शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

समाजाने युवकांना संस्कार दिले पाहिजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2019 12:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शिक्षण, राजकारण, मिडीया, संत आदींनी ठरवले तर देश सहज बदलू शकतो. हल्लीच्या तरुणांना सोशल ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : शिक्षण, राजकारण, मिडीया, संत आदींनी ठरवले तर देश सहज बदलू शकतो. हल्लीच्या तरुणांना सोशल मिडियाचे वेड लागल्याने तरुण पिढी भरकटत चालली आहे. समाजाने युवकांना संस्कार दिले पाहिजे. संस्कारशील युवकच राष्ट्र घडवू शकतो, असे प्रतिपादन राष्ट्रसंत पद्मभूषण श्रीमद् विजयरत्न सुंदरसुरीश्वरजी म.सा. यांनी सोमवारी येथे केले.खेतिया (मध्य प्रदेश) येथे सत्संगानिमित्त आलेल्या पद्मभूषण विजयरत्न सुंदरसुरीश्वरजी महाराज येथे पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, समाज, युवापिढीकडून राष्ट्राला काय मिळेल ही अपेक्षा करण्यापेक्षा आपण तरुणांना काय देतो हे महत्त्वाचे आहे. हल्लीच्या तरुणांना जसे ज्ञान दिले त्याचा परिपाक भविष्यात पाहायला मिळेल. यासाठी प्रथमत: वेबसिरीज यासारखे साईड बंद झाले पाहिजे. सध्याच्या तरुणांचा त्याच्यावरच भर आहे. यासंबंधी राज्यसभेत पिटीशन दाखल केले होते. सर्व स्तरातील नेत्यांची भेट घेऊन योग्य निकाल देण्याचीही मागणी केली होती.शिक्षणाबाबत बोलताना महाराज म्हणाले की, शिक्षणाने पिढी तयार होते. भविष्याची वाटचाल मिळते. कॅरेक्टर नाही. हल्ली गावातील अशिक्षित माणूस एवढ्या चुका करत नाही त्याउपरही सुशिक्षित माणूस चुका करून बसत आहे. त्यामुळे सुशिक्षितपणाचा आव आणण्यापेक्षा मनापासून परिवर्तन करा. सर्वांशी प्रेमाने वागा सदाचार घडवा. सीबीएससी बोर्डाच्या अभ्यासक्रमामध्ये सहावीच्या पुस्तकात थोडाफार अश्लील विषय होता तो निघावा यासाठी पिटीशन दाखल केले आणि तो विषयही काढला. त्यामुळे विद्यार्थ्यांवर लहान वयात योग्य संस्कार पडणे गरजेचे आहे. विविध वेबसाईट यांना भेट देऊन विद्यार्थी नको ती माहिती घेतात, आवश्यक तेवढीच माहिती घेतली पाहिजे. सेक्स एज्युकेशन हा शिक्षणाचा विषय नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. सध्याच्या परिस्थितीत मीडियाबाबत बोलताना ते म्हणाले की, टीआरपी वाढवण्यासाठी सगळीकडे स्पर्धा सुरू आहे. चांगली बातमी देण्यात कोणीही आग्रही नाही ही आजची परिस्थिती व दहा वर्षापूर्वीची परिस्थिती यातही विसंगतपणा आढळतो. संस्कारितपणा हळूहळू लोप पावत चालला आहे. विविध जाहिरातींच्या माध्यमातून संस्कारावरही परिणाम होत आहे. त्यामुळे मीडियानेही अधिकाधिक चांगले देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हैदराबाद घटनेबाबत बोलताना महाराज म्हणाले की, घटना घडली याचा विचार केला पाहिजे. अश्शील चित्रपट बंद केले पाहिजे. नाहीतर देशात अशा घटना घडत राहतील, असे त्यांनी सांगितले.श्रीमद् विजयरत्न सुंदरसुरीश्वरजी महाराजांचे आजपर्यंत ‘दो कदम विस्मरण से स्मरण की और’ हे पुस्तक दहा भाषेत प्रसिद्ध आहे. हे पुस्तक वाचून ४०० मुलांनी आपल्या वृद्ध आई-वडिलांना वृद्धाश्रमातून परत आणले. जोपर्यंत स्वत:मध्ये बदल होत नाही तोपर्यंत देश बदलणे शक्य नाही. कोणतीही चांगली गोष्ट करण्यासाठी कष्ट सोसावे लागतात. समाजात चांगले संस्कार देण्याचे कार्य आम्ही करत असतो. समाजाने अधिकाधिक चांगले बनण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहनही केले.