शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
4
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
5
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
6
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
7
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
8
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
9
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
10
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
11
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
12
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
13
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
14
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
15
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
16
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
17
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
18
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
19
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
20
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 

समाजाने युवकांना संस्कार दिले पाहिजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2019 12:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शिक्षण, राजकारण, मिडीया, संत आदींनी ठरवले तर देश सहज बदलू शकतो. हल्लीच्या तरुणांना सोशल ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : शिक्षण, राजकारण, मिडीया, संत आदींनी ठरवले तर देश सहज बदलू शकतो. हल्लीच्या तरुणांना सोशल मिडियाचे वेड लागल्याने तरुण पिढी भरकटत चालली आहे. समाजाने युवकांना संस्कार दिले पाहिजे. संस्कारशील युवकच राष्ट्र घडवू शकतो, असे प्रतिपादन राष्ट्रसंत पद्मभूषण श्रीमद् विजयरत्न सुंदरसुरीश्वरजी म.सा. यांनी सोमवारी येथे केले.खेतिया (मध्य प्रदेश) येथे सत्संगानिमित्त आलेल्या पद्मभूषण विजयरत्न सुंदरसुरीश्वरजी महाराज येथे पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, समाज, युवापिढीकडून राष्ट्राला काय मिळेल ही अपेक्षा करण्यापेक्षा आपण तरुणांना काय देतो हे महत्त्वाचे आहे. हल्लीच्या तरुणांना जसे ज्ञान दिले त्याचा परिपाक भविष्यात पाहायला मिळेल. यासाठी प्रथमत: वेबसिरीज यासारखे साईड बंद झाले पाहिजे. सध्याच्या तरुणांचा त्याच्यावरच भर आहे. यासंबंधी राज्यसभेत पिटीशन दाखल केले होते. सर्व स्तरातील नेत्यांची भेट घेऊन योग्य निकाल देण्याचीही मागणी केली होती.शिक्षणाबाबत बोलताना महाराज म्हणाले की, शिक्षणाने पिढी तयार होते. भविष्याची वाटचाल मिळते. कॅरेक्टर नाही. हल्ली गावातील अशिक्षित माणूस एवढ्या चुका करत नाही त्याउपरही सुशिक्षित माणूस चुका करून बसत आहे. त्यामुळे सुशिक्षितपणाचा आव आणण्यापेक्षा मनापासून परिवर्तन करा. सर्वांशी प्रेमाने वागा सदाचार घडवा. सीबीएससी बोर्डाच्या अभ्यासक्रमामध्ये सहावीच्या पुस्तकात थोडाफार अश्लील विषय होता तो निघावा यासाठी पिटीशन दाखल केले आणि तो विषयही काढला. त्यामुळे विद्यार्थ्यांवर लहान वयात योग्य संस्कार पडणे गरजेचे आहे. विविध वेबसाईट यांना भेट देऊन विद्यार्थी नको ती माहिती घेतात, आवश्यक तेवढीच माहिती घेतली पाहिजे. सेक्स एज्युकेशन हा शिक्षणाचा विषय नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. सध्याच्या परिस्थितीत मीडियाबाबत बोलताना ते म्हणाले की, टीआरपी वाढवण्यासाठी सगळीकडे स्पर्धा सुरू आहे. चांगली बातमी देण्यात कोणीही आग्रही नाही ही आजची परिस्थिती व दहा वर्षापूर्वीची परिस्थिती यातही विसंगतपणा आढळतो. संस्कारितपणा हळूहळू लोप पावत चालला आहे. विविध जाहिरातींच्या माध्यमातून संस्कारावरही परिणाम होत आहे. त्यामुळे मीडियानेही अधिकाधिक चांगले देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हैदराबाद घटनेबाबत बोलताना महाराज म्हणाले की, घटना घडली याचा विचार केला पाहिजे. अश्शील चित्रपट बंद केले पाहिजे. नाहीतर देशात अशा घटना घडत राहतील, असे त्यांनी सांगितले.श्रीमद् विजयरत्न सुंदरसुरीश्वरजी महाराजांचे आजपर्यंत ‘दो कदम विस्मरण से स्मरण की और’ हे पुस्तक दहा भाषेत प्रसिद्ध आहे. हे पुस्तक वाचून ४०० मुलांनी आपल्या वृद्ध आई-वडिलांना वृद्धाश्रमातून परत आणले. जोपर्यंत स्वत:मध्ये बदल होत नाही तोपर्यंत देश बदलणे शक्य नाही. कोणतीही चांगली गोष्ट करण्यासाठी कष्ट सोसावे लागतात. समाजात चांगले संस्कार देण्याचे कार्य आम्ही करत असतो. समाजाने अधिकाधिक चांगले बनण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहनही केले.