यांना घराची, शेतीची कामे न लावता शाळेत शिक्षणासाठी पाठवावे. आपला देश विकासाच्या मार्गावर असून गावांचा विकास म्हणजे देशाचा विकास आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गावाचे परिवर्तन करू या, असेही त्यांनी सांगितले.जिल्हाधिकारी डॉ.कलशेट्टी यांनी वाटवी हे गाव अतिशय उत्साही गाव असून या योजनेमुळे या गावाला राजस्तराचा हिस्सा मिळाला आहे. या गावात शोषखड्डे, शौचालये, गांडूळखत, विहिरी, कंम्पोस्ट खत, शेततळे अशी कामे सुरू आहेत. या गावातील एकही व्यक्ती दुस:या गावात कामाला जाणार नाही, असे नियोजन करावे. लोकसहभागातून हे गाव परिवर्तीत होणार आहे, असा विश्वास आहे. सूत्रसंचालन सुनील भामरे  यांनी तर आभार गटविकास  अधिकारी नंदकुमार वाळेकर यांनी मानले.