शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
5
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
6
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
7
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
8
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
9
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
10
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
11
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
12
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
13
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
14
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
15
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
16
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
17
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
18
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
19
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
20
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

समाजाने युवकांना संस्कार दिले पाहिजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2019 12:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शिक्षण, राजकारण, मिडीया, संत आदींनी ठरवले तर देश सहज बदलू शकतो. हल्लीच्या तरुणांना सोशल ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : शिक्षण, राजकारण, मिडीया, संत आदींनी ठरवले तर देश सहज बदलू शकतो. हल्लीच्या तरुणांना सोशल मिडियाचे वेड लागल्याने तरुण पिढी भरकटत चालली आहे. समाजाने युवकांना संस्कार दिले पाहिजे. संस्कारशील युवकच राष्ट्र घडवू शकतो, असे प्रतिपादन राष्ट्रसंत पद्मभूषण श्रीमद् विजयरत्न सुंदरसुरीश्वरजी म.सा. यांनी सोमवारी येथे केले.खेतिया (मध्य प्रदेश) येथे सत्संगानिमित्त आलेल्या पद्मभूषण विजयरत्न सुंदरसुरीश्वरजी महाराज येथे पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, समाज, युवापिढीकडून राष्ट्राला काय मिळेल ही अपेक्षा करण्यापेक्षा आपण तरुणांना काय देतो हे महत्त्वाचे आहे. हल्लीच्या तरुणांना जसे ज्ञान दिले त्याचा परिपाक भविष्यात पाहायला मिळेल. यासाठी प्रथमत: वेबसिरीज यासारखे साईड बंद झाले पाहिजे. सध्याच्या तरुणांचा त्याच्यावरच भर आहे. यासंबंधी राज्यसभेत पिटीशन दाखल केले होते. सर्व स्तरातील नेत्यांची भेट घेऊन योग्य निकाल देण्याचीही मागणी केली होती.शिक्षणाबाबत बोलताना महाराज म्हणाले की, शिक्षणाने पिढी तयार होते. भविष्याची वाटचाल मिळते. कॅरेक्टर नाही. हल्ली गावातील अशिक्षित माणूस एवढ्या चुका करत नाही त्याउपरही सुशिक्षित माणूस चुका करून बसत आहे. त्यामुळे सुशिक्षितपणाचा आव आणण्यापेक्षा मनापासून परिवर्तन करा. सर्वांशी प्रेमाने वागा सदाचार घडवा. सीबीएससी बोर्डाच्या अभ्यासक्रमामध्ये सहावीच्या पुस्तकात थोडाफार अश्लील विषय होता तो निघावा यासाठी पिटीशन दाखल केले आणि तो विषयही काढला. त्यामुळे विद्यार्थ्यांवर लहान वयात योग्य संस्कार पडणे गरजेचे आहे. विविध वेबसाईट यांना भेट देऊन विद्यार्थी नको ती माहिती घेतात, आवश्यक तेवढीच माहिती घेतली पाहिजे. सेक्स एज्युकेशन हा शिक्षणाचा विषय नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. सध्याच्या परिस्थितीत मीडियाबाबत बोलताना ते म्हणाले की, टीआरपी वाढवण्यासाठी सगळीकडे स्पर्धा सुरू आहे. चांगली बातमी देण्यात कोणीही आग्रही नाही ही आजची परिस्थिती व दहा वर्षापूर्वीची परिस्थिती यातही विसंगतपणा आढळतो. संस्कारितपणा हळूहळू लोप पावत चालला आहे. विविध जाहिरातींच्या माध्यमातून संस्कारावरही परिणाम होत आहे. त्यामुळे मीडियानेही अधिकाधिक चांगले देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हैदराबाद घटनेबाबत बोलताना महाराज म्हणाले की, घटना घडली याचा विचार केला पाहिजे. अश्शील चित्रपट बंद केले पाहिजे. नाहीतर देशात अशा घटना घडत राहतील, असे त्यांनी सांगितले.श्रीमद् विजयरत्न सुंदरसुरीश्वरजी महाराजांचे आजपर्यंत ‘दो कदम विस्मरण से स्मरण की और’ हे पुस्तक दहा भाषेत प्रसिद्ध आहे. हे पुस्तक वाचून ४०० मुलांनी आपल्या वृद्ध आई-वडिलांना वृद्धाश्रमातून परत आणले. जोपर्यंत स्वत:मध्ये बदल होत नाही तोपर्यंत देश बदलणे शक्य नाही. कोणतीही चांगली गोष्ट करण्यासाठी कष्ट सोसावे लागतात. समाजात चांगले संस्कार देण्याचे कार्य आम्ही करत असतो. समाजाने अधिकाधिक चांगले बनण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहनही केले.