शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राफेलमधून सफर; २० मिनिटे पाहिली, भारताच्या नव्या योद्ध्याची ताकद...
2
दिवाळीत एसटीने केली ३०१ कोटी रुपयांची कमाई, २७ ऑक्टोबरला केला एका दिवसात सर्वाधिक कमाईचा विक्रम 
3
स्वच्छतेतून समृद्धीकडे! मोदी सरकारने कमालच केली; ३ आठवड्यात कचऱ्यातून कमावले तब्बल ३८७ कोटी
4
लवकरच 'ट्रू कॉलर'ची सुट्टी! ट्राय अन् डॉटने घेतला मोठा निर्णय; बनावट कॉल, फसवणुकीला लगाम लागणार 
5
माणुसकीला काळिमा! पत्नीनेच ५५ वर्षीय पतीच्या प्रायव्हेट पार्टवर केला वार; कारण ऐकून बसेल धक्का
6
दाऊद इब्राहिमचा विश्वासू दानिश ‘चिकना’ला गोव्यातून अटक; ड्रग्स सिंडिकेटवर NCBची मोठी कारवाई
7
रतन टाटांची 'टाटा' राहिली का? त्यांच्या 'या' पहिल्या खास व्यक्तीला बाहेरचा रस्ता दाखविला; कोण आहेत मिस्त्री?
8
"आता कर्ज घ्यावं लागेल..."; पाकिस्तानमध्ये एका टोमॅटोची किंमत ७५ रुपये, का वाढली महागाई?
9
"श्रेयस अय्यरची सर्जरी झालीच नाही," BCCIनी दिली वेगळीच माहिती, ताज्या अपडेटमध्ये नेमकं काय?
10
Bigg Boss 19: ये बात! महाराष्ट्रीयन भाऊने करुन दाखवलंच, प्रणित मोरे बनला 'बिग बॉस'च्या घरातील नवा कॅप्टन
11
मुलगा शिवसेनेचा आमदार! नारायण राणे म्हणतात, बाळासाहेब होते तोपर्यंतच शिवसेना होती, आजची...
12
Lenskart IPO: 'व्हॅल्युएशन'चा आकडा एवढा मोठा की वाचायला 'लेन्स'ची गरजच नाही; पण गुंतवणूकदारांना ते झेपेल का?
13
'त्या' भारतीय नागरिकाला आता होऊ शकते १० वर्षांची कैद अन् २.५ लाख डॉलर्सचा दंड! नेमकं प्रकरण काय?
14
निवडणुकांचा पत्ता नाही अन् शरद पवार गटाचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर; जयंत पाटील मैदानात
15
विवाह मुहूर्त: २०२५-२६ मध्ये ४९ दिवस विवाह मुहूर्त; खरोखरच करावी लागणार लगीन 'घाई'
16
कॅनडात भारतीय वंशाच्या उद्योगपतीची गोळ्या झाडून हत्या; लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली जबाबदारी
17
निवडणूक बिहारमध्ये, चर्चा महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदेंची; एनडीएला डिवचण्यासाठी विरोधकांकडून 'शिंदे मॉडेल'चा उल्लेख
18
आधी सिनेमातून काढलं अन् आता...; 'कल्कि'च्या मेकर्सची दीपिकाविरोधात पुन्हा खेळी; चाहते संतापले
19
सगळं संपलं असं वाटतंय? हातातून सर्व निसटून जातंय? स्वामींचे ‘हे’ शब्द नक्कीच प्रेरणा देतील!
20
प्रकट दिन २०२५: स्वामी अन् शंकर महाराजांची भेट कशी झाली? ब्रह्मांडनायक गुरुचा अद्भूत शिष्य

वाटवी येथे सोलर प्रकल्पांचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 12:56 IST

लोकमत न्यूज नेटवर्कखांडबारा : महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान व सेल्को यांच्या संयुक्त विद्यमाने ग्राम वाटवी येथील सामूहिक संस्थांच्या सोलार प्रकल्पांचे उद्घाटन पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी आमदार सुरूपसिंग नाईक, आमदार डॉ.विजयकुमार गावीत, माजी खासदार माणिकराव गावीत, नवापूर पं.स.च्या सभापती सविता गावीत, जिल्हाधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी, जिल्हा पोलीस ...

लोकमत न्यूज नेटवर्कखांडबारा : महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान व सेल्को यांच्या संयुक्त विद्यमाने ग्राम वाटवी येथील सामूहिक संस्थांच्या सोलार प्रकल्पांचे उद्घाटन पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी आमदार सुरूपसिंग नाईक, आमदार डॉ.विजयकुमार गावीत, माजी खासदार माणिकराव गावीत, नवापूर पं.स.च्या सभापती सविता गावीत, जिल्हाधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी, जिल्हा पोलीस अधीक्षक संजय पाटील, सहायक जिल्हाधिकारी निमा               अरोरा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी.एम. मोहन, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जालींदर पठारे, बागूल, खरेदी-विक्री संघाचे         चेअरमन अजित नाईक, वाटवीच्या सरपंच लैला कोकणी, गटविकास अधिकारी नंदकुमार वाघमारे, सविता जयस्वाल, अॅड.योगिनी खानविलकर आदी उपस्थित होते.पालकमंत्री रावल म्हणाले की, मुख्यमंत्री ग्रामपरिवर्तन योजनेंतर्गत नवापूर तालुक्यातील सहा गावांची निवड करण्यात आली असून,               यापैकी वाटवी हे एक गाव आहे. या गावात शासनाच्या सर्व योजना एकत्रिपणे लागू करून या योजना प्रभावीपणे राबविण्यात याव्यात. रोजगार हमी योजनेचे सर्व  पॅकेजनुसार योजना द्याव्यात. सर्व यंत्रणांच्या कामांच्या यादीमध्ये ग्राम परिवर्तन योजनेंतर्गत निवड केलेल्या गावांचा समावेश असणे आवश्यक आहे. डिजिटल शाळेत विजेअभावी समस्या निर्माण  होवू नये यासाठी या शाळेत सोलार प्रकल्प देण्यात आला  असून, या गावातील पालकांनी आपल्या पाल्यांना घराची, शेतीची कामे न लावता शाळेत शिक्षणासाठी पाठवावे. आपला देश विकासाच्या मार्गावर असून गावांचा विकास म्हणजे देशाचा विकास आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गावाचे परिवर्तन करू या, असेही त्यांनी सांगितले.जिल्हाधिकारी डॉ.कलशेट्टी यांनी वाटवी हे गाव अतिशय उत्साही गाव असून या योजनेमुळे या गावाला राजस्तराचा हिस्सा मिळाला आहे. या गावात शोषखड्डे, शौचालये, गांडूळखत, विहिरी, कंम्पोस्ट खत, शेततळे अशी कामे सुरू आहेत. या गावातील एकही व्यक्ती दुस:या गावात कामाला जाणार नाही, असे नियोजन करावे. लोकसहभागातून हे गाव परिवर्तीत होणार आहे, असा विश्वास आहे. सूत्रसंचालन सुनील भामरे  यांनी तर आभार गटविकास  अधिकारी नंदकुमार वाळेकर यांनी मानले.